अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अग्निशमन केंद्रातील कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत गंभीर आरोप समोर येत आहेत. अग्निशमन दलाचे इन्चार्ज नियमितपणे वर्दीमध्ये कर्तव्य बजावताना दिसून येतात मात्र त्यांच्या अधिनस्त काही कर्मचारी वर्दीचा वापर करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अग्निशमन केंद्रातील अधिकारी झाला कर्मचारी आणि कर्मचारी झाले अधिकारी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा असून कोणता कर्मचारी कधी येतो आणि कधी जातो, याबाबत निश्चित नियमांचे पालन होत नसल्याचे बोलले जात आहे.
अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अग्निशमन केंद्रातील कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत गंभीर आरोप समोर येत आहेत. अग्निशमन दलाचे इन्चार्ज नियमितपणे वर्दीमध्ये कर्तव्य बजावताना दिसून येतात मात्र त्यांच्या अधिनस्त काही कर्मचारी वर्दीचा वापर करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अग्निशमन केंद्रातील अधिकारी झाला कर्मचारी आणि कर्मचारी झाले अधिकारी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा असून कोणता कर्मचारी कधी येतो आणि कधी जातो, याबाबत निश्चित नियमांचे पालन होत नसल्याचे बोलले जात आहे.
- माळीपुरा जामा मस्जिद चौकात डासांचा कहर; नगरसेवकांच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप!.. नाल्यांमध्ये साचलेले पाणी, अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त; तातडीने फॉगिंग व पावडर फवारणीची शेख अनीस मित्र मंडळाची मागणी.. माळीपुरा जामा मस्जिद चौकात डासांचा कहर; नगरसेवकांच्या दुर्लक्षावर नागरिकांचा संताप!.. नाल्यांमध्ये साचलेले पाणी, अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त; तातडीने फॉगिंग व पावडर फवारणीची शेख अनीस मित्र मंडळाची मागणी..1
- 🚨 कडेकोट पोलिस बंदोबस्तात मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! 🚨 कडेकोट पोलिस बंदोबस्तात मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.1
- श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...1
- एस टी बस चा NCMC कार्ड कसा रिचार्ज करायचा बघा, सोप्या भाषेत,1
- गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त गणपती खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश जवाहरनगर पोलिसांची कारवाई; तीन महिला आरोपींना अटक, ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त छत्रपती संभाजीनगर : गणपती बाप्पाच्या मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या तीन महिला आरोपींना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेली दोन सोन्याची मंगळसूत्रे, असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास शिवनेरी कॉलनी, विजयनगर परिसरातील मंगल पोपटवाड चव्हाण या महिला गणपतीची मूर्ती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी गजानन महाराज मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत दोन अनोळखी महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरी केले. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित महिलांची माहिती मिळवली. त्यानुसार पूजा राहुल पवार (वय २१), सुनीता दिलीप काळे (वय ३५) आणि मुस्कान राघव पवार (वय ३५), सर्व रा. ह.मु. सलाबतपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर, यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपी महिलांनी गजानन महाराज मंदिर परिसरातून मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत. आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, कलम ३०३ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त परिसमंडळ-२ रत्नाकर नवले, सहायक पोलीस आयुक्त उमामहेश्वर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मारोती गोरे, कपिल खिल्लारे, राजेंद्र शिंदे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका शिरसाठ, पूनम साळवे व पूजा लेनके यांनी केली. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.4
- सिल्लोड मध्ये पैठणी उद्योग उभारण्यासाठी आमदार सातारांचा पुढाकार येवला येथील कापसे पैठणी फॅक्टरीला भेट; रोजगारनिर्मितीच्या संधींचा घेतला आढावा सिल्लोड (प्रतिनिधी) सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोड येथे पैठणी उद्योग सुरू करण्यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने त्यांनी येवला, जि. नाशिक येथे कापसे फाउंडेशनच्या ‘कापसे पैठणी’ फॅक्टरीला भेट देऊन पैठणी उत्पादन प्रक्रिया, उद्योगाचे स्वरूप तसेच रोजगारनिर्मितीच्या संधींची माहिती जाणून घेतली. तसेच आमदार अब्दुल सत्तार यांनी फॅक्टरीतील विणकर कामगारांशी संवाद साधून त्यांच्या कामाची पद्धत, अडचणी तसेच रोजगाराच्या संधींबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी कापसे पैठणीचे संचालक बाळकृष्ण कापसे यांनी पैठणी उत्पादनाबाबत सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे या फॅक्टरीमध्ये दिव्यांग, निराधार, मूकबधिर तसेच विधवा महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचे काम केले जात असल्याचे आमदार सत्तार यांनी पाहिले. या उपक्रमाचे कौतुक करताना अशा माध्यमातून गरजू महिलांना रोजगाराचा आधार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिल्लोड