काही लोकांचा ही योजना बंद पाडण्याचा डाव आहे; ही योजना जर बंद झाली तर ५४ गावांपुढे पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न उभा राहील *येवला, दि.२६ ऑगस्ट :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सुरू असलेली येवला ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही महाराष्ट्रासाठी आदर्श योजना ठरलेली आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर लोकसहभागातून चालविण्यात येणारी व १५ वर्षानंतरही सुरळीत सुरू असून नफ्यात असणारी ही महाराष्ट्रातली एकमेव योजना आहे. काही लोकांचा ही योजना बंद पडण्याचा डाव आहे. ही योजना बंद झाली तर ५४ गावांपुढे पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे ही योजना यापुढेही सुरळीत चालू ठेवायची असेल तर पाणीपट्टी वाढ अनिवार्य आहे अशी माहिती ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. अडतीस गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वतीने आज मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये समितीच्या वतीने योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, सन २०१५ -१६ या आर्थिक वर्षात योजनेच्या पाणीपट्टीमध्ये २५ टक्के वाढ केली होती. त्यानंतर दहा वर्षे समितीने कोणतीही पाणीपट्टी वाढ केलेली नाही. सन २०१५-१६ च्या तुलनेत आज विचार केला तर ५१ टक्के वीज बिल व ५७ टक्के कर्मचारी वेतन यावर अधिकचा भार योजनेवर आलेला आहे. एकंदरीत योजनेला ४२ टक्के खर्चात वाढ झालेली आहे. सुरुवातीच्या काळात या योजनेत फक्त ३८ गावे समाविष्ट होते. परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अनेक गावे ३८ गाव योजनेचे पाणी मिळावे यासाठी मागणी करत होते. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून समितीने अधिक १६ गावांची वाढ करून आज मितीस ५४ गावांना या योजनेतून पाणीपुरवठा होतो. सोबतच १३ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सहाजिकच या योजनेला आर्थिक भार आलेला आहे. सन २०१५-१६ मध्ये सरासरी विजेचे बिल वर्षाला साधारण २४ लाख रुपये होते. आज रोजी ते लाईट बिल ५३ लाख रुपये होते आहे. सोलर योजना कार्यान्वित असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो आहे. आज सोलर योजना नसते तर आजच्या विजेच्या भावाप्रमाणे किमान ७५ लाखाहून जास्त वीज बिल वार्षिक आकारले गेले असते. तसेच सन २०१५ -१६ ला विजेचा दर काय होता आणि आता सध्या विजेचा दर काय आहे याचा देखील विचार विरोधकांनी करायला हवा.या वाढलेल्या खर्चामुळे ३० टक्के पाणीपट्टी वाढ करणे समितीला अनिवार्य आहे. त्याचा सामान्य ग्राहकावर कोणताही जास्त अतिरिक्त भार पडणार नाही. साधारणता केवळ १८ ते २० रुपये महिन्याला जास्त आकारले जाणार आहेत. समितीने कदाचित हा पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतला नाही तर भविष्यात या योजनेला चालविणे कठीण होईल व येणाऱ्या काही दिवसातच या योजनेतून वीज बिलाअभावी पाणीपुरवठा करणे अशक्य होऊन योजना बंद पडेल असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मार्च २०२६ पासून आज पर्यंत जर सहा महिन्यांचा विचार केला तर सरासरी महिन्याला ११ लाख ४० हजार खर्च येतो आहे व मासिक आकारली जाणारी पाणीपट्टी ही केवळ साधारणता ९ लाख ३० हजार रुपये आहे. त्यामुळे सदरच्या खर्चात दोन लाख पंधरा हजार रुपयाची तूट दिसून येते आहे. आपण भरत असलेला वीज बिलाच्या ५०% परतावा हा जिल्हा परिषद मार्फत शासनाकडून मिळत होता. ती रक्कम साधारणता ७० लाख रुपये होती म्हणजेच शासनाकडून ३५ लाख रुपयांचा परतावा मिळत होता. हा परतावा बंद झाल्याने ग्राहकाकडून वसुली व समितीचा खर्च यातील तूट भरून निघण्यासाठी पाणीपट्टी वाढ हा एकमेव मार्ग असल्याचे समितीने म्हटले आहे. समिती मार्फत गेल्या ४ वर्षात किरकोळ दुरुस्ती मोठी दुरुस्ती किंवा इतर मेंटेनन्स यावर एकही रुपया खर्च झालेला नाही. ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा कारभार हा अतिशय पारदर्शक असून या योजनेतील समाविष्ट असलेल्या ३८ गावांपैकी कोणत्याही सरपंचांनी माहिती मागितल्यास त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. *सचिन कळमकर* *अध्यक्ष, ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना.* समितीला सर्वात मोठा आर्थिक खर्च हा वीज बिलाचा आहे. वीज बिलाचे युनिटचा भाव हा मोठ्या प्रमाणात वीज मंडळाने वाढवलेला आहे. सोलर चा वापर असून देखील साधारणता ६/७ लाख रुपये पर्यंत मासिक वीज बिलाचा खर्च आहे. वीज बिलाचा ५० टक्के परतावा ही शासनाची योजना बंद झाल्याने समितीवर आर्थिक भार आलेला आहे. त्यामुळे पाणीपट्टी वाढ करणे हे अनिवार्य आहे तरच योजना सुरळीत सुरवात राहील. *मोहन शेलार* *उपाध्यक्ष, ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना.*
काही लोकांचा ही योजना बंद पाडण्याचा डाव आहे; ही योजना जर बंद झाली तर ५४ गावांपुढे पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न उभा राहील *येवला, दि.२६ ऑगस्ट :-* राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात सुरू असलेली येवला ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही महाराष्ट्रासाठी आदर्श योजना ठरलेली आहे. महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर लोकसहभागातून चालविण्यात येणारी व १५ वर्षानंतरही सुरळीत सुरू असून नफ्यात असणारी ही महाराष्ट्रातली एकमेव योजना आहे. काही लोकांचा ही योजना बंद पडण्याचा डाव आहे. ही योजना बंद झाली तर ५४ गावांपुढे पिण्याच्या पाण्याचा यक्ष प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे ही योजना यापुढेही सुरळीत चालू ठेवायची असेल तर पाणीपट्टी वाढ अनिवार्य आहे अशी माहिती ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत दिली. अडतीस गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वतीने आज मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये समितीच्या वतीने योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, सन २०१५ -१६ या आर्थिक वर्षात योजनेच्या पाणीपट्टीमध्ये २५ टक्के वाढ केली होती. त्यानंतर दहा वर्षे समितीने कोणतीही पाणीपट्टी वाढ केलेली नाही. सन २०१५-१६ च्या तुलनेत आज विचार केला तर ५१ टक्के वीज बिल व ५७ टक्के कर्मचारी वेतन यावर अधिकचा भार योजनेवर आलेला आहे. एकंदरीत योजनेला ४२ टक्के खर्चात वाढ झालेली आहे. सुरुवातीच्या काळात या योजनेत फक्त ३८ गावे समाविष्ट होते. परंतु मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अनेक गावे ३८ गाव योजनेचे पाणी मिळावे यासाठी मागणी करत होते. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून समितीने अधिक १६ गावांची वाढ करून आज मितीस ५४ गावांना या योजनेतून पाणीपुरवठा होतो. सोबतच १३ संस्थांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे सहाजिकच या योजनेला आर्थिक भार आलेला आहे. सन २०१५-१६ मध्ये सरासरी विजेचे बिल वर्षाला साधारण २४ लाख रुपये होते. आज रोजी ते लाईट बिल ५३ लाख रुपये होते आहे. सोलर योजना कार्यान्वित असल्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो आहे. आज सोलर योजना नसते तर आजच्या विजेच्या भावाप्रमाणे किमान ७५ लाखाहून जास्त वीज बिल वार्षिक आकारले
