भारत भूषण सन्मान 2.0 सोहळा उत्साहात संपन्न देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ज्ञांचा गौरव कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षणावर भर अहिल्यानगर (प्रतिनिधी) - चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित ‘भारत भूषण सन्मान 2.0’ सोहळा शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशातील विविध राज्यांतील नामांकित शाळांचे प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ तसेच संस्थाचालकांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे अद्यावत शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा सर्वांगीण विकास आणि मुलांमध्ये संस्कारमूल्यांची जोपासना या विषयांवर या सोहळ्यात विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन व गणेश आरतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, प्रभावी योग प्रात्यक्षिक आणि ‘शिव गर्जना’ या सादरीकरणांनी उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण सभागृहात उत्साह, शिस्त आणि सांस्कृतिक रंगत अनुभवायला मिळाली. कार्यक्रमास शाळेचे संचालक संजय चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली. चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सचदेव यांनी ‘भारत भूषण सन्मान’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला यंदाही देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. देशातील 175 विविध राष्ट्रीय पातळीवरील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञ या सोहळ्यास उपस्थित होते. विचारांची देवाण-घेवाण घडवून आणत शिक्षणाच्या माध्यमातून भारताला प्रगतीच्या दिशेने नेण्याची ही व्यापक संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले. शैक्षणिक क्षेत्रातील प्राचीन परंपरा ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत झालेल्या प्रवासाचा आढावा यावेळी घेण्यात आला. पारंपरिक मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची गरज या मेळाव्यात अधोरेखित करण्यात आली. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या एमबीडी समूहाच्या प्रशिक्षण विभागातील उपमहाव्यवस्थापक रिती मल्होत्रा यांनी ग्रामीण भागापर्यंत अद्यावत शिक्षण प्रणाली पोहोचल्यास देशाचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रातील नव्या डिजिटल साधनांचा शिक्षकांनी आत्मसात करणे काळाची गरज असून, शिक्षक प्रशिक्षण आणि सक्षम नेतृत्व हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष मान्यवर आराधना राणा यांनी “शाळांमध्ये परिवर्तन घडविणारे नेतृत्व” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. नेतृत्वामध्ये अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल” या विषयावर आयोजित परिसंवादाचे सूत्रसंचालन सीमा नेगी यांनी केले. या चर्चेत दीपिका नगरवाला, रिती मल्होत्रा, स्वाती पटेल, आणि कल्पेश राठोड यांनी सहभाग घेत शिक्षण क्षेत्रातील आधुनिक नेतृत्व, डिजिटल परिवर्तन आणि मूल्याधारित शिक्षण याविषयी सखोल विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान “एलिट प्रिन्सिपल क्लब”चे उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून देशभरातील शाळा प्रमुखांमध्ये संवाद, समन्वय आणि नवकल्पनांची देवाण-घेवाण वाढविण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची घोषणाही करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रभावी व ओजस्वी सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी श्रद्धा गोड आणि पायल राऊत यांनी केले. शेवटी इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी आलिया खाटिक हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या सोहळ्यासाठी एमबीडी ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले.
