मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (पदे) येथे १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून तीन कुटुंबांचे संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेनंतर बाधित कुटुंबांना शासनाने तातडीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने तहसीलदार मुखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही आग श्री नागोराव निवृत्ती वादे यांच्या घराला लागली आणि वेगाने शेजारील हणमंत निवृत्ती वादे व मारोती निवृत्ती वादे यांच्या घरांपर्यंत पसरली. काही क्षणांतच तिन्ही घरे जळून खाक झाली. या आगीत अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, पत्रे, घरातील लाकडी वासे, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. विशेषतः, श्री नागोराव वादे यांनी गावालगत प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेले सुमारे चार लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिनेही या आगीत जळून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या भीषण घटनेमुळे संबंधित कुटुंबांपुढे राहण्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना केवळ अंगावरील कपड्यांवरच समाधान मानावे लागत आहे. या घटनेचा पंचनामा उंद्री (पदे) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसमक्ष करून तहसील कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बाधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करण्यात आली. हेच निवेदन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मुखेड यांनाही सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे मुख्य मार्गदर्शक श्री विश्वनाथरावजी कोलमकर, प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देवडे लहानकर, प्रदेश सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेशाध्यक्ष बालाजीराव घुमलवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभुते, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय राजरवार, सोशल मीडिया प्रमुख बालाजी माधवराव चक्रधर, लोहा तालुका अध्यक्ष कपिल कानगुलकर, मुखेड तालुका अध्यक्ष तुकाराम तेलंगे, केरुर येथील माजी सरपंच प्रभाकर पठाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माजी सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गन्लेवार, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी, रमेशराव आडबलवार, पत्रकार मारोती गणेशराव वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज पाटील बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही बाधित कुटुंबांना न्याय मिळावा अशी तीव्र मागणी केली आहे.
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (पदे) येथे १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून तीन कुटुंबांचे संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेनंतर बाधित कुटुंबांना शासनाने तातडीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने तहसीलदार मुखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही आग श्री नागोराव निवृत्ती वादे यांच्या घराला लागली आणि वेगाने शेजारील हणमंत निवृत्ती वादे व मारोती निवृत्ती वादे यांच्या घरांपर्यंत पसरली. काही क्षणांतच तिन्ही घरे जळून खाक झाली. या आगीत अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, पत्रे, घरातील लाकडी वासे, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. विशेषतः, श्री नागोराव वादे
यांनी गावालगत प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेले सुमारे चार लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिनेही या आगीत जळून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या भीषण घटनेमुळे संबंधित कुटुंबांपुढे राहण्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना केवळ अंगावरील कपड्यांवरच समाधान मानावे लागत आहे. या घटनेचा पंचनामा उंद्री (पदे) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसमक्ष करून तहसील कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बाधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करण्यात आली. हेच निवेदन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मुखेड यांनाही सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे मुख्य
मार्गदर्शक श्री विश्वनाथरावजी कोलमकर, प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देवडे लहानकर, प्रदेश सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेशाध्यक्ष बालाजीराव घुमलवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभुते, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय राजरवार, सोशल मीडिया प्रमुख बालाजी माधवराव चक्रधर, लोहा तालुका अध्यक्ष कपिल कानगुलकर, मुखेड तालुका अध्यक्ष तुकाराम तेलंगे, केरुर येथील माजी सरपंच प्रभाकर पठाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माजी सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गन्लेवार, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी, रमेशराव आडबलवार, पत्रकार मारोती गणेशराव वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज पाटील बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही बाधित कुटुंबांना न्याय मिळावा अशी तीव्र मागणी केली आहे.
- मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (पदे) येथे १७ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून तीन कुटुंबांचे संसार पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहेत. या घटनेनंतर बाधित कुटुंबांना शासनाने तातडीने प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यच्या वतीने तहसीलदार मुखेड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही आग श्री नागोराव निवृत्ती वादे यांच्या घराला लागली आणि वेगाने शेजारील हणमंत निवृत्ती वादे व मारोती निवृत्ती वादे यांच्या घरांपर्यंत पसरली. काही क्षणांतच तिन्ही घरे जळून खाक झाली. या आगीत अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, पत्रे, घरातील लाकडी वासे, तसेच सर्व जीवनावश्यक वस्तू भस्मसात झाल्या. विशेषतः, श्री नागोराव वादे यांनी गावालगत प्लॉट खरेदीसाठी घरात ठेवलेले सुमारे चार लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिनेही या आगीत जळून गेले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या भीषण घटनेमुळे संबंधित कुटुंबांपुढे राहण्याचा आणि उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, त्यांना केवळ अंगावरील कपड्यांवरच समाधान मानावे लागत आहे. या घटनेचा पंचनामा उंद्री (पदे) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी गावातील पंचांसमक्ष करून तहसील कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन बाधित तिन्ही कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पुन्हा निवेदनाद्वारे करण्यात आली. हेच निवेदन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय दंडाधिकारी, मुखेड यांनाही सादर करण्यात आले आहे. यावेळी स्वाभीमानी कुंभार समाज सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्यचे मुख्य मार्गदर्शक श्री विश्वनाथरावजी कोलमकर, प्रदेशाध्यक्ष श्री विजयराव देवडे लहानकर, प्रदेश सचिव श्री शिवाजीराव पांगरेकर, युवा प्रदेशाध्यक्ष बालाजीराव घुमलवाड, जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव विभुते, मुख्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिरोळे, जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रय राजरवार, सोशल मीडिया प्रमुख बालाजी माधवराव चक्रधर, लोहा तालुका अध्यक्ष कपिल कानगुलकर, मुखेड तालुका अध्यक्ष तुकाराम तेलंगे, केरुर येथील माजी सरपंच प्रभाकर पठाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच माजी सरपंच माधवराव तुकाराम पाटील वडजे, सरपंच प्रतिनिधी सुधाकर गन्लेवार, ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील सूर्यवंशी, रमेशराव आडबलवार, पत्रकार मारोती गणेशराव वडजे, पत्रकार बालाजी पाटील शिंदे, पत्रकार मनोज पाटील बिरादार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही बाधित कुटुंबांना न्याय मिळावा अशी तीव्र मागणी केली आहे.3
- कॉक्रोच जानता पार्टीने आपली पहिली मागणी मांडली असून, त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.1
- नांदेडच्या सांगवी येथील प्रसिद्ध श्री श्याम मंदिरात पवित्र 'पुरुषोत्तम मास'चे औचित्य साधून २४ तासांच्या अखंड नामजप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २४ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता भक्तीमय वातावरणात या विधीला सुरुवात झाली असून, तो सोमवार, २५ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंत सलग २४ तास चालणार आहे. या कार्यक्रमात 'अखंड ॐ श्री श्याम देवाय नमः' या मंत्राचा महाजप केला जात आहे. 'कलियुग केवल नाम अधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा' या वचनानुसार कलियुगात नामस्मरणाचे महत्त्व भक्तांना पटवून देण्यात येत आहे. नांदेड शहर आणि परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी आणि जपामध्ये सहभागी होण्यासाठी मंदिरात गर्दी केली आहे, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. मंदिर समितीने या अखंड नामजपामध्ये सहभागी होण्यासाठी तसेच श्रमसेवा देण्यासाठी भाविकांना जाहीर आवाहन केले आहे. इच्छुक भक्त ९९७०७९५१११, ८२७५३१२२३३, ८५५२०६३००६ किंवा ९८८१११४१०६ या क्रमांकांवर संपर्क साधून आपली नाव नोंदणी करू शकतात. तसेच, कोणत्याही श्याम भक्ताला सेवा करण्याची इच्छा असल्यास, तो कितीही वेळ बसून सेवा देऊ शकतो, असेही आयोजकांनी सांगितले आहे. हे शुभ कार्य श्री हरीश मोदी, निलेश अग्रवाल, किशन अग्रवाल, गणेश गट्टानी अर्धापूर आणि सर्व श्याम भक्तांनी संकल्पित केले आहे. मंदिर प्रशासनाने भक्तांना या पवित्र सोहळ्याचा लाभ घेऊन पुण्य पदरी पाडण्याचे आवाहन केले आहे.4
