logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणाला वेग; भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलाला अटक, पत्नी फरार.. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणाला वेग; भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलाला अटक, पत्नी फरार.. शिर्डी परिसरातील चार एकर जमिनीच्या गैरव्यवहार आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात मोठी कारवाई करत विशेष तपास पथकाने (SIT) भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुलाला अटक केली असून, पत्नी कल्पना खरात सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मूळ जमीनमालक शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास SIT कडे सोपवण्यात आला असून तपासाची दिशा खरात कुटुंबीयांकडे केंद्रित करण्यात आली आहे. दरम्यान, कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी SIT पथकाने कर्मयोगी नगर येथील ‘तृप्तबाला’ या आलिशान बंगल्यावर धडक कारवाई केली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच घराचा दरवाजा उघडण्यास नकार देण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी शेजारच्या भिंतीवरून उडी मारत नाट्यमय पद्धतीने बंगल्यात प्रवेश केला. पोलिसांनी संपूर्ण बंगल्याची कसून झडती घेतली, मात्र कल्पना खरात तेथे आढळून आली नाही. ती कारवाईच्या भीतीने फरार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच वेळी तपासासाठी भोंदूबाबा अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन अशोक खरात याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. ही कारवाई शिर्डी शहरालगत निघोज परिसरातील गट नंबर १०६/२ या जमिनीच्या संशयास्पद व्यवहाराशी संबंधित आहे. या प्रकरणात तीन महिला अधिकारी आणि एक पुरुष अधिकारी अशा विशेष पथकाने तपास सुरू ठेवला आहे. पुढील तपासात मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी या प्रकरणात अधिक खोलात जाऊन चौकशी सुरू केली असून, यामध्ये आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

2 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
2 hrs ago
67e90f5d-7648-4698-ba31-d7d1dc9bf6cc

शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणाला वेग; भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलाला अटक, पत्नी फरार.. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणाला वेग; भोंदूबाबा अशोक खरातच्या मुलाला अटक, पत्नी फरार.. शिर्डी परिसरातील चार एकर जमिनीच्या गैरव्यवहार आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणात मोठी कारवाई करत विशेष तपास पथकाने (SIT) भोंदूबाबा अशोक खरात याच्या मुलाला अटक केली असून, पत्नी कल्पना खरात सध्या फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मूळ जमीनमालक शेतकरी रावसाहेब गोंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास SIT कडे सोपवण्यात आला असून तपासाची दिशा खरात कुटुंबीयांकडे केंद्रित करण्यात आली आहे. दरम्यान, कल्पना खरात हिला अटक करण्यासाठी SIT पथकाने कर्मयोगी नगर येथील ‘तृप्तबाला’ या आलिशान बंगल्यावर धडक कारवाई केली. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच घराचा दरवाजा उघडण्यास नकार देण्यात आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी शेजारच्या भिंतीवरून उडी मारत नाट्यमय पद्धतीने बंगल्यात प्रवेश केला. पोलिसांनी संपूर्ण बंगल्याची कसून झडती घेतली, मात्र कल्पना खरात तेथे आढळून आली नाही. ती कारवाईच्या भीतीने फरार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच वेळी तपासासाठी भोंदूबाबा अशोक खरात याचा मुलगा हर्षवर्धन अशोक खरात याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. ही कारवाई शिर्डी शहरालगत निघोज परिसरातील गट नंबर १०६/२ या जमिनीच्या संशयास्पद व्यवहाराशी संबंधित आहे. या प्रकरणात तीन महिला अधिकारी आणि एक पुरुष अधिकारी अशा विशेष पथकाने तपास सुरू ठेवला आहे. पुढील तपासात मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी या प्रकरणात अधिक खोलात जाऊन चौकशी सुरू केली असून, यामध्ये आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..
    1
    जालन्यात कन्हैया नगर परिसरातील भीषण अपघात: भरधाव आयशर झाडावर आदळला; दोघांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा..
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 min ago
  • भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक
    1
    भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    7
    भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    user_D K G Pradesh Prasar
    D K G Pradesh Prasar
    Media house गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
    1
    मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली.
या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक  जालना आयुष नोपानी 
उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, 
गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे.
पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ​प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! ​ बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ​'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. ​लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ​ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.
    1
    ​प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट!
​
बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
​'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस'  या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे.
​लहान मुलांच्या जीवाशी खेळ?
ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे.
​ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    2
    बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    user_Motiram Narke
    Motiram Narke
    Local Politician बीड, बीड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by AapTak Hindi News Channel
    1
    Post by AapTak Hindi News Channel
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    1
    जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.