logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत ​अहिल्यानगर, दि. ९ : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध धरणे व कालव्यांमधून उन्हाळी हंगाम सन २०२५-२६ साठी उभी हंगामी चारा पिके, ऊस व फळबागांसारख्या बारमाही पिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ वरील अर्ज संबंधित सिंचन शाखा कार्यालयात दि. २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सो. अ. शहाणे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. ​हा पाणीपुरवठा गोदावरी उजवा व डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी उजवा व डावा तट कालवा तसेच पालखेड उजवा तट कालवा यांच्या लाभक्षेत्रात करण्यात येईल. याशिवाय दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी आदी धरणांच्या जलाशयांवरून; तसेच दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नद्यांच्या पात्रातून आणि गोदावरी नदीवरील विभागाच्या अधिपत्याखालील एकूण १० कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या ठिकाणावरून प्रवाही व उपसा सिंचनाद्वारे हे पाणी दिले जाईल. ​धरणांमधील उपलब्ध पाण्यातून प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाईल आणि उर्वरित पाण्यातून शेतीसाठी कालव्यांच्या आवर्तनानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही विभागाने केले आहे. #महाराष्ट्रशासन #GovernmentOfMaharashtra #IrrigationDepartment #FarmerAlert #NashikIrrigation #WaterManagement #AgricultureNews #SummerCrops #AhilyanagarNews #WaterUpdate #FarmerWelfare #WaterCrisisManagement #NashikFarmers #DripIrrigation #पाटबंधारे_विभाग

8 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
8 hrs ago

उन्हाळी हंगामासाठी पाणी मागणीचे अर्ज २४ मार्चपर्यंत सादर करावेत ​अहिल्यानगर, दि. ९ : नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध धरणे व कालव्यांमधून उन्हाळी हंगाम सन २०२५-२६ साठी उभी हंगामी चारा पिके, ऊस व फळबागांसारख्या बारमाही पिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पाण्याचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकऱ्यांनी व पाणी वापर संस्थांनी नमुना क्रमांक ७ वरील अर्ज संबंधित सिंचन शाखा कार्यालयात दि. २४ मार्च २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सो. अ. शहाणे यांनी केले आहे. निर्धारित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. ​हा पाणीपुरवठा गोदावरी उजवा व डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी उजवा व डावा तट कालवा तसेच पालखेड उजवा तट कालवा यांच्या लाभक्षेत्रात करण्यात येईल. याशिवाय दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी आदी धरणांच्या जलाशयांवरून; तसेच दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नद्यांच्या पात्रातून आणि गोदावरी नदीवरील विभागाच्या अधिपत्याखालील एकूण १० कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या ठिकाणावरून प्रवाही व उपसा सिंचनाद्वारे हे पाणी दिले जाईल. ​धरणांमधील उपलब्ध पाण्यातून प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाईल आणि उर्वरित पाण्यातून शेतीसाठी कालव्यांच्या आवर्तनानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच ठिबक व तुषार यांसारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही विभागाने केले आहे. #महाराष्ट्रशासन #GovernmentOfMaharashtra #IrrigationDepartment #FarmerAlert #NashikIrrigation #WaterManagement #AgricultureNews #SummerCrops #AhilyanagarNews #WaterUpdate #FarmerWelfare #WaterCrisisManagement #NashikFarmers #DripIrrigation #पाटबंधारे_विभाग

