Shuru
Apke Nagar Ki App…
नगरपंचायत बाशिटाकळी एकता नगर परिस्थिति
Samrat Dhole
नगरपंचायत बाशिटाकळी एकता नगर परिस्थिति
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Samrat Dhole1
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1
- *ॲड. जयश्री शेळके यांची पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी* बुलढाणा: जिल्ह्यात मक्याचे विक्रमी उत्पादन झाले असताना नाफेडकडून केली जाणारी खरेदी मर्यादा अत्यंत तुटपुंजी आहे. उद्दिष्ट संपल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील अनेक मका खरेदी केंद्रे बंद करण्यात आली असून, यामुळे हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, मका खरेदीचे उद्दिष्ट तातडीने वाढवून सर्व केंद्रे पूर्ववत सुरू करावीत, अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड.जयश्री शेळके यांनी पणन मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, बुलढाणा जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरीप हंगामात एकूण ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात अंदाजे २०,६१,३७२ क्विंटल मका उत्पादन अपेक्षित आहे. मात्र, जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात केवळ ६०,००० क्विंटल इतकेच खरेदी उद्दिष्ट देण्यात आले आहे, जे एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहे. जिल्ह्यातील सुमारे ५,७०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे मका खरेदीसाठी रीतसर नोंदणी केलेली असतानाही, 'उद्दिष्ट पूर्ण झाले' असे कारण पुढे करून अनेक खरेदी केंद्रांवरील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. मका खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात माल शिल्लक आहे. याचा गैरफायदा खासगी व्यापारी घेत असून बाजारभाव पाडले जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून त्यांच्यामध्ये सरकारविरोधात तीव्र रोष निर्माण झाला आहे. "एकीकडे शासन हमीभावाच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे प्रत्यक्षात खरेदी बंद करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाते, हे अन्यायकारक आहे," अशी भूमिका ॲड. जयश्री शेळके यांनी मांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपेक्षित मका उत्पादनाच्या प्रमाणात नाफेडचे खरेदी उद्दिष्ट तातडीने वाढवून द्यावे, बंद असलेली सर्व खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत आणि नोंदणीकृत प्रत्येक शेतकऱ्याचा मका हमीभावाने खरेदी केला जाईल याची खात्री करावी. तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.1
- Post by Sharad Dayedar1
- खामगाव : अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल मध्यरात्रीपासूनच संपूर्ण शहर शिवमय झाले होते. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे प्रशासनाच्या वतीने आणि शिवप्रेमींच्या उत्साहाने करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे रात्री १२ वाजता झालेला शिवजन्मोत्सव. बाराचे ठोके पडताच संपूर्ण परिसर 'जय भवानी, जय शिवाजी'च्या जयघोषाने दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या फडकणाऱ्या ध्वजांच्या उपस्थितीत शिवभक्तांनी मोठा आनंद साजरा केला. यावेळी स्टेडियम परिसरात भव्य फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. आकाशात उमटणाऱ्या विविध रंगांच्या छटांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. विद्युत रोषणाईने उजळलेले स्टेडियम आणि त्यात झालेली फटाक्यांची उधळण यामुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह संचारला होता.या सोहळ्यासाठी शहरातील अबालवृद्धांनी मोठी गर्दी केली होती. तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. "छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," अशी भावना यावेळी अनेक शिवभक्तांनी व्यक्त केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.4
- 🚨 BREAKING: खामगाव दगडफेक प्रकरणाचे सत्य समोर! 🚨 खामगावातील दगडफेकीची घटना ही कोणत्याही समुदायाशी संबंधित नसून ती वैयक्तिक वादातून घडली आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता राखा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांनी केले आहे. 📢 #Khamgaon #BreakingNews #PoliceUpdate #KhamgaonCity #Alert #Truth #MaharashtraPolice1
- दारव्हा शहरातील कावेरी नगर परिसरात १६ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून १८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सै. आवेज सै. जमिल (वय २०, रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा) व इनायत अली इरफान अली (वय २५, रा. अशोक नगर पाटीपुरा, यवतमाळ) यांना अटक करण्यात आली होती. पोलीस तपासादरम्यान या प्रकरणात रजि अहमद खान युसूफ खान रा. दारव्हा याचे नावही समोर आले. त्याच्या सांगण्यावरून कावेरी नगर येथील सप्तशृंगी अक्वा या दुकानाच्या मालकाला ठार करण्याच्या उद्देशाने वरील दोन्ही आरोपी तेथे गेले असता, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या गौरव टारपे याच्यासोबत वाद झाला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणातील तिसरा मास्टर माईंड असलेला आरोपी रजि अहमद खान युसूफ खान याचा नेमका सप्तशृंगी एक्वा च्या मालकाशी काही दुश्मनी होती की, कोणाकडून सुपारी घेण्यात आली होती या बाजूनेही पोलीस तपास करीत आहेत.1
- उद्या म्हणजे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९९ वी जयंती आहे. 👉 कारण त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६२७ रोजी झाला होता. म्हणून २०२६ साली ३९९ वर्षे पूर्ण होतात. � ✔ सरकारी तारखेनुसार शिवजयंती दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. �1