एसपींकडे अवैध धंद्यांविषयी तक्रारी केल्याचा राग उमरखेड ठाणेदारांनी आकसापोटी पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या उमरखेड तालुका दैनिक पत्रकारांचे एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन उमरखेड :कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर व तालुक्यात सर्वत्र सुरु असलेले अवैध धंदे बंद करावे यासाठी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार का केली तसेच वारंवार अवैध धंद्यांच्या विरोधात बातम्या का प्रसारित करतो याचा राग मनाशी धरून उमरखेड ठाणेदारांनी धाडस 007 या यु ट्यूब चॅनलचे संपादक अमित देशमुख यांचे विरुद्ध उमरखेड पोलीसांनी आकसापोटी दाखल केलेले विविध गंभीर गुन्हे मागे घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविले आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की , दि . 12 मार्च रोजी रात्री 9:30 वाजताचे दरम्यान धाडस 007 या युट्यूब चॅनलचे संपादक अमित देशमुख यांना पत्रकार या नात्याने उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा फोन आल्यामुळे तक्रार अमित तेथे पोहचल्यावर नेहमी अवैध दारू , जुगार , गांजा आदि उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या गैर प्रकारांबाबत तक्रारी तसेच युट्यूब चॅनल व्दारे समाज माध्यमांवर बातम्या प्रसारित करणाऱ्या अमित देशमुख विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची नामी संधी साधून ठाणेदार शंकर पांचाळ व त्यांच्या काही सहकारी पोलीस अधिकाऱ्यांनी कुभांड रचून त्याचे विरुद्ध जातीय तेढ निर्माण करण्यासाठी युवकांना चिथावणी देणे , शासकिय कामात अडथळा निर्माण करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच मध्यरात्री दाखल केले . ही कार्यवाही सुडबुद्धीने करण्यात आलेली असून त्याचे विरुद्ध उमरखेड पोलीसांनी घोर अन्याय केल्यामुळे अन्यायकारी गुन्हे तत्काळ मागे घेऊन यापुढे वृत्तपत्रात अवैध धंद्यांविरुद्ध बातम्या प्रसारित करणाऱ्या प्रतिनीधींविरुद्ध अशाच प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून अमित देशमुख यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे , अशा आशयाचे निवेदन उमरखेड तालुक्यातील दैनिक वृत्तपत्र प्रतिनीधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे . यावेळी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष साहेबराव धात्रक , महात्मा फुले पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष मुडे , विभागिय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षा श्रीमती सविता चंद्रे यांच्यासह लक्ष्मीकांत नंदनवार , अरविंद ओझलवार , निळकंठ धोबे , व्यंकटेश पेन्शनवार, गजानन भारती , शैलेश ताजवे , डॉ. विशाल माने ,अरुण बेले , भिमराव नगारे ,अविनाश मुन्नरवार , अझरउल्ला खान , ज्ञानेश्वर ठाकरे, संभाजी भोयर ,वसंत देशमुख ,ताहेर मिर्झा , संतोष कलाने, संजय देशमुख , विजय आडे , दत्तात्रय देशमुख , राजु गायकवाड , स्वप्नील मग रे , सुनिल ठाकरे आदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
एसपींकडे अवैध धंद्यांविषयी तक्रारी केल्याचा राग उमरखेड ठाणेदारांनी आकसापोटी पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या उमरखेड तालुका दैनिक पत्रकारांचे एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन उमरखेड :कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर व तालुक्यात सर्वत्र सुरु असलेले अवैध धंदे बंद करावे यासाठी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार का केली तसेच वारंवार अवैध धंद्यांच्या विरोधात बातम्या का प्रसारित करतो याचा राग मनाशी धरून उमरखेड ठाणेदारांनी धाडस 007 या यु ट्यूब चॅनलचे संपादक अमित देशमुख यांचे विरुद्ध उमरखेड पोलीसांनी आकसापोटी दाखल केलेले विविध गंभीर गुन्हे मागे घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन उमरखेड तालुका दैनिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविले आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की , दि . 