*केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेच्या क्रांतिकारी निर्णयाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत* *केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या जातिनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ* *राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्याला मोठ यश....* *सन १९९२ सालापासून जातनिहाय जनगणना करण्याची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी* *सन २०१० साली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून सुप्रीम कोर्टात याचिका* *सन २०१० साली तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील १०० खासदारांचे संघटन करून सरकारकडे पाठपुरावा* *नाशिक,दि.३० एप्रिल :-* केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सन १९९२ सालापासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याला मोठ यश मिळाले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष आभार मानले आहे. आज झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष आभार मानत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना गेली दीडशे वर्षे होत आलेली आहे. त्या माहितीच्या आधारे या वर्गाच्या विकास योजना व कल्याणकारी कार्यक्रमांसाठी आर्थिक तरतुद केली जाते. नागरिकांचा मागासवर्ग म्हणजेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांच्यासाठी मंडल आयोगाने १९८० मध्ये केलेल्या शिफारशींनुसार देशात हा तिसरा मागासवर्ग अस्तित्वात आला. मात्र त्याला घटनात्मक संरक्षण पुरवताना दरवेळी जनगणना नसल्याने लोकसंख्या माहित नसल्याचे कारण पुढे येते होते. ब्रिटिशांनी भारत जिंकला तेव्हा पहिले काम केले ते म्हणजे दर १० वर्षांनी त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली. ज्यांच्यावर राज्य करायचे त्यांचा अभ्यास करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे, असे त्यांना वाटले. १८७१ ते १९३१ अशी साठ वर्षे हे काम नियमितपणे होत होते. सन १९४१ च्या महायुद्धात हे काम विस्कळीत झाले. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. सन १९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या "शूद्र पूर्वी कोण होते ?" या ओबीसी विषयक पुस्तकात ओबीसी जनगणनेची मागणी केली. ओबीसींच्या अडीअडचणी कळण्यासाठी ती गरजेची आहे असे त्यांनी लिहिले. पहिल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने (कालेलकर कमिशन) १९५५ साली स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी केली. सन १९८० साली दुसऱ्या राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने (मंडल आयोग) स्वतंत्र ओबीसी जनगणनेची पुन्हा शिफारस केली. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिले. २०१०च्या ५ मे ला संसदेत नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव मांडला. त्यासाठी मी स्वतः सर्वपक्षीय प्रयत्न केले होते. त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना (SECC 2011) केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना मिळाली नाही. प्रधानमंत्री मनमोहन सिंग अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय विकास परिषद व केंद्रीय नियोजन आयोगाने ओबीसीचे शिक्षण, रोजगार, निवारा, आरोग्य यासाठी धोरणे आखण्यासाठी ओबीसी जनगणना करावी असा ठराव केलेला होता. सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्थायी समितीने ओबीसी जनगणनेची शिफारस केलेली होती. या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेमध्ये ८ जानेवारी २०२० रोजी एकमताने ठराव सुद्धा पारित केलेला होता.आणि तो एकमताने संमत करण्यात आला होता. सन १९९२ सालापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात आली यासाठी देशभर विविध मेळावे आंदोलने मोर्चे निदर्शने करण्यात आली. यामध्येही प्रामुख्याने जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशीच प्रमुख मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सातत्याने करण्यात आली. जातनिहाय जनगणनेमुळे यापुढे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांच्या करिता सर्वांगीण विकासासाठी धोरणे आणि योजना बनविण्याकरिता निधीचे नियोजन करता येणार आहे.अनुसूचित जाती अनुसूचित जमातींप्रमाणे इतर मागास प्रवर्गाला स्वतंत्र निधी मिळेल.शिक्षण,रोजगार,आरोग्य,निवारा या मुलभुत सुविधांचा शतकानुशतके वंचित राहिलेल्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विमाप्र यांना लाभ मिळेल. न्यायालयाला आवश्यक असलेली आकडेवारी सुद्धा त्यातून मिळेल त्यामुळे राजकीय आरक्षण सुद्धा पूर्ववत होईल. अखिल भारतीय महात्मा फुले सक्त परिषदेच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आज केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे तो निर्णय इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विमाप्र या वंचित घटकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या जातनिहाय जनगणनेनंतर देशातील आरक्षणाचा तसेच वंचित घटकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे या निर्णयाचे आपण स्वागत करत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे विशेष आभार मानतो असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
*केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेच्या क्रांतिकारी निर्णयाचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत* *केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या जातिनिहाय जनगणनेचा निर्णय क्रांतिकारी - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ* *राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पाठपुराव्याला मोठ यश....* *सन १९९२ सालापासून जातनिहाय जनगणना करण्याची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मागणी* *सन २०१० साली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून सुप्रीम कोर्टात याचिका* *सन २०१० साली तत्कालीन खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील १०० खासदारांचे संघटन करून सरकारकडे पाठपुरावा* *नाशिक,दि.३० एप्रिल :-* केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सन १९९२ सालापासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याला मोठ यश मिळाले आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष आभार मानले आहे. आज झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला. या निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष आभार मानत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, देशातील अनुसुचित जाती व जमातींची जातवार जनगणना गेली दीडशे वर्षे होत आलेली आहे. त्या माहितीच्या आधारे या वर्गाच्या विकास योजना व कल्याणकारी कार्यक्रमांसाठी आर्थिक तरतुद केली जाते. नागरिकांचा मागासवर्ग म्हणजेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांच्यासाठी मंडल आयोगाने १९८० मध्ये केलेल्या शिफारशींनुसार देशात हा तिसरा मागासवर्ग अस्तित्वात आला. मात्र त्याला घटनात्मक संरक्षण पुरवताना दरवेळी जनगणना नसल्याने लोकसंख्या माहित नसल्याचे कारण पुढे येते होते. ब्रिटिशांनी भारत जिंकला तेव्हा पहिले काम केले ते म्हणजे दर १० वर्षांनी त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली. ज्यांच्यावर राज्य करायचे त्यांचा अभ्यास करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे, असे त्यांना वाटले. १८७१ ते १९३१ अशी साठ वर्षे हे काम नियमितपणे होत होते. सन १९४१ च्या महायुद्धात हे काम विस्कळीत झाले. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसुचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्विकारले. यातुन मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. सन १९४६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या "शूद्र पूर्वी कोण होते ?" या ओबीसी विषयक पुस्तकात ओबीसी जनगणनेची मागणी केली. ओबीसींच्या अडीअडचणी कळण्यासाठी ती गरजेची आहे असे त्यांनी लिहिले. पहिल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने (कालेलकर कमिशन) १९५५ साली स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी केली. सन १९८० साली दुसऱ्या राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने (मंडल आयोग) स्वतंत्र ओबीसी जनगणनेची पुन्हा शिफारस केली. सन १९९४ साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिले. २०१०च्या ५ मे ला संसदेत नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ आणि स्व. गोपीनाथराव मुंडे यांचेसह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव मांडला. त्यासाठी मी स्वतः सर्वपक्षीय प्रयत्न केले होते. त्यातुन २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना (SECC 2011) केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना मिळाली नाही. प्रधानमंत्री मनमोहन सिंग अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय विकास परिषद व केंद्रीय नियोजन आयोगाने ओबीसीचे शिक्षण, रोजगार, निवारा, आरोग्य यासाठी धोरणे आखण्यासाठी ओबीसी जनगणना करावी असा ठराव केलेला होता. सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्थायी समितीने ओबीसी जनगणनेची शिफारस केलेली होती. या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेमध्ये ८ जानेवारी २०२० रोजी एकमताने ठराव सुद्धा पारित केलेला होता.आणि तो एकमताने संमत करण्यात आला होता. सन १९९२ सालापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात आली यासाठी देशभर विविध मेळावे आंदोलने मोर्चे निदर्शने करण्यात आली. यामध्येही प्रामुख्याने जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशीच प्रमुख मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सातत्याने करण्यात आली. जातनिहाय जनगणनेमुळे यापुढे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांच्या करिता सर्वांगीण विकासासाठी धोरणे आणि योजना बनविण्याकरिता निधीचे नियोजन करता येणार आहे.