शेगांवात दुर्दैवी दुर्घटना! झाडावरून कोसळल्याने 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; उपचारापूर्वीच संपली जीवनाची झुंज.. शेगांवात दुर्दैवी दुर्घटना! झाडावरून कोसळल्याने 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; उपचारापूर्वीच संपली जीवनाची झुंज.. शेगांव : शेगाव शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात झाडावरून खाली पडल्याने 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, काम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीराम काशीराम नेमाडे (वय 70, रा. अचलपूर, जि. अमरावती) हे म्हाडा कॉलनी परिसरात काम करत असताना दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास झाडावरून अचानक खाली कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने साईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या लेखी मेमोच्या आधारे शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, उंच ठिकाणी किंवा झाडांवर काम करताना आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा जाणीव झाली आहे.
शेगांवात दुर्दैवी दुर्घटना! झाडावरून कोसळल्याने 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; उपचारापूर्वीच संपली जीवनाची झुंज.. शेगांवात दुर्दैवी दुर्घटना! झाडावरून कोसळल्याने 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; उपचारापूर्वीच संपली जीवनाची झुंज.. शेगांव : शेगाव शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात झाडावरून खाली पडल्याने 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, काम करताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोतीराम काशीराम नेमाडे (वय 70, रा. अचलपूर, जि. अमरावती) हे म्हाडा कॉलनी परिसरात काम करत असताना दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास झाडावरून अचानक खाली कोसळले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने साईबाई मोटे सामान्य रुग्णालय, शेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या लेखी मेमोच्या आधारे शेगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 194 अंतर्गत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्रसिंग चव्हाण करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, उंच ठिकाणी किंवा झाडांवर काम करताना आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर करणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा जाणीव झाली आहे.
- बुलढाण्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद मध्ये पावसाचा हाहाकार. हजारो हेक्टर वरील पिके वाहून गेली. राष्ट्रीय महामार्ग 161 जी ठप्प1
- मुख्यमंत्री महोदयांचा हेतू काही बरोबर नाही - आमदार सिद्धार्थ खरात मुख्यमंत्री महोदयांचा हेतू काही बरोबर नाही - आमदार सिद्धार्थ खरात1
- प्रभाग क्रमांक 14 मध्ये शेतातील पाणी घरात घुसले; नगर परिषद उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी केली तातडीने मदत प्रभाग क्रमांक 14 मध्ये शेतातील पाणी घरात घुसले; नगर परिषद उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी केली तातडीने मदत अकोट तालुका प्रतिनिधी.... दि. 31 जुलै : अकोट नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पाणी नागरिकांच्या घरांमध्ये घुसल्याने येथील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.या बाबतीत येथील नागरिकांच्या जिवित्वास हाणी पोहचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.या घटनेची माहिती मिळताच अकोट नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रथमेश बोरोडे यांनी तातडीने सफाई कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.व सफाई कामगार यांनी नाल्यांमधील अडथळे दूर करून पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी मार्ग मोकळा केला. त्यामुळे या परिसरात घरांमध्ये साचलेले पाणी कमी होण्यास मदत झाली. अचानक आलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नगर परिषदेच्या तातडीच्या कार्यवाहीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.2
- पावसाचे पाणि नाली अभावी थेट घरात पाणि प्रशासनाने दखल घ्यावी बुलडाणा चिखली रोड परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थितीत निर्माण झाली आहे. या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य नाली व्यवस्था पावसाचे पाणी थेट घरात शिरले . या गंभीर समस्येवर स्थानिक सरपंच आणि प्रशासनाने अद्याप डोळेझाक केल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून "सरपंच आणि प्रशासनाने तत्काळ या परिस्थितीची दखल घेऊन मदत करावी1
- - लोहारी रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल; नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलसमोरील समस्या गंभीर प्रतिनिधी : वर्षा फुसे | अकोट मुंडगाव येथील लोहारी रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्वर्गीय नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. लहान मुलांचे दप्तर व गणवेश भिजत असून, अनेक विद्यार्थ्यांना घसरून पडण्याची भीती कायम असते. शिक्षकांनाही शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, लोहारी रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. "शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज." - लोहारी रस्त्यावर पाणी साचल्याने विद्यार्थी व शिक्षकांचे हाल; नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलसमोरील समस्या गंभीर प्रतिनिधी : वर्षा फुसे | अकोट मुंडगाव येथील लोहारी रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने स्वर्गीय नारायणराव पिंपळे प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेसमोरील रस्ता पाण्याखाली गेल्याने विद्यार्थ्यांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून जीव मुठीत धरून शाळेत जावे लागत आहे. लहान मुलांचे दप्तर व गणवेश भिजत असून, अनेक विद्यार्थ्यांना घसरून पडण्याची भीती कायम असते. शिक्षकांनाही शाळेत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असून, त्यामुळे शैक्षणिक कामकाजावरही परिणाम होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, लोहारी रस्त्यावरील पाण्याचा तातडीने निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. "शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज."4