Shuru
Apke Nagar Ki App…
राजूभाऊ सकट कार्यक्षम समाजसेवक
More news from महाराष्ट्र and nearby areas
- येवला तालुक्यातील गवंडगाव फाट्याजवळ ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर धडकेत सुरेश शिंदे (रा. सोयगाव) यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातात कारचा चक्काचूर झाला. त्याचवेळी जात असलेल्या डॉ. दिपाली क्षत्रिय यांनी तातडीने मदत करत जखमींना बाहेर काढले व CPR देऊन त्यांचे प्राण वाचवले. जखमींना येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिस तपास सुरू आहे.1
- महाराष्ट्र नासिक डॉ बाबासाहेब भीमराव अंबेडकर जयंती उत्सव घरकुल 20261
- येवल्याजवळ भीषण अपघात; डॉक्टर महिलेच्या प्रसंगावधामुळे दोघांचे प्राण वाचले नाशिक-संभाजीनगर महामार्गावर गवंडगाव शिवारात मालवाहू ट्रक आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत एक जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या एका महिला डॉक्टरने दाखवलेल्या देवदूतकीमुळे दोन जखमींचे प्राण वाचले आहेत. सुरेश भाऊराव शिंदे (रा. सोयगाव, मालेगाव) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गवंडगाव फाट्याजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की कारमधील प्रवासी अडकून पडले होते. डॉक्टरांच्या 'सीपीआर'ने दिले जीवदान अपघात झाला त्याच वेळी नाशिकच्या प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय या त्या मार्गावरून जात होत्या. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. दोन जखमींची प्रकृती अत्यंत खालावलेली असताना डॉ.दिपाली क्षत्रिय यांनी त्यांना जागेवरच सीपीआर (CPR) दिला. त्यांच्या या तातडीच्या उपचारामुळे दोघांचे प्राण वाचले असून त्यांना पुढील उपचारासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद येवला तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ. दिपाली चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- ठाणे :आज मोखाडा तालुक्यातील पळसपाडा येथे डॉ. सुमित ढाक यांच्या फार्मवर 'काजू प्रक्रिया युनिट'चा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रमोद पवार उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना प्रमोद पवार यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांनी केवळ उत्पादन न घेता त्यावर प्रक्रिया करून बाजारपेठ मिळवली पाहिजे. #डॉ.सुमित_ढाक यांनी सुरू केलेला हा उपक्रम स्थानिक रोजगारासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल. यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.1
- ठाणे :भिवंडी-वाडा आणि अंबाडी-शिरसाड या दोन्ही महत्त्वाच्या महामार्गांची अवस्था सध्या अत्यंत विदारक झाली आहे. ठेकेदाराचा मनमानी कारभार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) दुर्लक्ष यामुळे या रस्त्यांनी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनवला आहे. आज 'वारेट' येथे ऐन रस्त्यात दोन दिवसांपासून एक बस बंद पडून उभी असल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या भयंकर गैरसोयीवर आणि प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर 'भूमीपुत्र एल्गार संघटने'चे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी घटनास्थळी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचे आणि ठेकेदाराचे वाभाडे काढले आहेत. हे दोन्ही मार्ग परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत; मात्र, खड्डे, धूळ आणि अपूर्ण कामांमुळे दररोज गाड्या बिघडत आहेत. सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, या खड्ड्यांमुळे आणि धुळीमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. असे असतानाही सगळे सोयीस्करपणे गप्प आहेत. या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात जो कुणी आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यावर ठेकेदाराचे दलाल आणि हस्तक जाणीवपूर्वक खोटे आरोप करून त्याला बदनाम करण्यासाठी पुढे येतात. याच दडपशाहीला कंटाळून अनेक बोलणारी आणि हक्क मागणारी माणसं आता गप्प झाली आहेत. "तुम्ही सुद्धा बघा आणि शांत बसा" अशी उद्विग्न मानसिकता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. जनतेच्या या हतबलतेच्या काळात, प्रमोद पवार आणि त्यांची 'भूमीपुत्र एल्गार संघटना' या भ्रष्ट ठेकेदारी व्यवस्थेविरुद्ध सातत्याने लढा देत आहेत. पायाभूत सुविधा आणि ग्रामीण जनतेच्या हक्कांसाठी नेहमीच आक्रमक भूमिका घेणाऱ्या प्रमोद पवार यांनी आज वारेट येथील वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांच्या व्यथा मांडल्या. "दोन-दोन दिवस एक मोठी बस ऐन रस्त्यात बंद अवस्थेत पडून आहे आणि ती हटवण्यासाठी ठेकेदार किंवा संबंधित विभागाला वेळ मिळत नाही, यापेक्षा मोठा निष्काळजीपणा कोणता असू शकतो? ठेकेदाराच्या दलालांच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. जोपर्यंत या महामार्गांची अवस्था सुधारत नाही आणि निष्पाप लोकांचे जीव जाणं थांबत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष असाच सुरू राहील,"असा सज्जड इशारा प्रमोद पवार यांनी आज दिला आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलून या दोन्ही महामार्गांची दुरुस्ती केली नाही, तर आगामी काळात जनतेच्या रोषाला आणि तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.1
- Post by GBK news1
- जनहित न्यूज महाराष्ट्र1
- महाराष्ट्र नासिक डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव घरकुल 20261