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील 'शिवनेरी' शिवसेना कार्यालयात शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली अहमदपूर-चाकूर आणि उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे स्पष्ट आदेश यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी दिले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आणि संपर्क प्रमुख माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या सूचनेनुसार, लातूर जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. अहमदपूर-चाकूर आणि उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघात भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वक्तृत्व स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर व्याख्यानमाला, शिवसेना सदस्य नोंदणी, आणि 'गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक' हे अभियान राबवून प्रत्येक गावात शाखा स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीत पदवीधर निवडणुकीसाठी पदवीप्राप्त मतदारांची नोंदणी करण्याचेही आवाहन करण्यात आले. व्यासपीठावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, युवासेना जिल्हाप्रमुख लक्ष्मण पेटकर आणि उदगीर विधानसभा समन्वयक स्वप्नील (अण्णा) जाधव उपस्थित होते, ज्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. यामध्ये गोविंद बेंबडे (उदगीर-जळकोट विधानसभा संघटक), मंगेश येरकुंडे (उदगीर शहर संघटक), सुजीत मुळे (उपतालुकाप्रमुख चाकूर) आणि धोंडीराम मुठ्ठे (चाकूर तालुका संघटक) यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिकेत फुलारी यांनी केले, तर सूत्रसंचालन सुभाष गुंडीले यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख प्रशांत मोरे, दत्ता हेंगणे, युवासेना तालुका प्रमुख नागेश कोंबडे, बालाजी काळे, शहर प्रमुख शिवा कासले, शिवा भारती, मंगेश यरकुंडे, सुधाकर जायभाय, माऊली देवकत्ते, गणेश राठोड, इस्माईल अब्दुल रहीम, महेश महापुरे, दत्ता कदम, गजानन यन्ने, पद्माकर पेंढारकर, शिवा मोरार, अरुण बिरादार, गोविंद बेंबडे, शिवकांत सरनाळे, व्यंकट साबणे, सारंग आगलावे, धोंडीराम गुट्टे, मारुती बडे, कालिदास धुळगुंडे, सुजीत मुळे, दत्ता पावडे, भगवान कदम, बापूराव देऊळकर, गंगाधर कल्याणे, पांडुरंग परीट, नीलकांत परतवाघ यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.4
- नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाऊन” मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख ४ हजार ३०० रुपये किमतीचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत ४७० तलवारी, २०९ खंजर-चाकू आणि २४ फायटर-पंच असे एकूण ७०३ घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्र विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, ज्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक कार्यरत होते. २२ मे रोजी पेट्रोलिंग करत असताना पोउपनि मिलींद सोनकांबळे आणि त्यांच्या पथकाला देना बँक ते सचखंड गुरुद्वारा रोडवरील ३०० सालाना शॉपिंग प्लाझा येथील दुकान क्रमांक ०८ मध्ये अवैधरित्या तलवारी व घातक शस्त्रांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या उपस्थितीत दुकानावर छापा टाकण्यात आला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दुकान मालक रणजितसिंघ रामसिंघ सरदार (रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड) हा घटनास्थळावरून फरार झाला. दुकानाची झडती घेतली असता, १२ लाख ३१ हजार रुपयांच्या ४७० तलवारी, १ लाख ७० हजार ९०० रुपयांचे २०९ खंजर-चाकू आणि २४ हजार रुपयांचे २४ फायटर-पंच असा एकूण १४ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात आढळून आला आणि तो जप्त करण्यात आला. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ४/२५, ७/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून, फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने सुरू असलेल्या या धडक कारवायांमुळे अवैध शस्त्र विक्रेते आणि गुन्हेगारांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.1
- उदगीरच्या कल्पना चौक परिसरात एका ६० वर्षीय वृद्धाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. गोरखन सेवाभावी संस्थेने मृतदेह रुग्णालयात दाखल केला असून, आत्महत्येचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट आहे. उदगीर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.1
- परभणी जिल्ह्यात आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या 'धोंडे जेवण' कार्यक्रमाची राजकीय नेत्यांसह नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.1
- लातूर स्थानिक गुन्हे शाखेने बनावट सोने दाखवून फसवणूक करणाऱ्या आणि गर्दीतून चोरी करणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल, रोख रक्कम आणि बनावट सोन्याचे बिस्कीट जप्त केले. या टोळीमुळे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेले तब्बल ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.2