logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या २७ वाहनांचे उद्घाटन.!! पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या २७ वाहनांचे उद्घाटन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या २७ नव्या वाहनांचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ही वाहने पोलीस विभागाला हस्तांतरित करण्यात आले. या वाहनांमध्ये महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकांच्या ७ वाहनांचाही समावेश आहे. नव्या वाहनांमुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे.

2 hrs ago
user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
✍️.MANSUR. SHAHA. ✍️
चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
2 hrs ago
7c541af7-f3be-4ce3-9803-2b8471aef5bd

पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या २७ वाहनांचे उद्घाटन.!! पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते पोलीस विभागाच्या २७ वाहनांचे उद्घाटन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलीस विभागासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या २७ नव्या वाहनांचे उद्घाटन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ही वाहने पोलीस विभागाला हस्तांतरित करण्यात आले. या वाहनांमध्ये महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या दामिनी पथकांच्या ७ वाहनांचाही समावेश आहे. नव्या वाहनांमुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिसाद देणे अधिक सुलभ होणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुलढाणा जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!
    1
    बुलढाणा
जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन.!!
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले. पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    1
    बुलढाणा, दि. १ (जिमाका) : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी, पशुसंवर्धन, उद्योग, महिला सक्षमीकरण आणि डिजिटल सुविधा या विविध क्षेत्रांमध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असून समृद्ध, सक्षम आणि सर्वसमावेशक बुलढाणा घडविण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांनी केले.
पोलिस कवायत मैदान येथे 1 मे महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिवस व कामगार दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडाला, यावेळी ते बोलत होते. आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ.प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलिस अधिक्षक निलेश तांबे, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, राजेंद्र पोळ, समाधान गायकवाड, स्वातंत्र सेनानी, वीरमाता, वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री मकरंद पाटील म्हणाले की, बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर उभ्या राहिलेल्या अडचणींचा विचार करून शासनाने अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील १ कोटी ५ लाख ९२ हजार शेतकऱ्यांसाठी १६ हजार २२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख २९ हजार शेतकऱ्यांना ८९३ कोटी ३ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या मदतीतून कोणतीही बँक वसुली होऊ नये, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” जाहीर करण्यात आली असून, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी होणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन शासन त्याच्या सन्मान करणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते. यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले. अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली. या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.
    1
    महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीजचा 50 वा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन बुलढाणा जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा कार्यालय बुलढाणा अंतर्गत बीज प्रक्रिया केंद्र खामगाव येथे हा विशेष सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कृषी अधिकारी बुलढाणा मा. विजय पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी महाबीजचे भागधारक श्री. संतोषराव देशमुख होते.
यावेळी भागधारक, बीजोत्पादक, महाबीज विक्रेते, कृषी अधिकारी, शेतकरी तसेच कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र कोल्हे, कृषी क्षेत्र अधिकारी यांनी केले. तर प्रास्ताविक श्री. सुरेश मोहकर, केंद्र व्यवस्थापक खामगाव यांनी सादर केले. त्यांनी महाबीजच्या मागील 50 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत नवीन योजना, आधुनिक उपक्रम आणि भविष्यातील नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना शेती, बियाण्यांची गुणवत्ता आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांच्या विविध प्रश्नांचे समाधानही करण्यात आले.
अध्यक्ष श्री. संतोषराव देशमुख यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत, महाबीजची प्रगती अशीच शतकोत्तर वेगाने पुढे जावो, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या विशेष प्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीजोत्पादक, हमाल, कंत्राटी कर्मचारी, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शिपाई यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच कार्यक्रमस्थळी महाबीज उत्पादनांचे आकर्षक दालन उभारण्यात आले होते. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून सुवर्ण महोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    4 hrs ago
  • ​खामगाव : येत्या १ मे ते १५ मे या कालावधीत होऊ घातलेल्या महत्त्वपूर्ण जनगणनेच्या पार्श्वभूमीवर, खामगावचे तहसीलदार तथा जनगणना चार्ज अधिकारी सुनील पाटील यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी या प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. ​यावेळी बोलताना सुनील पाटील म्हणाले की, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिक स्वतःहून आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरू शकतात. यासाठी प्रशासनाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन विचारलेल्या ३३ प्रश्नांची अचूक माहिती भरू शकतात.नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय असेल. ही माहिती कोणत्याही कायद्यान्वये इतर कोणालाही दिली जात नाही, याची खात्रीही त्यांनी यावेळी दिली.नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर त्यांना एक 'SE-ID' (Self Enumeration ID) कोड प्राप्त होईल. यानंतर, जेव्हा प्रगणक (Enumerator) प्रत्यक्ष घरी येतील, तेव्हा त्यांना फक्त हा कोड दाखवणे पुरेसे ठरेल. या कोडच्या आधारे आपली माहिती प्रणालीमध्ये पडताळली (Confirm) जाईल, ज्यामुळे नागरिकांचा वेळही वाचणार आहे. ​तहसीलदारांनी स्पष्ट केले की, जनगणनेची ही माहिती केवळ राज्याच्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यासाठी वापरली जाते. सरकारी योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी ही आकडेवारी आधारभूत असते. त्यामुळे खामगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाची अचूक माहिती नोंदवून या राष्ट्रीय कार्यात आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
