श्रीगोंदा नगरपालिकेत भाजप गटबांधणी पूर्ण; सत्ताधारी गटाला दिशा देणारी नेतृत्व संगमनेर बाजारात कांद्याची मोठी आवक; भावात मात्र अपेक्षित वाढ नाही, शेतकरी हतबल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. जवळपास २० हजारांहून अधिक कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणल्या होत्या. मात्र, इतकी मोठी आवक होऊनही कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ झालेली दिसून आली नाही. भारत–बांगलादेशमधील व्यापार संबंधांवर परिणाम झाल्याने बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सध्या ठप्प आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारभावांवर बसत असून कांद्याच्या दरात सुधारणा होत नाही. आज बाजारात कांद्याला सरासरी ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आवक वाढलेली असताना बाजारात मागणी मात्र कमी असल्याचे चित्र आहे. पुढील काळात भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना असली तरी सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. आधी झालेला अतिवृष्टीचा फटका, त्यानंतर रोगराईचा धोका यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून, कष्टाने कांद्याचे पीक उभे केले. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अपुरा ठरत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याउलट कांद्याच्या रिकाम्या गोण्यांचे बाजारभाव मात्र गगनाला भिडले असून, शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे. एकूणच, संगमनेर बाजारात कांद्याची भरपूर आवक असूनही दरवाढ न झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शासनाने निर्यात व बाजारभावाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
श्रीगोंदा नगरपालिकेत भाजप गटबांधणी पूर्ण; सत्ताधारी गटाला दिशा देणारी नेतृत्व संगमनेर बाजारात कांद्याची मोठी आवक; भावात मात्र अपेक्षित वाढ नाही, शेतकरी हतबल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक झाली. जवळपास २० हजारांहून अधिक कांद्याच्या गोण्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणल्या होत्या. मात्र, इतकी मोठी आवक होऊनही कांद्याच्या दरात अपेक्षित वाढ झालेली दिसून आली नाही. भारत–बांगलादेशमधील व्यापार संबंधांवर परिणाम झाल्याने बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात सध्या ठप्प आहे. याचा थेट फटका स्थानिक बाजारभावांवर बसत असून कांद्याच्या दरात सुधारणा होत नाही. आज बाजारात कांद्याला सरासरी ५०० ते २ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. आवक वाढलेली असताना बाजारात मागणी मात्र कमी असल्याचे चित्र आहे. पुढील काळात भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना असली तरी सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. आधी झालेला अतिवृष्टीचा फटका, त्यानंतर रोगराईचा धोका यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून, कष्टाने कांद्याचे पीक उभे केले. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर अपुरा ठरत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याउलट कांद्याच्या रिकाम्या गोण्यांचे बाजारभाव मात्र गगनाला भिडले असून, शेतकऱ्यांचा खर्च आणखी वाढला आहे. एकूणच, संगमनेर बाजारात कांद्याची भरपूर आवक असूनही दरवाढ न झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. शासनाने निर्यात व बाजारभावाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.
- Shah Sameer Ahmed on Aimim: Aimim के साथ गठबंधन को लेकर Shah Sameer Ahmed का बड़ा बयान | Gallinews Bharat1
- येवला नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी व नगरसेवकांचा पदग्रहण समारंभ... प्रतिनिधी सचिन वखारे येवला.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन कोशिंब येथे संपन्न1
- आप सभी को नव वर्ष की हार्दिक शुभकामनाएं1
- येळकोट येळकोट जय मल्हार : श्री खंडोबा मंदिर1
- आमदार विक्रम पाचपुते यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी सद्गुरु संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेतले नवीन वर्षाच्या शुभारंभी आणि गुरुवारच्या पवित्र दिवशी विक्रम पाचपुते यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सद्गुरु श्री संत शेख महंमद महाराज यांच्या पवित्र चरणी मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी आमदार पाचपुते यांनी संत शेख महंमद महाराजांच्या चरणी नतमस्तक होत नवीन वर्ष सर्वांसाठी सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि सकारात्मकतेने परिपूर्ण जावे, अशी प्रार्थना केली. समाजात सलोखा, बंधुभाव आणि सद्भावना वृद्धिंगत व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दर्शनप्रसंगी शहरातील विविध मान्यवरांशी त्यांची भेट झाली. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण दिसून आले.1
- आध्यात्मिक संदेश1
- https://www.facebook.com/share/v/1Kq5HW2n8m/ लातूर च्या निष्ठावंतांची संधी आयत्यावेळी पक्षप्रवेश करणाऱ्यांना दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आक्रोश.1