logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महिला वाहतूक अधिकाऱ्यावर हल्ला; कर्तव्य बजावताना धक्काबुक्की – तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल महिला वाहतूक अधिकाऱ्यावर हल्ला; कर्तव्य बजावताना धक्काबुक्की – तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव : शहरातील लहूजी वस्ताद चौकात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला वाहतूक अधिकाऱ्यावर एका तरुणाने धक्काबुक्की करत कॉलर पकडून शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. “तुम्ही येथे कशी ड्युटी करता, मी पाहून घेतो” अशा शब्दांत धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे संबंधित तरुणाविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून कर्तव्यावर असलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामगिरी अप क्र. १६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३२, २९६, ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, बुलडाणा येथे कार्यरत असलेल्या म. स. के. संगीता बबनराव कटारे (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास त्या लहूजी वस्ताद चौक येथे वाहतूक नियमनाची ड्युटी पार पाडत असताना आरोपी पांडुरंग उर्फ शाम गजानन चांडुरकर (वय २८, रा. गजानन आईस फॅक्टरीजवळ, शेगाव) हा संतप्त अवस्थेत त्यांच्या अंगावर धावून आला. त्याने शर्टची कॉलर पकडत अश्लील शिवीगाळ केली तसेच दमदाटी करत शासकीय कामकाजात उघडपणे अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री ८.११ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक गवांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींवर पोलिसांनी लगाम घालावा, अशीही सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

1 hr ago
user_Sachin kadukar
Sachin kadukar
Photographer Shegaon, Buldhana•
1 hr ago
8a835c69-4a65-43fc-8027-86fd7041d02f

महिला वाहतूक अधिकाऱ्यावर हल्ला; कर्तव्य बजावताना धक्काबुक्की – तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल महिला वाहतूक अधिकाऱ्यावर हल्ला; कर्तव्य बजावताना धक्काबुक्की – तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल शेगाव : शहरातील लहूजी वस्ताद चौकात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला वाहतूक अधिकाऱ्यावर एका तरुणाने धक्काबुक्की करत कॉलर पकडून शिवीगाळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. “तुम्ही येथे कशी ड्युटी करता, मी पाहून घेतो” अशा शब्दांत धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळे संबंधित तरुणाविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून कर्तव्यावर असलेल्या महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामगिरी अप क्र. १६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३२, २९६, ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, बुलडाणा येथे कार्यरत असलेल्या म. स. के. संगीता बबनराव कटारे (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे. फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४० वाजताच्या सुमारास त्या लहूजी वस्ताद चौक येथे वाहतूक नियमनाची ड्युटी पार पाडत असताना आरोपी पांडुरंग उर्फ शाम गजानन चांडुरकर (वय २८, रा. गजानन आईस फॅक्टरीजवळ, शेगाव) हा संतप्त अवस्थेत त्यांच्या अंगावर धावून आला. त्याने शर्टची कॉलर पकडत अश्लील शिवीगाळ केली तसेच दमदाटी करत शासकीय कामकाजात उघडपणे अडथळा निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री ८.११ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास उपनिरीक्षक गवांडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, भर चौकात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींवर पोलिसांनी लगाम घालावा, अशीही सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *ॲड. जयश्री शेळके यांची पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी* बुलढाणा: जिल्ह्यात मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असताना नाफेडकडून केली जाणारी खरेदी मर्यादा अत्यंत तुटपुंजी आहे. उद्दिष्ट संपल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील अनेक मका खरेदी केंद्रे बंद करण्यात आली असून, यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढवून सर्व केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, बुलढाणा जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरीप हंगामात एकूण ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात अंदाजे २०,६१,३७२ क्विंटल मका उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात केवळ ६०,००० क्विंटल इतकेच खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे, जे एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. जिल्ह्यातील सुमारे ५,७०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे मका खरेदीसाठी रीतसर नोंदणी केलेली असतानाही, 'उद्दिष्ट पूर्ण झाले' असे कारण पुढे करून अनेक खरेदी केंद्रांवरील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. मका खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल शिल्लक आहे. याचा गैरफायदा खासगी व्यापारी घेत असून बाजारभाव पाडले जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यामध्ये सरकारविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. "एकीकडे शासन हमीभावाच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे प्रत्यक्षात खरेदी बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते, हे अन्यायकारक आहे," अशी भूमिका ॲड. जयश्री शेळके यांनी मांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपेक्षित मका उत्पादनाच्या प्रमाणात नाफेडचे खरेदी उद्दिष्ट तातडीने वाढवून द्यावे, बंद असलेली सर्व खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत आणि नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा मका हमीभावाने खरेदी केला जाईल याची खात्री करावी. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
    1
    *ॲड. जयश्री शेळके यांची पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी*