भारत भूषण सन्मान 2.0 सोहळा उत्साहात संपन्न देशभरातील 175 शाळांच्या प्राचार्य-शिक्षणतज्ज्ञांचा गौरव कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षणावर भर अहिल्यानगर (प्रतिनिधी) - चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित ‘भारत भूषण सन्मान 2.0’ सोहळा शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशातील विविध राज्यांतील नामांकित शाळांचे प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ तसेच संस्थाचालकांचा यावेळी सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे अद्यावत शिक्षण पद्धती, विद्यार्थ्यांच्या कला-गुणांचा सर्वांगीण विकास आणि मुलांमध्ये संस्कारमूल्यांची जोपासना या विषयांवर या सोहळ्यात विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन व गणेश आरतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणेश वंदना, प्रभावी योग प्रात्यक्षिक आणि ‘शिव गर्जना’ या सादरीकरणांनी उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. संपूर्ण सभागृहात उत्साह, शिस्त आणि सांस्कृतिक रंगत अनुभवायला मिळाली. कार्यक्रमास शाळेचे संचालक संजय चव्हाण यांची विशेष उपस्थिती लाभली. चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सचदेव यांनी ‘भारत भूषण सन्मान’ उपक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला यंदाही देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. देशातील 175 विविध राष्ट्रीय पातळीवरील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञ या सोहळ्यास उपस्थित होते. विचारांची देवाण-घेवाण घडवून आणत शिक्षणाच्या माध्यमातून भारताला प्रगतीच्या दिशेने नेण्याची ही व्यापक संकल्पना असल्याचे त्यांनी नमूद केले. शैक्षणिक क्षेत्रातील प्राचीन परंपरा ते आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत झालेल्या प्रवासाचा आढावा यावेळी घेण्यात आला. पारंपरिक मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्याची गरज या मेळाव्यात अधोरेखित करण्यात आली. मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या एमबीडी समूहाच्या प्रशिक्षण विभागातील उपमहाव्यवस्थापक रिती मल्होत्रा यांनी ग्रामीण भागापर्यंत अद्यावत शिक्षण प्रणाली पोहोचल्यास देशाचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला. शिक्षण क्षेत्रातील नव्या डिजिटल साधनांचा शिक्षकांनी आत्मसात करणे काळाची गरज असून, शिक्षक प्रशिक्षण आणि सक्षम नेतृत्व हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रमुख आधारस्तंभ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष मान्यवर आराधना राणा यांनी “शाळांमध्ये परिवर्तन घडविणारे नेतृत्व” या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. नेतृत्वामध्ये अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “अधिकार, सहानुभूती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा समतोल” या विषयावर आयोजित परिसंवादाचे सूत्रसंचालन सीमा नेगी यांनी केले. या चर्चेत दीपिका नगरवाला, रिती मल्होत्रा, स्वाती पटेल, आणि कल्पेश राठोड यांनी सहभाग घेत शिक्षण क्षेत्रातील आधुनिक नेतृत्व, डिजिटल परिवर्तन आणि मूल्याधारित शिक्षण याविषयी सखोल विचार मांडले. कार्यक्रमादरम्यान “एलिट प्रिन्सिपल क्लब”चे उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून देशभरातील शाळा प्रमुखांमध्ये संवाद, समन्वय आणि नवकल्पनांची देवाण-घेवाण वाढविण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची घोषणाही करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रभावी व ओजस्वी सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी श्रद्धा गोड आणि पायल राऊत यांनी केले. शेवटी इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी आलिया खाटिक हिने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या सोहळ्यासाठी एमबीडी ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले.
- झरेश्वर महादेव मंदिरात प्रथम वर्धापन दिनानिमित्त शिवलिलामृत पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता अहिल्यानगर तालुक्यातील आशितोष भगवान झरेश्वर महादेव मंदिर शिवमल्हारगडच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त नगर तालुक्यातील हिवरे झरे येथे श्रीमद् भागवत कथा व शिवलिलामृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 9 फेब्रुवारीपासून या सोहळ्यास सुरवात झाली तर 16 फेब्रुवारी रोजी हरिभक्त पारायण राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताह कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सप्ताहात 9 फेब्रुवारी रोजी भागवत महात्म्य,10 फेब्रुवारी रोजी परीक्षित दिग्विजय,जय विजय कथा, 11 फेब्रुवारीला ध्रृव व्याख्यान,अजामेळ व्याख्यान, हिरण्यकश्यपू वध, १२ फेब्रुवारी रोजी गजेंद्र मोक्ष, वामन अवतार, १३ फेब्रुवारी रोजी श्रीराम चरित्र, श्रीकृष्ण जन्मोत्सव, १४ फेब्रुवारी रोजी गोकुळलिला, गोवर्धन लिला, रासलिला १५ फेब्रुवारी रोजी कंस वध श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह परिक्षित उद्धार यावर कथा प्रवचन झाले तर १६ फेब्रुवारी रोजी ह.भ.प.सदगुरू परमपूज्य श्री.राघव चैतन्य बाबा यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.रविवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 8 या वेळेस शिवअभिषेक तसेच होम हवन झाला. त्याबरोबरच १६ फेब्रुवारी रोजी भागवत ग्रंथ मिरवणूक व ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी दररोज मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. हा आठ दिवसाचा पारायण सोहळा संपन्न करण्यासाठी आशुतोष झरेश्वर मंदिर पंच कमेटीचे खजिनदार रोहिदास भांडवलकर ,अध्यक्ष नारायण रोडे, उपाध्यक्ष ओंकार काटे, सदस्य संजय टकले,अक्षय काटे आदी कमिटीचे पदाधिकारी व हिवरे झरे येथील सर्व ग्रामस्थ व भजन मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले. या पारायण सोहळ्यानिमित्त टकले परिवार, आंबदास काटे, राहुल बहिरट (खडकी), अभय सिंघ राठी (कमांडर) अहिल्यानगर, समस्त रोडे परिवार, झरेकर परिवार,गोरक्ष गायकवाड, समस्त काटे परिवार,बाबा शेठ झरेकर, आदी दानशूर भूमिपुत्रांनी अन्नदान करून विशेष योगदान केले.राजाराम रखमाजी वाबळे यांनी सभामंडप, परिसर पेंविंग ब्लॉक दिले.1
- Post by AMINIYA COURIER1
- पुणे अहिल्यानगर महामार्ग वाघोली मध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते, आज देखील वाघोली मध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाले, वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नागरिकांना तासन्तास वाहतूक कोंडी थांबावे लागते.1
- Post by शहादेव काशिनाथ वैद्य3
- शेवगाव (लक्ष्मण मडके) सुसरे ( पाथर्डी) येथील ग्रामसेवक दीर्घकाळ अनुपस्थित राहत असल्याने ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ठप्प झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार ग्रामपंचायत कार्यालयात चकरा माराव्या लागत असून, जन्म-मृत्यू दाखले, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे प्रस्ताव, कर नोंदी तसेच पाणी व रस्ते विषयक कामे प्रलंबित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. अर्जदार श्री. उदय सुरेश काकासाहेब (रा. सुसरे, ता. पाथर्डी) यांनी निवेदनात नमूद केले आहे की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी (सचिव) असून कार्यालयात नियमित उपस्थित राहणे, ग्रामसभेचे आयोजन करणे, विविध नोंदी व दाखले देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज सुरळीत ठेवणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून संबंधित ग्रामसेवक वारंवार अनुपस्थित राहत असल्याने प्रशासनिक यंत्रणा विस्कळीत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच, निवेदन देण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकाने कथितरित्या दमदाटी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “माझा भाऊ पीएसआय आहे. मला कोणी हिशोब मागितला तर ३५३ चा खोटा गुन्हा दाखल करीन आणि आईचं दूध आठवायला लावीन,” अशा स्वरूपाचे वक्तव्य ग्रामसेवकाने केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या वेळी सुरेश उदागे, संदीप उदागे व सतीश पिसोटे उपस्थित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण तापले असून, संबंधित ग्रामसेवकाविरुद्ध तात्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी तसेच सुसरे गावासाठी स्वतंत्र व नियमित नवीन ग्रामसेवकाची दोन दिवसांत नेमणूक करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे पंचायत समिती प्रशासनासमोर ग्रामपातळीवरील कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा सुसरे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.4
- 💪1
- BARAMATI BREAKING : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.. निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती.. #AjitPawar #sunetrapawar #malegaonsugar #BreakingNews #politics #maharashtra #MaharashtraPolitics #baramatikar #viralpost #viralvideo1
- डंपरचे चाक महिलेच्या पायावरून... बोल्हेगावात थरारक अपघात... अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला. वीटाने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे. वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतीरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अहिल्यानगरच्या बोल्हेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास वीटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली. डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे.या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र, गतीरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत. नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. याच वेळी सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र धस यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले.घटनेनंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या परिसरात तातडीने गतीरोधक बसवावेत; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे."या ठिकाणी सतत अपघात होत आहेत. प्रशासनाने गतीरोधक बसवले नाहीत, तर आम्ही आंदोलन करू." असा इशारा नागरिकांनी दिला आहे.बोल्हेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. आता तरी प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिक करत आहेत.1