गेले असते. तसेच सन २०१५ -१६ ला विजेचा दर काय होता आणि आता सध्या विजेचा दर काय आहे याचा देखील विचार विरोधकांनी करायला हवा.या वाढलेल्या खर्चामुळे ३० टक्के पाणीपट्टी वाढ करणे समितीला अनिवार्य आहे. त्याचा सामान्य ग्राहकावर कोणताही जास्त अतिरिक्त भार पडणार नाही. साधारणता केवळ १८ ते २० रुपये महिन्याला जास्त आकारले जाणार आहेत. समितीने कदाचित हा पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेतला नाही तर भविष्यात या योजनेला चालविणे कठीण होईल व येणाऱ्या काही दिवसातच या योजनेतून वीज बिलाअभावी पाणीपुरवठा करणे अशक्य होऊन योजना बंद पडेल असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मार्च २०२६ पासून आज पर्यंत जर सहा महिन्यांचा विचार केला तर सरासरी महिन्याला ११ लाख ४० हजार खर्च येतो आहे व मासिक आकारली जाणारी पाणीपट्टी ही केवळ साधारणता ९ लाख ३० हजार रुपये आहे. त्यामुळे सदरच्या खर्चात दोन लाख पंधरा हजार रुपयाची तूट दिसून येते आहे. आपण भरत असलेला वीज बिलाच्या ५०% परतावा हा जिल्हा परिषद मार्फत शासनाकडून मिळत होता. ती रक्कम साधारणता ७० लाख रुपये होती म्हणजेच शासनाकडून ३५ लाख रुपयांचा परतावा मिळत होता. हा परतावा बंद झाल्याने ग्राहकाकडून वसुली व समितीचा खर्च यातील तूट भरून निघण्यासाठी पाणीपट्टी वाढ हा एकमेव मार्ग असल्याचे समितीने म्हटले आहे. समिती मार्फत गेल्या ४ वर्षात किरकोळ दुरुस्ती मोठी दुरुस्ती किंवा इतर मेंटेनन्स यावर एकही रुपया खर्च झालेला नाही. ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा कारभार हा अतिशय पारदर्शक असून या योजनेतील समाविष्ट असलेल्या ३८ गावांपैकी कोणत्याही सरपंचांनी माहिती मागितल्यास त्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. *सचिन कळमकर* *अध्यक्ष, ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना.* समितीला सर्वात मोठा आर्थिक खर्च हा वीज बिलाचा आहे. वीज बिलाचे युनिटचा भाव हा मोठ्या प्रमाणात वीज मंडळाने वाढवलेला आहे. सोलर चा वापर असून देखील साधारणता ६/७ लाख रुपये पर्यंत मासिक वीज बिलाचा खर्च आहे. वीज बिलाचा ५० टक्के परतावा ही शासनाची योजना बंद झाल्याने समितीवर आर्थिक भार आलेला आहे. त्यामुळे पाणीपट्टी वाढ करणे हे अनिवार्य आहे तरच योजना सुरळीत सुरवात राहील. *मोहन शेलार* *उपाध्यक्ष, ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना.*
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मविप्र कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रतिनिधी समाधान शिरसाठ मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेतर्फे सन 2003 साली नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाचे कालांतराने ‘कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय’ असे नामकरण करण्यात आले. सदर कृषी महाविद्यालय हे नुकतेच दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथील प्रशस्त इमारतीत स्थलांतरित करण्यात आले आहे. येथील महाविद्यालयाची मुख्य इमारत, मुलांचे व मुलींचे वसतीगृह अशा तीनही भव्य इमारतींचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न होत आहे, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मविप्र संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे व सर्व शिक्षणाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. विलास खर्चे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील खासदार आमदार, नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगिरी आहेर-आडके व उपमहापौर विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती डी. बी. मोगल, चिटणीस दिलीप दळवी, दिंडोरी तालुका संचालक प्रवीण जाधव आणि मविप्र समाज समस्त कार्यकारी मंडळ, शिक्षणाधिकारी, सभासद, सेवक व विद्यार्थी यांची उपस्थिती असेल. नाशिक जिल्हा हा फळे, फुले आणि भाजीपाला उत्पादनात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. या जिल्ह्याची कृषी