logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मंठा पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा; दोन आरोपींना अटक निम्न दुधना प्रकल्पातील प्रकरण;१९ वर्ष जुना वादातून खून केल्याची कबुली मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.

3 hrs ago
user_Sandip Gaikwad
Sandip Gaikwad
Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
3 hrs ago

मंठा पोलिसांकडून खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा; दोन आरोपींना अटक निम्न दुधना प्रकल्पातील प्रकरण;१९ वर्ष जुना वादातून खून केल्याची कबुली मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली. या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक जालना आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे. पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
    1
    मंठा तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारातील निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात 26 मार्च रोजी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
प्राथमिक तपासात मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी विविध कोनातून तपास सुरू केला. शवविच्छेदन अहवालानुसार हा खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान तांत्रिक माहिती, फिंगरप्रिंट व स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांपर्यंत पोहोचत तपासाची दिशा निश्चित केली.
या प्रकरणी विश्‍वनाथ साहेबराव आवचार राहणार विडोळी, तालुका. मंठा) व राजू गंगाधर धुमाळ राहणार आदर्श कॉलनी, परतूर) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी जुन्या वादातून खून केल्याची कबुली दिली आहे. 24 मार्च रोजी रात्री शेतामध्ये दोरीने गळा आवळून खून करून मृतदेह कालव्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक जालना अजयकुमार बन्सल,अपर पोलीस अधिक्षक  जालना आयुष नोपानी 
उपविभागीय पोलीस अधिकारी परतुर रामेश्वर रेंगे, यांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम देशमुख, 
गुन्ह्याचे तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक निलेश इधाटे,पोलीस उप निरीक्षक विठ्ठल केंद्रे, संतोष माळगे व तपास पथकातील सर्वच पोलीस अंमलदार यांनी अत्यंत महत्वाची भुमीका बजावली आहे.
पुढील तपास सुरू असून या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    1
    जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 min ago
  • भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक
    1
    भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • हिंगोली | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    1
    हिंगोली | प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच  जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते.
दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला.
सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे,  जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • ​प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! ​ बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ​'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. ​लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ​ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.
    1
    ​प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट!
​
बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
​'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस'  या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे.
​लहान मुलांच्या जीवाशी खेळ?
ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे.
​ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by वैजनाथ पावडे
    1
    Post by वैजनाथ पावडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    7
    भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।
    user_D K G Pradesh Prasar
    D K G Pradesh Prasar
    Media house गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    1
    जालना जिल्ह्यात ऑटो रिक्षा चालकांनी गॅस दरवाढ आणि कृत्रिम टंचाईच्या विरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.