पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा उद्यापासून प्रारंभ *दररोज चार लाख विद्यार्थ्यांना संविधानातील एका कलमाची माहिती; मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार उपक्रम* पिंपरी ता. ३१ भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ‘घर घर संविधान’ हा अभिनव उपक्रम उद्या, दि. १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी ११.०० वाजता वाल्हेकरवाडी येथील महापालिका शाळेत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये दररोज संविधानातील एका कलमाचे वाचन आणि त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरातील सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन, मूलभूत अधिकार व कर्तव्यांविषयी जनजागृती, संविधान मूल्यांवर आधारित विविध शैक्षणिक उपक्रम तसेच विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने समन्वय समितीची स्थापना केली असून, तिच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संबंधित संस्थांनी उपक्रमांचे आयोजन करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या उपक्रमासाठी ‘मानगाव पॅटर्न’चे प्रमुख संविधान अभ्यासक नूर खान पठाण हे शिक्षकांना विनामूल्य मार्गदर्शन करणार असून, संविधानातील विविध कलमे विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यासाठी विशेष प्रशिक्षणही देणार आहेत. *”भारतीय संविधान ही आपल्या लोकशाहीची पायाभरणी आहे. विद्यार्थ्यांना लहान वयापासून संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे. ‘घर घर संविधान’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, लोकशाही मूल्यांबाबत जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास आहे.”* *रवि लांडगे* *महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका* *“विद्यार्थ्यांना दररोज संविधानातील एका कलमाची माहिती त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगण्याचा हा उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरणार आहे. चार लाख विद्यार्थ्यांपर्यंत संविधानाचा संदेश पोहोचविण्याच्या या अभियानामुळे शालेय स्तरावर संविधान साक्षरतेची मजबूत पायाभरणी होईल. शिक्षणासोबत सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरेल.”* •*रविना अंगोळकर* *सभापती, शिक्षण समिती* *”भारतीय संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचा पाया असून त्यामधील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे अत्यंत आवश्यक आहे. ‘घर घर संविधान’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि समाजामध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होईल. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम प्रभावीपणे राबवून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत संविधानाचा विचार आणि लोकशाही मूल्ये पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”* – *डॉ. विजय सूर्यवंशी* *आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका*
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून ‘घर घर संविधान’ उपक्रमाचा उद्यापासून प्रारंभ *दररोज चार लाख विद्यार्थ्यांना संविधानातील एका कलमाची माहिती; मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये राबविण्यात येणार उपक्रम* पिंपरी ता. ३१ भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा प्रसार विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत ‘घर घर संविधान’ हा अभिनव उपक्रम उद्या, दि. १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सकाळी ११.०० वाजता वाल्हेकरवाडी येथील महापालिका शाळेत करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत महापालिकेच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये दररोज संविधानातील एका कलमाचे वाचन आणि त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येणार आहे. या माध्यमातून शहरातील सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन, मूलभूत अधिकार व कर्तव्यांविषयी जनजागृती, संविधान मूल्यांवर आधारित विविध शैक्षणिक उपक्रम तसेच विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने समन्वय समितीची स्थापना केली असून, तिच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळा, विद्यालये आणि महाविद्यालयांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. संबंधित संस्थांनी उपक्रमांचे आयोजन करून त्याचा अहवाल शिक्षण विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या उपक्रमासाठी ‘मानगाव पॅटर्न’चे प्रमुख संविधान अभ्यासक नूर खान पठाण हे शिक्षकांना विनामूल्य मार्गदर्शन करणार असून, संविधानातील विविध कलमे विद्यार्थ्यांपर्यंत सोप्या व प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यासाठी विशेष प्रशिक्षणही देणार आहेत. *”भारतीय संविधान ही आपल्या लोकशाहीची पायाभरणी आहे. विद्यार्थ्यांना लहान वयापासून संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे. ‘घर घर संविधान’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, लोकशाही मूल्यांबाबत जागरूकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास आहे.”* *रवि लांडगे* *महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका* *“विद्यार्थ्यांना दररोज संविधानातील एका कलमाची माहिती त्यांच्या मातृभाषेत समजावून सांगण्याचा हा उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरणार आहे. चार लाख विद्यार्थ्यांपर्यंत संविधानाचा संदेश पोहोचविण्याच्या या अभियानामुळे शालेय स्तरावर संविधान साक्षरतेची मजबूत पायाभरणी होईल. शिक्षणासोबत सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मोलाचा ठरेल.”* •*रविना अंगोळकर* *सभापती, शिक्षण समिती* *”भारतीय संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचा पाया असून त्यामधील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये विद्यार्थ्यांच्या मनात रुजविणे अत्यंत आवश्यक आहे. ‘घर घर संविधान’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि समाजामध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण होईल. महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत हा उपक्रम प्रभावीपणे राबवून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत संविधानाचा विचार आणि लोकशाही मूल्ये पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”* – *डॉ. विजय सूर्यवंशी* *आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका*
