जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी बदनापूर सेंटरअंतर्गत १०३ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रावसाहेब दानवे पाटील डी. फार्मसी कॉलेज येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टच्या जालना विभागाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री. जोमा मस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, तर अध्यक्षस्थानी डी. फार्मसी कॉलेजचे विभागप्रमुख प्रा. शंकर खंदारे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. श्री. जी. डोईफोडे, शांतिदेवी शार्के विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. पी. आर. उगळमुळे आणि उद्योजक श्री. अर्जुन दाभाडे उपस्थित होते. या कार्यक्रमात चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शालेय बॅग, रजिस्टर, कंपास बॉक्स, चित्रकला वही, आलेख पुस्तक यासह इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, परिश्रमाच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात आदर्श स्थान निर्माण करण्याचे आवाहन केले. लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था २००८ पासून जालना जिल्ह्यातील मंठा, वाटूर, जालना, बदनापूर आणि भाटेपुरी या भागांत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. डॉ. विल्ली डॉक्टर या संस्थेच्या संस्थापिका असून, संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने मोफत मदत व प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. या कार्यक्रमाला सुबोध खंदारे, कैलास कोल्हे, शिवाजी काजळकर, सोनाली कोरडे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी बदनापूर सेंटरअंतर्गत १०३ गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम रावसाहेब दानवे पाटील डी. फार्मसी कॉलेज येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन ट्रस्टच्या जालना विभागाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री. जोमा मस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली झाले, तर अध्यक्षस्थानी डी. फार्मसी कॉलेजचे विभागप्रमुख प्रा. शंकर खंदारे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साई हायस्कूलचे मुख्याध्यापक मा. श्री. जी. डोईफोडे, शांतिदेवी शार्के विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. पी. आर. उगळमुळे आणि उद्योजक श्री. अर्जुन दाभाडे उपस्थित होते. या कार्यक्रमात चालू शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शालेय बॅग, रजिस्टर, कंपास बॉक्स, चित्रकला वही, आलेख पुस्तक यासह इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत, परिश्रमाच्या आणि आत्मविश्वासाच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे राहून समाजात आदर्श स्थान निर्माण करण्याचे आवाहन केले. लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था २००८ पासून जालना जिल्ह्यातील मंठा, वाटूर, जालना, बदनापूर आणि भाटेपुरी या भागांत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. डॉ. विल्ली डॉक्टर या संस्थेच्या संस्थापिका असून, संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने मोफत मदत व प्रशिक्षण कार्यक्रम राबवते. या कार्यक्रमाला सुबोध खंदारे, कैलास कोल्हे, शिवाजी काजळकर, सोनाली कोरडे यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्टतर्फे एकूण १०३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.1
- हिंगोलीच्या सेनगाव येथे काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून आगामी निवडणुका आणि पक्ष संघटन वाढवण्याबाबत यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सेनगाव तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच इतर विविध महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.1
- जालना येथे शासकीय डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर एका डॉक्टरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शासकीय डॉक्टरवर झालेल्या या हल्ल्यानंतर डॉक्टरांनी एकत्र येत आपली एकजूट दाखवून दिली आहे.1
- महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.1
- हजरत बाबा सय्यद मोहम्मद ताजुद्दीन औलिया (रहमतुल्ला अलैह) यांच्या १०४ व्या वार्षिक 'उर्स-ए-पाक'च्या शुभप्रसंगी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील ताजबाग शरीफला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सरकार ताज यांच्या पवित्र दर्गावर नतमस्तक होऊन आदरांजली वाहिली. केंद्रीय मंत्र्यांच्या या भेटीदरम्यान 'उर्स-ए-पाक'चे संपूर्ण आध्यात्मिक वातावरण आणि तेथे उपस्थित असलेली भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या 'अझीम नझा' (Azeem Naza) या विशेष कार्यक्रमाचे दृश्यही यावेळी अनुभवायला मिळाले।1
- हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. "मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.1
- बुलढाणा येथील आमदार मनोज कायंदे यांनी शिक्षकांवरील अतिरिक्त भार कमी करून यावर योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.1
- जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील वझर सरकटे, अंभोडा कदम, हेलस, माहोरा आणि माळेगावनंतर आता केहाळ वडगाव येथील महिलांनीही अवैध दारूविक्रीविरोधात जोरदार एल्गार पुकारला आहे. येथील जयरामनगर तांड्यावरील महिलांनी शनिवारी सकाळी ११ वाजता तांड्यात रॅली काढून अवैध दारूविक्री तातडीने बंद करण्याची तीव्र मागणी केली. विशेष म्हणजे, घरात दारू पिऊन आल्यावर ज्या आवजाराने मारहाण केली जाते, तेच आवजार हातात घेऊन महिलांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि अवैध दारूविक्रीविरोधात आवाज उठवला. गावात, तांड्यात, फाट्यावर तसेच नायगाव टोल नाका ते जयपूर रोड परिसरात अवैध दारूविक्री सर्रास सुरू असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. या सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे अनेक कुटुंबे आर्थिक आणि सामाजिक संकटात सापडली असून संसार उद्ध्वस्त होत आहेत, घरातील शांतता हरवली आहे आणि मुलांवरचे संस्कार बिघडत आहेत, अशी आर्त हाक महिलांनी पोलीस प्रशासनाला दिली आहे. या आंदोलनाचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यात महिलांनी आपल्या वेदना मांडत पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. गावोगावी महिलांना अशा प्रकारे रस्त्यावर उतरावे लागत असल्याने मंठा तालुक्यात अवैध दारूविक्रीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता या आक्रोशानंतर पोलीस प्रशासन ठोस कारवाई करणार की महिलांचा हा आवाज आश्वासनांच्या गर्दीत हरवून जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.1