शिक्षणाची गरज व निकड या बाबींचा विचार करून मविप्र संस्थेने १ नोव्हेंबर २००३ पासून महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त व संलग्नित कृषी महाविद्यालयाची सुरुवात करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकरिता कृषी शिक्षणाची कवाडे खुली केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांना शेती क्षेत्रावर प्रत्यक्ष काम करता यावे, या उद्देशाने शहरातील कृषी महाविद्यालय दिंडोरी तालुक्यातील नाशिक-पेठ महामार्गावरील मौजे चाचडगाव येथे स्थलांतरित करण्यात आले. तब्बल १४ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या याच प्रशस्त अशा महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासाठी १०९ एकर जमीन क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तसेच १४ एकर कॅम्पसमध्ये प्रशासकीय इमारत, मुला-मुलींचे सुसज्ज वसतीगृह उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये प्राचार्य कार्यालय, प्रशासकीय विभाग, सुसज्ज असे भव्य ग्रंथालय, ई-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मंच, सर्व १० विभागांच्या सुसज्ज, अद्ययावत परिपूर्ण अशा प्रयोगशाळा व शिक्षण साहित्य साधनांनीयुक्त व्याख्यान कक्ष, स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा, वायफाय व इंटरनेट सुविधा उपलब्ध आहेत. चार वर्षांच्या बीएससी कृषी पदवी असलेल्या या कृषी महाविद्यालयाची प्रवेशक्षमता प्रतिवर्ष १२० विद्यार्थी इतकी आहे. याच कॅम्पसमध्ये मराठी माध्यमाचे कृषी विद्यालय व इंग्रजी माध्यमाचे कृषी तंत्रनिकेतन विद्यालयसुद्धा सुरू आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी महाविद्यालयातील सर्व सुविधा व शैक्षणिक गुणवत्ता तपासून महाविद्यालयास सन २०२२-२३ मध्ये ‘अ’ दर्जा प्रदान केला आहे. तसेच, सन २०२४ मध्ये ‘कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ फेडरेशन’ यांच्यातर्फे महाविद्यालयास ‘कृषीभूषण-२०२४’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ‘KRUSHITHON 2024’ मध्ये ‘प्रयोगशील कृषी महाविद्यालय’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १० विभागांचे प्रमुख, २८ शिक्षक व ४४ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. कृषी क्षेत्रात संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, यावर महाविद्यालयाचा जास्त भर आहे. शिक्षण संशोधन आणि शेतकरी सेवा यांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सर्व गावांचा कृषी व आर्थिक विकास साधने हेच कृषी महाविद्यालयाचे ध्येय असल्याचे ॲड. नितीन ठाकरे यांनी सांगितले.2
- लासलगावात शेतकरी आक्रमक! ‘कांदा एक्स्प्रेस’ रोखली; सडलेल्या कांद्यावरून अधिकाऱ्यांना घेतले धारेवर नाशिक जिल्ह्यातील आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावमध्ये शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळाला आहे. एनसीसीएफ (NCCF) च्या कांदा खरेदी धोरणाविरोधात आणि कांदा उत्पादकांच्या मागण्यांकडे होणाऱ्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट ‘कांदा एक्स्प्रेस’ अडवून रेल्वे रोको आंदोलन केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत लासलगाव स्थानकात कांदा घेऊन जाणारी ट्रेन अडवली. मध्य प्रदेशातून आणलेला आणि निकृष्ट/सडलेला कांदा दिल्लीला पाठवला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. शेतकर्यांच्या घरात चांगल्या दर्जाचा कांदा पडून असताना सडलेला कांदा का खरेदी केला जातोय, असा सवाल करत आंदोलकांनी एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले. आंदोलनादरम्यान गणेश निंबाळकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले "गेली पाच