- बीड जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सकाळी 7 लाच पाहणी दौरा बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी दिनांक 31 ला सकाळी 7 वाजता बीड जिल्हा रुग्णालयात व्यवस्थेची तपासणी केली. त्यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यप्रणालीची बीडकरांना आठवण झाली. सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील विविध सोयी सुविधाचा आढावा घेतला. अत्याधुनिक उपचार पद्धती रुग्णांना मिळाल्या पाहिजेत अशा सूचना यावेळी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला केल्या. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील रुग्णाची अस्थेने चौकशी केली. त्यांना येणाऱ्या अडी अडचणी समजून घेतल्या.1
- खूप दिवसांनी आमच्या भागात पाणी आलं. 🙏 सर्वप्रथम मनापासून धन्यवाद त्या प्रत्येकाला ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला, लाईक केला, शेअर केला आणि आवाजाला साथ दिली. तुमच्या सहकार्यामुळे आज आम्हाला पाणी मिळालं. पण माझा अनुभव सांगतो की हा प्रश्न इथेच संपलेला नाही. यापूर्वीही काही दिवस पाणी नियमित आलं आणि नंतर पुन्हा पूर्वीसारखीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कायमस्वरूपी उपाय होईपर्यंत आम्ही हा प्रश्न मांडत राहणार. आमची एकच विनंती आहे—तात्पुरता नव्हे, तर कायमस्वरूपी आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार. 🙏1
- 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए। 🚨 “वंदे मातरम्” हमारे खून में है… उस पर राजनीति करना आपकी आदत है! 🇮🇳 हिम्मत है तो पहले अपने दिल्ली वाले मालिकों को “वंदे मातरम्” सिखाइए।1
- नागरिकांच्या सहकार्याने गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवू पिंपरीच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे आश्वासन पिंपरी : पिंपरी पोलीस ठाण्याच्या नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांचे विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील कायदा व सुव्यवस्था, वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये समन्वय वाढविण्यावर सविस्तर चर्चा झाली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ. इम्रान बॅग यांनी पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक संघटना आणि समाजबांधवांकडून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. गुन्हेगारीविरोधातील प्रत्येक मोहिमेत पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, अशी भूमिकाही त्यांनी व्यक्त केली. नवनियुक्त पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे यांनी स्वागताबद्दल उपस्थितांचे आभार मानत1
- “₹५० लाखांचा शेलार रोड प्रस्ताव कोणी रद्द केला? PMC अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; लखन वाघमारे पाण्यात बसून निषेध!”1
- "कुणाच्या बापाला घाबरणार नाही आणि कुठे झुकणार नाही असा आमचा नेता...!"1
- शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत शिरपूर शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी मध्यप्रदेशातील दोन आरोपी जेरबंद; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीसह ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत धुळे : महाराष्ट्रातील विविध प्रार्थनास्थळे व मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या मध्यप्रदेशातील दोन आरोपींना शिरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपींकडून ४ किलो १९९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व अन्य वस्तू तसेच रोख रक्कम असा एकूण ₹७,८३,४००/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे धुळे व नाशिक जिल्ह्यातील मंदिर चोरीचे एकूण ६ गुन्हे उघडकीस आले आहेत. दि. ३० जून २०२६ रोजी रात्री ९ ते दि. १ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान सावळदे, ता. शिरपूर येथील दत्त मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे ₹२२ ते ₹२५ हजारांची रोख रक्कम चोरीस गेली होती. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले आणि विविध तपासाच्या माध्यमातून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान मध्यप्रदेशातील सेंधवा परिसरातील सदीम गिलदार देवका (वय २७) आणि भिकला रामसिंग देवका (वय ३९), दोघेही रा. मोहाला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपींनी सावळदे येथील मंदिरासह इतर प्रार्थनास्थळांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात आरोपींनी शिरपूर शहरातील घर, सावळदे येथील झोपडी, दत्त मंदिर, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगावजवळील रामदेव महाराज मंदिर आणि सटाणाजवळील साईबाबा मंदिर येथे चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून ₹१९,३००/- रोख रक्कम, १,१३१ ग्रॅम वजनाचा चांदीचा घोडा, ८२० ग्रॅम वजनाचे ७८ चांदीचे घोडे, १,२६९ ग्रॅम वजनाचे ५ चांदीचे मुकुट, तसेच चांदीच्या पाटल्या, कडे, जोडवे, ब्रेसलेट, चैन, हार, छत्री, नाग आदी दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीसाठी वापरलेली लोखंडी टॅमी, स्पॅनर व पेंचीस अशी साधनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. उघडकीस आलेले ६ गुन्हे शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५२/२०२६ शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. २५६/२०२६ शिरपूर शहर पोलीस ठाणे – गु.र.नं. ३२०/२०२६ धुळे तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ३१६/२०२६ मालेगाव तालुका पोलीस ठाणे – गु.र.नं. ६३९/२०२६ सटाणा पोलीस ठाणे – गु.र.नं. २७१/२०२६ सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पोउनि. जितेंद्र महाजन तसेच गुन्हे शोध पथक व आर.सी.पी. पथकातील अधिकारी-अंमलदारांनी केली. शिरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे मंदिर चोरीच्या मालिकेचा छडा लागला असून, मोठ्या प्रमाणावर चांदीचे दागिने व चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.1
- "भर बँकेत मॅनेजरला कानशिलात!" "खामगाव सेंट्रल बँकेत नेमकं घडलं तरी काय?"1