शालेय व्यवस्थापन समितीवर गटनेते शेख फेरोज शेख अजिज जि.प.प्रा.शाळा क्र.१ उर्दूच्या समितीत स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी केंद्रप्रमुख डोंबे यांच्या हस्ते सत्कार शालेय व्यवस्थापन समितीवर गटनेते शेख फेरोज शे अंबड प्रतिनिधी :- अंबड नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १, उर्दूच्या शालेय व्यवस्थापन समितीवर स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून नगर परिषद अंबडचे नगरसेवक तथा गटनेते शेख फेरोज शेख अजिज यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकाचा समावेश करण्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी नगर परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार नगर परिषद अंबडचे मुख्याधिकारी यांनी शेख फेरोज शेख अजिज यांचे नाव स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी म्हणून कळविले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शाळेच्या विकासकामांना चालना देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची आहे. स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी म्हणून गटनेते शेख फेरोज शेख अजिज यांचा समितीत समावेश झाल्याने शाळेच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान केंद्रप्रमुख डोंबे यांच्या हस्ते शेख फेरोज शेख अजिज यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक,पालक व उपस्थितांनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेख फेरोज शेख अजिज यांनी यावेळी सांगितले.
शालेय व्यवस्थापन समितीवर गटनेते शेख फेरोज शेख अजिज जि.प.प्रा.शाळा क्र.१ उर्दूच्या समितीत स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी केंद्रप्रमुख डोंबे यांच्या हस्ते सत्कार शालेय व्यवस्थापन समितीवर गटनेते शेख फेरोज शे अंबड प्रतिनिधी :- अंबड नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १, उर्दूच्या शालेय व्यवस्थापन समितीवर स्थानिक प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून नगर परिषद अंबडचे नगरसेवक तथा गटनेते शेख फेरोज शेख अजिज यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीमध्ये स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकाचा समावेश करण्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी नगर परिषद प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार नगर परिषद अंबडचे मुख्याधिकारी यांनी शेख फेरोज शेख अजिज यांचे नाव स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधी म्हणून कळविले. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शाळेच्या विकासकामांना चालना देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची आहे. स्थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी म्हणून गटनेते शेख फेरोज शेख अजिज यांचा समितीत समावेश झाल्याने शाळेच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.दरम्यान केंद्रप्रमुख डोंबे यांच्या हस्ते शेख फेरोज शेख अजिज यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक,पालक व उपस्थितांनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेख फेरोज शेख अजिज यांनी यावेळी सांगितले.
- जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.1
- चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई.. चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई..1
- 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ1
- भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.1
- मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया1
- श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...1
- आपला गणेश मंडळ जरीपुरचा राजा गणरायाचे धुमधडाक्यात आगमन1
- अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अग्निशमन केंद्रातील कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत गंभीर आरोप समोर येत आहेत. अग्निशमन दलाचे इन्चार्ज नियमितपणे वर्दीमध्ये कर्तव्य बजावताना दिसून येतात मात्र त्यांच्या अधिनस्त काही कर्मचारी वर्दीचा वापर करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अग्निशमन केंद्रातील अधिकारी झाला कर्मचारी आणि कर्मचारी झाले अधिकारी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा असून कोणता कर्मचारी कधी येतो आणि कधी जातो, याबाबत निश्चित नियमांचे पालन होत नसल्याचे बोलले जात आहे.1