More news from Ahmednagar and nearby areas
  • राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था राहुरी (प्रतिनिधी): राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली. या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    1
    राहुरीत शनिवारी पाणी टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांसाठी प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी स्वतःच्या खर्चाने पाण्याची व्यवस्था
राहुरी (प्रतिनिधी):
राहुरी शहरातील नगरपरिषद हद्दीत दर शनिवारी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच पाणीटंचाईचा फटका शनिवारी (दि. ७ फेब्रुवारी २०२६) एका शाळेतील विद्यार्थ्यांना बसला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी जेवण केल्यानंतर पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली.
ही बाब लक्षात येताच राहुरी नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रा. भाऊसाहेब मोरे यांनी तत्काळ पुढाकार घेतला. त्यांनी स्वतःच्या खर्चाने जीवनधारा पाणी पुरवठा गाडी चालकांना संपर्क करून शाळेत पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करून दिली. यावेळी प्रा. मोरे स्वतः शाळेत उपस्थित राहून रांगेत उभ्या विद्यार्थ्यांना पाणी पाजत होते. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण दूर झाली.
या कार्याबद्दल फ्रिडम पॉवर पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष तथा जिल्हा प्रतिनिधी दत्ताभाऊ जोगदंड यांनी प्रा. भाऊसाहेब मोरे यांचे आभार व्यक्त केले. तसेच राहुरी शहरातील सर्व शाळांनी दर शनिवारी नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करून ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असून, शनिवारी नियमित पाणीपुरवठा व्हावा अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Rahuri, Ahmednagar•
    22 hrs ago
  • Post by Dattatray Funde
    1
    Post by Dattatray Funde
    user_Dattatray Funde
    Dattatray Funde
    Shevgaon, Ahmednagar•
    17 hrs ago
  • ​येवला, दि. १० मार्च: प्रतिनिधी सचिन वखारे येवला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह आणि संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. ​यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटवून महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अथक संघर्षामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापासून ते विविध क्षेत्रांतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात सावित्रीबाईंचे योगदान अतुलनीय आहे." ​या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
    4
    ​येवला, दि. १० मार्च: प्रतिनिधी सचिन वखारे येवला 
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह आणि संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांनी सावित्रीबाईंच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
​यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले की, "सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाची आणि समतेची ज्योत पेटवून महिलांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले. त्यांच्या अथक संघर्षामुळेच आज महिला राष्ट्रपती पदापासून ते विविध क्षेत्रांतील सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यात सावित्रीबाईंचे योगदान अतुलनीय आहे."
​या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, जिल्हाध्यक्ष मोहन शेलार यांच्यासह विविध नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    28 min ago
  • सिटी चौक परिसरात दुकानफोडी; CCTV फुटेजवरून तपास सुरू छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने एका साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानफोडी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील माल व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तसेच परिसरातील इतर CCTV फुटेजही तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, सिटी चौक परिसरात वाढत्या दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 📰
    1
    सिटी चौक परिसरात दुकानफोडी; CCTV फुटेजवरून तपास सुरू
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने एका साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानफोडी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील माल व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तसेच परिसरातील इतर CCTV फुटेजही तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.
दरम्यान, सिटी चौक परिसरात वाढत्या दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 📰
    user_लोक परिषद न्युज
    लोक परिषद न्युज
    पत्रकार औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • 👉 तुम्हालाही पार्सल पाठवायचे आहे का? विश्वासार्ह कुरिअर सेवेसाठी आजच आम्हाला कॉल करा! 9545789966
    1
    👉 तुम्हालाही पार्सल पाठवायचे आहे का? विश्वासार्ह कुरिअर सेवेसाठी आजच आम्हाला कॉल करा! 9545789966
    user_Kiran Courier Services
    Kiran Courier Services
    Courier service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील यांनी घेतले शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे दर्शन ​नाथ षष्ठीच्या पावन पर्वावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज श्री क्षेत्र पैठण येथे भेट देऊन शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पैठण नगरीत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. ​महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने समाजाचे प्रश्न सुटावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा दर्शन सोहळा पार पडला.
    1
    छत्रपती संभाजीनगर:
मनोज जरांगे पाटील यांनी घेतले शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे दर्शन
​नाथ षष्ठीच्या पावन पर्वावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज श्री क्षेत्र पैठण येथे भेट देऊन शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पैठण नगरीत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले.
​महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने समाजाचे प्रश्न सुटावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा दर्शन सोहळा पार पडला.
    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ------- (प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    1
    -------
(प्रतिनिधी) - राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्वराज्य संकल्पना प्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या स्मरणार्थ नव्या राजमाता जिजाऊ नावाच्या ३ बाय २ आसन रचनेच्या ५५ आसनी अत्याधुनिक बस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने या पूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा विविध नावांनी बससेवा सुरू केल्या आहेत. मात्र ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असलेली लालपरी आज ही दुरावस्थेत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी एसटी बसची अवस्था अतिशय खराब असून प्रवाशांना मोडकळीस आलेल्या व धोकादायक बसमधून प्रवास करावा लागत आहे. या कडे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सोमवार दिनांक ०९ रोजी अंबेजोगाई ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करताना एसटी बसमधील आसनव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आलेली दिसून आली. या बाबत बस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ही अवस्था अनेक दिवसांपासून असल्याचे सांगण्यात आले. एसटीच्या दुरावस्थेच्या या पूर्वीही बीड जिल्ह्यात २६ जुलै २०२५ रोजी एसटीच्या दुरावस्थेचे दर्शन घडवणाऱ्या तीन घटना एकाच दिवशी घडल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. पाटोदा - बीड - परभणी  मार्गावरील बस पावसात गळत होती. छत खराब असल्याने पावसाचे पाणी थेट प्रवाशांवर पडत होते आणि प्रवाशांना छत्री घेऊन बसण्याची वेळ आली होती. नेकनूर ते मांजरसुंभा दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते लातुर जाणाऱ्या (एमएच-२४ एयू ८३३५) बसचे चाक निखळून पडले होते. बसमध्ये सुमारे ६० प्रवासी होते. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अंबेजोगाई अहमदपूर मार्गावर धावणाऱ्या एका बसमध्ये छत गळत असल्याने एका प्रवाशाला चालकाच्या डोक्यावर छत्री धरून उभे राहावे लागले होते. या घटनांमुळे लालपरीमधून प्रवास करणे अनेक ठिकाणी धोकादायक ठरत असून नादुरुस्त बसची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • येवला शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, आता भरवस्तीतही नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नांदगाव बायपासलगत असलेल्या रमणपार्क सोसायटीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब प्रसूतीसाठी दवाखान्यात गेलेले असताना ही घटना घडली. ​मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी रवी पवार हे आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पवार यांनी आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ​दवाखान्यातून परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले पाहून पवार कुटुंबाला धक्काच बसला. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, "पोलिसांचा वचक संपला आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका गरीब कुटुंबाने अडचणीच्या काळासाठी साठवलेला पैसा चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    येवला शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, आता भरवस्तीतही नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नांदगाव बायपासलगत असलेल्या रमणपार्क सोसायटीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब प्रसूतीसाठी दवाखान्यात गेलेले असताना ही घटना घडली.
​मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी रवी पवार हे आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पवार यांनी आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
​दवाखान्यातून परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले पाहून पवार कुटुंबाला धक्काच बसला. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, "पोलिसांचा वचक संपला आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका गरीब कुटुंबाने अडचणीच्या काळासाठी साठवलेला पैसा चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.