खऱ्या दिव्यांगांना न्याय देणारा "तुकाराम" अखेर बोगस अधिकाऱ्यांना पचलाच नाही..! - दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आयएएस तुकाराम मुंडे यांची २१ वर्षांतील २५ वी बदली..! खऱ्या दिव्यांगांना न्याय देणारा "तुकाराम" अखेर बोगस अधिकाऱ्यांना पचलाच नाही..! - दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आयएएस तुकाराम मुंडे यांची २१ वर्षांतील २५ वी बदली..! शिरूर कासार प्रतिनिधी कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून नव्हे तर सतत बदली होणारे अधिकारी अशी ओळख प्राप्त झालेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची वर्षभराच्या आतच पुन्हा बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले मुंढे यांच्याकडे आता राज्य अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मदत, पुनर्वसन विभाग व महसूल आणि वनविभाग अशी तीन विभागांच्या सचिवपदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. अलीकडेच त्यांनी बोगस दिव्यांग शोध मोहीम अधिक तीव्र केली होती. त्याला यश येण्यापूर्वीच मुंढे यांची तेथून बदली करण्यात आली आहे. अर्थात मुंढे यांच्या बाबतीत हे नवीन नाही. २००५ बॅचचे आय़एएस अधिकारी असलेल्या मुंढे यांची २१ वर्षांतील ही २५ वी बदली आहे. त्यांच्या या बदल्या अनेकदा प्रशासकीय शिस्त आणि राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर होतात. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांच्या अशा पद्धतीने बदल्या झाल्याची उदाहरणे आहेत. सुरवातीला त्यांची बदली झाल्यावर तेथील नागरिक सरकारच्या विरोधात आंदोलने करीत असत. आता मात्र, अशी आंदोलनेही होताना दिसत नाहीत. चौकट.. बदल्यांचा सिलसिला सुरू..! तुकाराम मुंढे २००५ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याशा गावात झाला. ते ओबीसी वर्गातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. १९९६ मध्ये त्यांनी बीएची पदवी घेतली. त्यानंतर एमए केले. पुढे २००५ मध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले. त्यांची पहिली पोस्टिंग सोलापूरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून होती. तेव्हापासूनच त्यांनी कामाचा धडका सुरू केला आणि त्यांच्या बदल्यांचाही सिलसिला सुरू झाला.
खऱ्या दिव्यांगांना न्याय देणारा "तुकाराम" अखेर बोगस अधिकाऱ्यांना पचलाच नाही..! - दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आयएएस तुकाराम मुंडे यांची २१ वर्षांतील २५ वी बदली..! खऱ्या दिव्यांगांना न्याय देणारा "तुकाराम" अखेर बोगस अधिकाऱ्यांना पचलाच नाही..! - दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आयएएस तुकाराम मुंडे यांची २१ वर्षांतील २५ वी बदली..! शिरूर कासार प्रतिनिधी कडक शिस्तीचे आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून नव्हे तर सतत बदली होणारे अधिकारी अशी ओळख प्राप्त झालेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची वर्षभराच्या आतच पुन्हा बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असलेले मुंढे यांच्याकडे आता राज्य अपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण, मदत, पुनर्वसन विभाग व महसूल आणि वनविभाग अशी तीन विभागांच्या सचिवपदाची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. अलीकडेच त्यांनी बोगस दिव्यांग शोध मोहीम अधिक तीव्र केली होती. त्याला यश येण्यापूर्वीच मुंढे यांची तेथून बदली करण्यात आली आहे. अर्थात मुंढे यांच्या बाबतीत हे नवीन नाही. २००५ बॅचचे आय़एएस अधिकारी असलेल्या मुंढे यांची २१ वर्षांतील ही २५ वी बदली आहे. त्यांच्या या बदल्या अनेकदा प्रशासकीय शिस्त आणि राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर होतात. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी त्यांच्या अशा पद्धतीने बदल्या झाल्याची उदाहरणे आहेत. सुरवातीला त्यांची बदली
झाल्यावर तेथील नागरिक सरकारच्या विरोधात आंदोलने करीत असत. आता मात्र, अशी आंदोलनेही होताना दिसत नाहीत. चौकट.. बदल्यांचा सिलसिला सुरू..! तुकाराम मुंढे २००५ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्याशा गावात झाला. ते ओबीसी वर्गातील आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते. १९९६ मध्ये त्यांनी बीएची पदवी घेतली. त्यानंतर एमए केले. पुढे २००५ मध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले. त्यांची पहिली पोस्टिंग सोलापूरमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून होती. तेव्हापासूनच त्यांनी कामाचा धडका सुरू केला आणि त्यांच्या बदल्यांचाही सिलसिला सुरू झाला.
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- --- (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील लिंबागणेश भागात सध्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. उन्हाळ्यामुळे पाण्याचे स्त्रोत आटल्याने अन्नाच्या शोधात रानडुकरे व इतर भटकी जनावरे थेट शेतात घुसून उभी पिके जमीनदोस्त करत आहेत. खाण्यापेक्षा पिकांची नासाडीच अधिक होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ----- “रात्री पाणी देताना जीव धोक्यात” --- सध्या दिवसा वीज उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी द्यावे लागते. यावेळी रानडुकरे अंगावर येण्याचा धोका निर्माण होत असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.“काबाडकष्टाने उभे केलेले बाजरी, ज्वारी, मका या सारखे पिक रानडुकरांकडून पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे. तलाठी यांना माहिती दिल्यावर फोटो पाठवण्यास सांगितले जाते; मात्र साधा मोबाईल असल्याने ते शक्य होत नाही,” असे नुकसानग्रस्त शेतकरी रामदास मुळे यांनी सांगितले. तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी त्यांनी मागणी केली. ----- सौर कुंपण योजना सर्व गावांना लागू करावी. --- डॉ.श्यामाप्रसाद जन-वन-विकास योजने अंतर्गत सध्या फक्त जंगलालगतच्या गावांना सौर कुंपणाचा लाभ दिला जातो. मात्र रानडुकरे, मोर, हरिण या सारख्या वन्यजीवांचा त्रास अनेक गावांमध्ये होत असल्याने ही योजना सर्व गावांमध्ये सरसकट लागू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केली आहे. -----1
- Post by कर्जत लाईव्ह1
- सिल्लोड तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहेत असेच एक दृश्य डोंगरगाव गावामध्ये पाहायला मिळाले पावसा सहित गारपीट ही होत आहे1
- Arun Borde Visit The Soul Of Fashion Opening Ceremony in Kalda Corner1
- Post by कर्जत लाईव्ह1