12 मार्च रोजी रात्री 9:30 वाजताचे दरम्यान धाडस 007 या युट्यूब चॅनलचे संपादक अमित देशमुख यांना पत्रकार या नात्याने उमरखेड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीचा फोन आल्यामुळे तक्रार अमित तेथे पोहचल्यावर नेहमी अवैध दारू , जुगार , गांजा आदि उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत चालणाऱ्या गैर प्रकारांबाबत तक्रारी तसेच युट्यूब चॅनल व्दारे समाज माध्यमांवर बातम्या प्रसारित करणाऱ्या अमित देशमुख विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची नामी संधी साधून ठाणेदार शंकर पांचाळ व त्यांच्या काही सहकारी पोलीस अधिकाऱ्यांनी कुभांड रचून त्याचे विरुद्ध जातीय तेढ निर्माण करण्यासाठी युवकांना चिथावणी देणे , शासकिय कामात अडथळा निर्माण करणे इत्यादी गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच मध्यरात्री दाखल केले . ही कार्यवाही सुडबुद्धीने करण्यात आलेली असून त्याचे विरुद्ध उमरखेड पोलीसांनी घोर अन्याय केल्यामुळे अन्यायकारी गुन्हे तत्काळ मागे घेऊन यापुढे वृत्तपत्रात अवैध धंद्यांविरुद्ध बातम्या प्रसारित करणाऱ्या प्रतिनीधींविरुद्ध अशाच प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष चौकशी करून अमित देशमुख यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावे , अशा आशयाचे निवेदन उमरखेड तालुक्यातील दैनिक वृत्तपत्र प्रतिनीधींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे . यावेळी दैनिक वृत्तपत्र वार्ताहर संघाचे अध्यक्ष साहेबराव धात्रक , महात्मा फुले पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष मुडे , विभागिय प्रादेशिक दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षा श्रीमती सविता चंद्रे यांच्यासह लक्ष्मीकांत नंदनवार , अरविंद ओझलवार , निळकंठ धोबे , व्यंकटेश पेन्शनवार, गजानन भारती , शैलेश ताजवे , डॉ. विशाल माने ,अरुण बेले , भिमराव नगारे ,अविनाश मुन्नरवार , अझरउल्ला खान , ज्ञानेश्वर ठाकरे, संभाजी भोयर ,वसंत देशमुख ,ताहेर मिर्झा , संतोष कलाने, संजय देशमुख , विजय आडे , दत्तात्रय देशमुख , राजु गायकवाड , स्वप्नील मग रे , सुनिल ठाकरे आदिंच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
- हिमायतनगरमध्ये महावितरणचा मनमानी कारभार; अपघाताचा वाढता धोका हिमायतनगर तालुक्यात रस्त्यालगतच मनमानी पद्धतीने उभारलेले वीज खांब नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचा आरोप होत आहे. बांधकाम विभागाची परवानगी न घेता राष्ट्रीय महामार्गासह सरसम–दरेसरसम –पवना मार्गावर खांब उभारण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये संताप वाढला आहे. निकृष्ट काम आणि ठेकेदार-प्रशासन संगनमताचा आरोप होत असून, हिमायतनगर तालुक्यातील महावितरण विभागाच्या विविध प्रकरणाकडे आमदार Baburao Kadam Kohlikar यांनीही अधिवेशनात लक्ष वेधले आहे. 👉 नागरिकांची मागणी: ✔️ संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका ✔️ देयके तात्काळ थांबवा ✔️ रस्त्यापासून किमान 20 फूट अंतरावरच वीज खांब उभे करा सध्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला असून तातडीने कारवाईची मागणी जोर धरत आहे. #Himayatnagar #Mahavitaran #Nanded #BreakingNews #PublicSafety RoadSafety Corruption1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- Post by वैजनाथ पावडे1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- शहर विकासाला गती; सिटी बस सेवा यासह विविध विकासकामांचा अर्थसंकल्प सादर महापौर सय्यद इकबाल1
- मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- Post by Amravati News Update1
- खडकी (बा.) येथील रोकडोबा मारोती मंदिर – श्रद्धा आणि परंपरेचा अनमोल ठेवा हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथे असलेले जागृत रोकडोबा मारोती मंदिर भाविकांसाठी आस्था आणि विश्वासाचे केंद्र बनले आहे. दैवी आख्यायिका, परंपरा आणि भक्तिभाव यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो आमली बारशीचा उत्सव, शिवपुराण कथा, महाप्रसाद आणि शेतकऱ्यांची श्रद्धा – या सर्व गोष्टींमुळे मंदिराचे महत्त्व अधिकच वाढले आहे दर शनिवारी होणारी महाआरती आणि श्रावणातील सप्ताह सोहळा भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा देतो #RokdobaMaroti #HanumanTemple #Kharki #Himayatnagar #Devotion SpiritualIndia Maharashtra Bhakti Tradition TempleStory1