वर्षे प्रशासनाचा कारभार अपारदर्शक आहे. एनसीसीएफने कांदा खरेदी केंद्रे कुठे सुरू केली? हा कांदा कोणत्या शेतकऱ्यांकडून खरेदी केला? याची कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकऱ्यांच्या घरात फेब्रुवारी-मार्चमधील कांदा अजून सुरक्षित आहे, मग यांचा अवघ्या १५ दिवसांत खरेदी केलेला कांदा कसा सडला? दिल्लीला चांगलाच कांदा गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे." शेतकऱ्यांची मुख्य मागणी • सडलेला आणि निकृष्ट दर्जाचा कांदा दिल्लीला पाठवणे तत्काळ थांबवावे. • स्थानिक शेतकऱ्यांच्या घरातील चांगल्या दर्जाचा कांदा रास्त भावाने खरेदी करण्यात यावा. • कांदा खरेदी केंद्रांची आणि प्रक्रियेची माहिती पूर्णपणे पारदर्शक करावी.3
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक2
- शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य1
- दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दिंडोरी तालुक्यातील कृष्ण गाव येथील हनुमंत रायाच्या पटांगणात सुरू असलेल्यांना भेटण्याची आज सांगता करण्यात आली या नाम्यामध्ये सात दिवस हे भजन कीर्तन हरिपाठ गाथा भजन व प्रवचन असे भरगच्च कार्यक्रम राहून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवले त्यानंतर अन्नदानातून उरलेला शिधा हा ज्ञानराज वारकरी संस्थेला ग्रामस्थांनी दान म्हणून दिला आहे या ज्ञानराज वारकरी संस्थेमध्ये आज 40 ते 45 विद्यार्थी हे गीता भागवत व पखवाज याचे शिक्षण घेत आहे ह्या वारकरी शिक्षण संस्थेत पाचवीपासून ते दहावी पर्यंत विद्यार्थी ज्ञानदान घेत आहेत .1
- माझ्या छातीवरून गाडी जाऊ द्या, पण शेतकऱ्याच्या घामाचा घात होऊ देणार नाही!" काळ्या आईच्या कुशीत घाम गाळून संपूर्ण देशाचं पोट भरणाऱ्या बळीराजाची अवस्था आज काय झाली आहे? नाशिकच्या लाल मातीतून उठलेला एक तरुण शेतकरी, श्री गणेशभाऊ निंबाळकर, जेव्हा रेल्वेच्या रुळांवर उभा राहून भरल्या डोळ्यांनी आक्रोश करतो, तेव्हा फक्त एक माणूस रडत नसतो, तर उभ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांचा स्वाभिमान टाहो फोडत असतो! रात्रंदिवस काबाडकष्ट करून, कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला जेव्हा मातीमोल भाव मिळतो आणि दुसरीकडे दलालांच्या फायद्यासाठी निकृष्ट कांदा पाठवून शेतकऱ्यांचे भाव पाडले जातात, तेव्हा एका शेतकऱ्याच्या काळजात होणाऱ्या वेदनांची कल्पना कोण करणार? अधिकारी, नाफेड, सी.डब्ल्यू.सी.च्या उंबरठ्यावर चपला झिजवूनही जेव्हा न्याय मिळत नाही, तेव्हा संतापाने आणि हतबलतेने डोळ्यातून अश्रू वाहत असताना "मला या देशाचं नागरिकत्वच नको" असा टोकाचा उद्गार एका अन्नदात्याच्या मुखातून निघावा, ही संपूर्ण व्यवस्थेसाठी शरमेची बाब आहे. गणेशभाऊ, तुम्ही एकटे नाही आहात! तुमच्या कंठातून निघालेला प्रत्येक शब्द हा शेतात राबणाऱ्या माय-बाप शेतकऱ्याची खरी व्यथा2
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 28 ऑगस्ट 2026 रोजी मविप्र कृषी महाविद्यालयाचे नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते चाचडगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक2
- बिहार गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें। गंगा नदी में बड़ा नाव हादसा सामने आया है। देखते ही देखते मजदूरों से भरी नाव गंगा में समा गई। हादसे के बाद नदी में अफरा-तफरी मच गई और कई लोग पानी में डूब गए। शुरुआती जानकारी के मुताबिक हादसे में 18 मजदूरों की मौत की खबर सामने आई है। राहत और बचाव कार्य जारी है। इस दर्दनाक हादसे से जुड़ी हर बड़ी अपडेट और मौके की पूरी जानकारी के लिए वीडियो को अंत तक देखें। S Breaking News को Subscribe करें और देश-दुनिया की ताजा खबरों के लिए जुड़े रहें।1