बुलढाणा: जिल्ह्यात मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असताना नाफेडकडून केली जाणारी खरेदी मर्यादा अत्यंत तुटपुंजी आहे. उद्दिष्ट संपल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील अनेक मका खरेदी केंद्रे बंद करण्यात आली असून, यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढवून सर्व केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, बुलढाणा जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरीप हंगामात एकूण ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात अंदाजे २०,६१,३७२ क्विंटल मका उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात केवळ ६०,००० क्विंटल इतकेच खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे, जे एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. जिल्ह्यातील सुमारे ५,७०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे मका खरेदीसाठी रीतसर नोंदणी केलेली असतानाही, 'उद्दिष्ट पूर्ण झाले' असे कारण पुढे करून अनेक खरेदी केंद्रांवरील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
मका खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल शिल्लक आहे. याचा गैरफायदा खासगी व्यापारी घेत असून बाजारभाव पाडले जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यामध्ये सरकारविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. "एकीकडे शासन हमीभावाच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे प्रत्यक्षात खरेदी बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते, हे अन्यायकारक आहे," अशी भूमिका ॲड. जयश्री शेळके यांनी मांडली आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील अपेक्षित मका उत्पादनाच्या प्रमाणात नाफेडचे खरेदी उद्दिष्ट तातडीने वाढवून द्यावे, बंद असलेली सर्व खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत आणि नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा मका हमीभावाने खरेदी केला जाईल याची खात्री करावी. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ​खामगाव : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल मध्यरात्रीपासूनच संपूर्ण शहर शिवमय झाले होते. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे प्रशासनाच्या वतीने आणि शिवप्रेमींच्या उत्साहाने करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ​सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे रात्री १२ वाजता झालेला शिवजन्मोत्सव. बाराचे ठोके पडताच संपूर्ण परिसर 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या फडकणाऱ्या ध्वजांच्या उपस्थितीत शिवभक्तांनी मोठा आनंद साजरा केला. ​यावेळी स्टेडियम परिसरात भव्य फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. आकाशात उमटणाऱ्या विविध रंगांच्या छटांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विद्युत रोषणाईने उजळलेले स्टेडियम आणि त्यात झालेली फटाक्यांची उधळण यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता.या सोहळ्यासाठी शहरातील अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. "छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," अशी भावना यावेळी अनेक शिवभक्तांनी व्यक्त केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
    4
    ​खामगाव : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल मध्यरात्रीपासूनच संपूर्ण शहर शिवमय झाले होते. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे प्रशासनाच्या वतीने आणि शिवप्रेमींच्या उत्साहाने करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. ​सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे रात्री १२ वाजता झालेला शिवजन्मोत्सव. बाराचे ठोके पडताच संपूर्ण परिसर 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या फडकणाऱ्या ध्वजांच्या उपस्थितीत शिवभक्तांनी मोठा आनंद साजरा केला. ​यावेळी स्टेडियम परिसरात भव्य फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. आकाशात उमटणाऱ्या विविध रंगांच्या छटांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विद्युत रोषणाईने उजळलेले स्टेडियम आणि त्यात झालेली फटाक्यांची उधळण यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता.या सोहळ्यासाठी शहरातील अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. "छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," अशी भावना यावेळी अनेक शिवभक्तांनी व्यक्त केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • 🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨 खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢 #Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice
    1
    🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨
खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢
#Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice
    user_DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    DIVYAVARHAD NEWS BULDHANA
    पत्रकार खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Asgar Khan in BCN news nagpur
    1
    Post by Asgar Khan in BCN news nagpur
    user_Asgar Khan in BCN news nagpur
    Asgar Khan in BCN news nagpur
    पत्रकार Akola, Maharashtra•
    17 hrs ago
  • Post by Samrat Dhole
    1
    Post by Samrat Dhole
    user_Samrat Dhole
    Samrat Dhole
    बार्शीटाकळी, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.
    1
    चुकीची आकडेवारी अन् लोकांचा विरोध; बुलढाणा हद्दवाढीचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    1
    कांद्या-बटाट्याऐवजी शेतात अफूचा मळा! मेहकर पोलिसांचा पांग्री काटे शिवारात छापा.*
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • उद्या म्हणजे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९९ वी जयंती आहे. 👉 कारण त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६२७ रोजी झाला होता. म्हणून २०२६ साली ३९९ वर्षे पूर्ण होतात. � ✔ सरकारी तारखेनुसार शिवजयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. �
    1
    उद्या म्हणजे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९९ वी जयंती आहे.
👉 कारण त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६२७ रोजी झाला होता.
म्हणून २०२६ साली ३९९ वर्षे पूर्ण होतात. �
✔ सरकारी तारखेनुसार शिवजयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. �
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter शेगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.