येथील नॅशनल सहकारी सूतगिरणी येत्या काही दिवसांत सुरू होणार असून, त्यानंतर ‘कापूस ते कापड’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने पैठणी उद्योग महत्त्वाचा ठरू शकतो. सिल्लोड-सोयगाव परिसरात मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण कापसाचे उत्पादन होत असल्याने या उद्योगासाठी स्थानिक पातळीवर अनुकूल वातावरण असल्याची चर्चा यावेळी झाली. आमदार सत्तार यांनी नॅशनल सहकारी सूतगिरणीबाबतही बाळकृष्ण कापसे यांना माहिती दिली. कापसे पैठणीच्या प्रकल्पाची पाहणी करून हा उपक्रम शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असून, शासनाचे सहकार्य मिळाल्यास महिला, दिव्यांग, निराधार तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिल्लोडमध्ये मोठा उपक्रम उभा राहू शकतो, असा विश्वास आमदार सत्तार यांनी व्यक्त केला. सिल्लोड येथे पैठणी उद्योग उभारण्यासाठी यापुढेही सातत्याने पाठपुरावा करण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार सत्तार यांनी येवला येथील प्रसिद्ध पंडित पैठणी दुकानालाही सदिच्छा भेट देऊन पैठणी उद्योगातील बाजारपेठ, मागणी आणि ग्राहकांच्या पसंतीबाबत माहिती घेतली. यावेळी माजी उद्योग संचालक डॉ. जे. के. जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज राठोड, सिल्लोड शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पाटील तायडे, जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन पाटील गाढे, माजी पंचायत समिती उपसभापती अजिज शेठ बागवान, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे संचालक सयाजीराव वाघ, भोकरदन चे माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ हराळ, शकील जहागिरदार, रिजवान शेख आदी उपस्थित होते.1
- पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुळे जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव उज्वल माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.. कार्यकर्ता हा भाजपचा आत्मा आहे -माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर.. काँग्रेस सह विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात खोटा प्रचार करतात, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे.. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मुळे जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव उज्वल माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.. कार्यकर्ता हा भाजपचा आत्मा आहे -माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर.. काँग्रेस सह विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात खोटा प्रचार करतात, भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे.. आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुळे जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव उज्वल झाले असल्याचे मत भाजप नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी भाजपा जालना ग्रामीणच्या जिल्हा कार्यकारिणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्याची संवाद साधताना व्यक्त केले यावेळी जालना जिल्हा ग्रामीण कार्यकर्त्याची बैठक मुक्तेश्वर लॉन्स,कचेरीरोड,जुना जालना येथे सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष आ.नारायण कुचे, आ.संतोष पाटील दानवे, मा.आ.कैलास गोरंटयाल, मा.आ.विलास बापु खरात, भास्करराव पाटील दानवे, राहुल लोणीकर,सतिष घाटगे,रामेश्वर पाटील भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, ज्ञानेश्वर शेजुळ,शिवाजी बापु थोटे, विश्वजीत खरात,अनिलराव कोलते, गोविंद ढेंबरे, रमेश भापकर, संध्याताई देठे, जिजाबाई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना दानवे म्हणाले की 2014 पूर्वीचा भारत व 2026 च्या नंतरचा भारत या बारा वर्षाच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे झाली असल्यामुळे व 2014 नंतर ते 2026 मध्ये भारतातील रस्ते, रेल्वे, शिक्षण हे उत्तम दर्जाचे झाल्यामुळे भारत हा विकासाच्या दृष्टीने फार पुढे गेला आहे, जगामध्ये भारत देश हा 80% जनतेला मोफत रेशन देणारा हा पहिला देश आहे, जगातील अनेक देशांमध्ये अंतर्गत कलहा चालू आहे परंतु भारत देश हा शंताता प्रिय व लोकशाही माननारा देश आहे. भाजपामध्ये जुने कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन नवीन कार्यकर्त्याला संधी द्यावी लागेल त्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकामध्ये भाजपाची सत्ता स्थापन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन दानवे यांनी यावेळी व्यक्त केले.1
- अग्निशमन दलात रात्री ‘रामभरोसे’ कारभार? रात्री साडेअकराला अग्निशमन दलात ‘सन्नाटा’!.. कार्यालयात केवळ दोन कर्मचारी; दोघेही झोपेत, आपत्कालीन दूरध्वनी कक्षही कर्मचारीविना.. आग लागली तर फोन उचलणार कोण? जालना अग्निशमन दलाच्या रात्रीच्या ड्युटी व्यवस्थेचा माध्यम पथकाने केला पर्दाफाश!.. अग्निशमन दलात रात्री ‘रामभरोसे’ कारभार? रात्री साडेअकराला अग्निशमन दलात ‘सन्नाटा’!.. कार्यालयात केवळ दोन कर्मचारी; दोघेही झोपेत, आपत्कालीन दूरध्वनी कक्षही कर्मचारीविना.. आग लागली तर फोन उचलणार कोण? जालना अग्निशमन दलाच्या रात्रीच्या ड्युटी व्यवस्थेचा माध्यम पथकाने केला पर्दाफाश!..1
- जरांगे पाटील मुंबईला रवाना होत असताना परिवारासोबतचा भाऊक करणारा क्षण,1