    1
    ​खामगाव : येत्या १ मे ते १५ मे या कालावधीत होऊ घातलेल्या महत्त्वपूर्ण जनगणनेच्या पार्श्वभूमीवर, खामगावचे तहसीलदार तथा जनगणना चार्ज अधिकारी सुनील पाटील यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी या प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. ​यावेळी बोलताना सुनील पाटील म्हणाले की, १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत नागरिक स्वतःहून आपली आणि आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरू शकतात. यासाठी प्रशासनाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन विचारलेल्या ३३ प्रश्नांची अचूक माहिती भरू शकतात.नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय असेल. ही माहिती कोणत्याही कायद्यान्वये इतर कोणालाही दिली जात नाही, याची खात्रीही त्यांनी यावेळी दिली.नागरिकांनी ऑनलाईन माहिती भरल्यानंतर त्यांना एक 'SE-ID' (Self Enumeration ID) कोड प्राप्त होईल. यानंतर, जेव्हा प्रगणक (Enumerator) प्रत्यक्ष घरी येतील, तेव्हा त्यांना फक्त हा कोड दाखवणे पुरेसे ठरेल. या कोडच्या आधारे आपली माहिती प्रणालीमध्ये पडताळली (Confirm) जाईल, ज्यामुळे नागरिकांचा वेळही वाचणार आहे. ​तहसीलदारांनी स्पष्ट केले की, जनगणनेची ही माहिती केवळ राज्याच्या आणि राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यासाठी वापरली जाते. सरकारी योजनांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी ही आकडेवारी आधारभूत असते. त्यामुळे खामगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाची अचूक माहिती नोंदवून या राष्ट्रीय कार्यात आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    24 min ago
  • जालना जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू
    1
    जालना जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    30 min ago
  • Post by AQS NEWS
    1
    Post by AQS NEWS
    user_AQS NEWS
    AQS NEWS
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    40 min ago
  • जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बातमी: परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना सुरेशकुमार जेथलिया यांनी एक लोकप्रिय, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व उभं केलं होतं. गावोगावी फिरत, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेता म्हणून त्यांची ओळख होती. साधेपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला सहज भेटणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि “आपला माणूस” म्हणून उभे राहणारे नेतृत्व म्हणून जेथलिया यांना विशेष मान मिळत होता. सुरुवातीला काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, त्यामुळे ते “विकासाला चालना देणारे नेतृत्व” म्हणून ओळखले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी “आपला नेता गेला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर लोकांच्या मनात घर केलेला, त्यांच्यासोबत चालणारा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
    1
    जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
बातमी:
परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना सुरेशकुमार जेथलिया यांनी एक लोकप्रिय, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व उभं केलं होतं. गावोगावी फिरत, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेता म्हणून त्यांची ओळख होती.
साधेपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला सहज भेटणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि “आपला माणूस” म्हणून उभे राहणारे नेतृत्व म्हणून जेथलिया यांना विशेष मान मिळत होता.
सुरुवातीला काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, त्यामुळे ते “विकासाला चालना देणारे नेतृत्व” म्हणून ओळखले जात होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी “आपला नेता गेला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर लोकांच्या मनात घर केलेला, त्यांच्यासोबत चालणारा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
    user_जालना आंदोलन
    जालना आंदोलन
    मुख्य संपादक - जालना आंदोलन जालना, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ​खामगाव : खामगाव-शेलोडी मार्गावर काल, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची अमोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चारही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी शेलोडी रोडवरून दोन दुचाकी भरधाव वेगाने जात असताना त्यांचा एकमेकांवर ताबा सुटला आणि अमोरासमोर धडक झाली. या अपघातात इकराम गफ्फार गवळी (वय २९), शे. अदनान शे. इरफान (वय २४), मुन्ना एजाज खान (वय २९, तिघेही रा. मोठे प्लॉट, खामगाव) आणि सौरव बलदेव भारवाड (वय १८, रा. शेलोडी) हे चौघे जण गंभीर जखमी झाले.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चौघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), अकोला येथे रेफर केले आहे.
    1
    ​खामगाव :  खामगाव-शेलोडी मार्गावर काल, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची अमोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात चारही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी शेलोडी रोडवरून दोन दुचाकी भरधाव वेगाने जात असताना त्यांचा एकमेकांवर ताबा सुटला आणि अमोरासमोर धडक झाली. या अपघातात इकराम गफ्फार गवळी (वय २९), शे. अदनान शे. इरफान (वय २४), मुन्ना एजाज खान (वय २९, तिघेही रा. मोठे प्लॉट, खामगाव) आणि सौरव बलदेव भारवाड (वय १८, रा. शेलोडी) हे चौघे जण गंभीर जखमी झाले.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चौघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी), अकोला येथे रेफर केले आहे.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    36 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.