अनुसूचित जाती अनुसूचित जमातींप्रमाणे इतर मागास प्रवर्गाला स्वतंत्र निधी मिळेल.शिक्षण,रोजगार,आरोग्य,निवारा या मुलभुत सुविधांचा शतकानुशतके वंचित राहिलेल्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विमाप्र यांना लाभ मिळेल. न्यायालयाला आवश्यक असलेली आकडेवारी सुद्धा त्यातून मिळेल त्यामुळे राजकीय आरक्षण सुद्धा पूर्ववत होईल. अखिल भारतीय महात्मा फुले सक्त परिषदेच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आज केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे तो निर्णय इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विमाप्र या वंचित घटकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या जातनिहाय जनगणनेनंतर देशातील आरक्षणाचा तसेच वंचित घटकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे या निर्णयाचे आपण स्वागत करत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे विशेष आभार मानतो असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
- सड़क किनारे का यह अनोखा नज़ारा सोशल मीडिया पर तेज़ी से वायरल हो रहा है। वीडियो में कुछ कुत्ते एक कुत्ते के सामने बैठकर ऐसे दिखाई दे रहे हैं जैसे आशीर्वाद ले रहे हों। लोग इसे मज़ाक में “बाबा डॉगेश्वर जी” कह रहे हैं। मासूमियत और भावनाओं से भरा यह दृश्य लोगों को खूब पसंद आ रहा है और इंटरनेट पर हंसी के साथ पॉजिटिव वाइब्स फैला रहा है। #ViralVideo #DogLovers #InternetSensation #FunnyReels #CuteAnimals #WholesomeContent1
- मुंबई के यस वी रोड नंबर 132 के सिग्नल पर परला में हमेशा लगा रहता है जाम ।1
- मकर संक्रान्त की शुभ कामनाऐ खाना दान करे.. Gpay -79729787261
- Post by Riyazisaksayyed1
- गतिरोधक की डिव्हायडर... प्रवासी वर्गात संभ्रम ! शेवगाव–नेवासा रस्त्यावरील अर्धवट गतिरोधक प्रवाशांसाठी ठरतोय डोकेदुखी; तातडीने तांत्रिक सुधारणा करण्याची प्रवासी वर्गाची मागणी.... शेवगाव दि १२ शेवगाव–नेवासा रोडवरील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या समोरील रस्त्यावर शेवगाव बांधकाम विभागाच्या वतीने अलीकडेच एक गतिरोधक उभारण्यात आले.. आहे. मात्र हे गतिरोधक नेमके गतिरोधक आहे की डिव्हायडर याबाबत वाहनचालक व सामान्य प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अगोदरच शिक्षण संस्थेचे प्रवेशद्वार हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले असतांना हि गतिरोधकाची अडचण निर्माण झाल्याने हे गतिरोधक विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी आहे की विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढवण्यासाठी आहे, हे मात्र विद्यार्थ्यांना ही समजेना ? सदर संरचनेला गतिरोधक म्हणावे, तर तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असलेले फलक, रिफ्लेक्टर, रंगसंगती अथवा सूचक चिन्हे कुठेही लावण्यात आलेली नाहीत. परिणामी, येणारी-जाणारी वाहने थेट या अडथळ्यावर आदळत असून, वाहनचालक व प्रवाशांना कंबर, मणके व हाडांच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. सामान्यतः शाळा-महाविद्यालय परिसरात गतिरोधक बसवण्यामागील उद्देश विद्यार्थ्यांची सुरक्षितता राखणे हा असतो. मात्र येथे गतिरोधक उभारल्यानंतरही वाहनचालक या अडथळ्यावरून न जाता शाळेच्या गेटलगतच्या मोकळ्या जागेतून वाहने नेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे. त्यामुळे ही रचना गतिरोधक आहे की डिव्हायडर, याबाबत प्रवाशांना अजूनही स्पष्टता नाही. या तथाकथित गतिरोधकाच्या अयोग्य व अर्धवट रचनेमुळे बांधकाम विभागातील अभियंते, उपअभियंते व रस्त्यावर काम करणाऱ्या पर्यवेक्षकांची कारागिरी जनतेसमोर उघडी पडली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, प्रवासी वर्गातून या गतिरोधकाला तातडीने तांत्रिकदृष्ट्या योग्य स्वरूप देण्यात यावे, आवश्यक ते फलक, रंग व रिफ्लेक्टर लावून त्याचे शास्त्रशुद्ध पुनर्भरण करावे, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. याशिवाय, आधीच अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या त्रिमूर्ती शिक्षण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर या अडथळ्यामुळे आणखी अडचणी निर्माण झाल्या असून, वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून योग्य कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.2
- Post by अ टाइम्स सागर भाऊ भोसले2
- Post by महाराष्ट्र सरकार और भारत सरकार1
- मानखुर्द शिवाजी नगर सीट पर कांटेदार मुकाबले के आसार हैं. यहां पर त्रिकोणीय मुकाबला दिख रहा है. मंत्री और क्षेत्र के कद्दावर नेताओं में से एक रणजीत वर्मा ने निर्दलीय चुनाव जीतने का डंका बजा दिया ।2
- Post by Riyazisaksayyed1