Shuru
Apke Nagar Ki App…
मार्च एंडिंगच्या नावाखाली वीज वितरण कंपनीची दादागिरी,पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन कट शिवसेनेचा इशारा
Amravati News Update
मार्च एंडिंगच्या नावाखाली वीज वितरण कंपनीची दादागिरी,पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन कट शिवसेनेचा इशारा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Amravati News Update1
- Post by Labour addaa.1
- दारव्हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मार्च अखेरीस वाढत्या उन्हामुळे तसेच लग्नसराईचा हंगाम आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बसस्थानकावर ठेवलेले माठ रिकामे असून पाण्याचा थेंबही उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने (यवतमाळ-वाशीम) यांनी आगार व्यवस्थापकांनी तात्काळ दखल घेऊन दारव्हा बसस्थानकावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रसिद्धी माध्यमांतून केली आहे.1
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सकाळपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक टॉवरवर चढून विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. इसापूर ग्रामपंचायत अंतर्गत नमुना ८ चोरी गेल्याची तक्रार सचिव, सरपंच, उपसरपंच यांनी पोलिस स्टेशनला दिली. त्या तक्रारीवरून काय कार्यवाही झाली, याचा खुलासा द्यावा. इसापूर येथील गावाचा नकाशा नसल्याने कोणते कोणाचे घर आहे. हे सिद्ध होत नाही. काही लोकांना नोटरीनुसार त्यांची नावे नमुना ८ मध्ये नोंद घेण्याचा नियम आहे. आपल्या घराचा नोटरीकृत असलेल्या दस्तानुसार घर नावाने करून द्यावे, एकाच मालमत्तेवर दोन वा तीन व्यक्तीची मालकी कशी याचाही खुलासा देऊन दोषींवर कारवाई करावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी यांना सदर आंदोलकाच्या मागण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात याती व आंदोलकाला आंदोलनापासून परावृत्त करण्याबाबत पत्र दिले.1
- महावीर जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात ‘मांसबंदी’चा कडक आदेश! ३१ मार्च रोजी कत्तलखाने, मांस व अंडाविक्री पूर्णतः बंद; प्रशासनाची कठोर अंमलबजावणी बुलढाणा, दि. ३० (जिमाका): जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यात प्रशासनाने कडक निर्णय घेतला असून मंगळवार, ३१ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात कत्तलखाने, मांसविक्री दुकाने आणि अंडाविक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक सलोखा कायम राहावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किरण पाटील यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, महावीर जयंतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत मांसविक्री होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत प्रशासनाला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशात बुलढाणा, चिखली, देऊळगांव राजा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदुरा, खामगांव, शेगांव, संग्रामपूर आणि जळगांव जामोद या सर्व तालुक्यांचा समावेश असून स्थानिक प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि पोलीस यंत्रणेला संयुक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासनाने स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी नियमांचे पालन करून धार्मिक सौहार्द जपावे व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. महावीर जयंती पार्श्वभूमीवर जिल्हाभर प्रशासन ‘अलर्ट मोड’मध्ये; नियमभंगावर कठोर नजर!1
- Story - सैलानीकडे जाणाऱ्या भाविकांचे वाहन उलटले.. दोन भाविक ठार 16 जण जखमी ..1
- खामगाव : तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात पार पडला. या मंगलमयी सोहळ्यासाठी संपूर्ण गावासह परिसरातून भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शिव-पार्वती विवाहाच्या चार दिवसानंतर आता मंदिर परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली असून, संपूर्ण गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले आहे.या उत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिव मंदिराला अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळांनी उजळून निघालेले मंदिर भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. विवाहाच्या पूर्वसंध्येपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पारंपारिक पद्धतीने पार पडला. शास्त्रोक्त विधी, पुरोहितांचे मंत्रोच्चार आणि मंगलाष्टकांच्या स्वरात शिव-पार्वतीचा विवाह संपन्न झाला. यावेळी उपस्थित भाविकांनी 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या सोहळ्यानंतर मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर चार दिवसांनी, म्हणजेच आजपासून सुटाळा बुद्रुक महादेव संस्थान परिसरात मोठ्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, गावातील विवाहित लेकी-सुना या यात्रेच्या निमित्ताने खास माहेरी येतात.यात्रेनिमित्त परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि खेळण्यांची दुकाने थाटली गेली आहेत. सुटाळा बुद्रुक येथील ही परंपरा सामाजिक एकोपा आणि श्रद्धेचे प्रतीक बनली असून, या सोहळ्यामुळे गावात उत्सवी चैतन्य पसरले आहे.परिसरातील नागरिक या यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने सुटाळा बुद्रुक येथे दाखल होत आहेत.2
- Post by Amravati News Update1