मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न निर्धारित मुदतीत, समन्वयाने काम पूर्ण करावे – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण परभणी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून, महाराष्ट्रातही एप्रिल 2026 मध्ये हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दिनांक 11 फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणास सेलू उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, पाथरी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, गंगाखेड उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, परभणी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत 2002 च्या अंतिम मतदार यादीतील मतदारांचे 2025 च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. तसेच 2002 च्या यादीत नाव नसलेल्या मतदारांचे त्यांच्या आई-वडील अथवा आजी-आजोबा यांच्या नोंदीशी बीएलओ अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन मॅपिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याशिवाय मतदार यादीतील दुबार नोंदी, अस्पष्ट किंवा मानवी नसलेली छायाचित्रे यांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करताना एका केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदार जोडले जाणार नाहीत याची दक्षता घेऊन सुसूत्रीकरणाचे प्रस्ताव 15 मार्च 2026 पर्यंत तयार करण्याचे सूचनाही दिल्या गेल्या. भारत निवडणूक आयोगाने बीएलओ ॲपमध्ये मतदारांना संबंधित बीएलओंना कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, कॉल बुक झाल्यानंतर अर्जदारास प्रतिसाद देण्यासाठी कॉल बॅक करण्याची कार्यपद्धती देखील प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली. बीएलओ आर. एस. शिरसेवाड यांनी दुबार नोंदीबाबत कार्यवाही करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. आगामी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे बीएलओंना सहाय्य करण्यासाठी गावपातळीवरील कर्मचारी, संगणक ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी पीपीटीद्वारे उपस्थितांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षण अधिकारी, निवडणूक नायब तहसीलदार तसेच बीएलओ सुपरवायझर उपस्थित होते.
मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण संपन्न निर्धारित मुदतीत, समन्वयाने काम पूर्ण करावे – जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण परभणी (प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील 9 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत असून, महाराष्ट्रातही एप्रिल 2026 मध्ये हा कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दिनांक 11 फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणास सेलू उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, पाथरी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, गंगाखेड उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, परभणी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत 2002 च्या अंतिम मतदार यादीतील मतदारांचे 2025 च्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. तसेच 2002 च्या यादीत नाव नसलेल्या मतदारांचे त्यांच्या आई-वडील अथवा आजी-आजोबा यांच्या नोंदीशी बीएलओ अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन मॅपिंग कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याशिवाय मतदार यादीतील दुबार नोंदी, अस्पष्ट किंवा मानवी
नसलेली छायाचित्रे यांची पडताळणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले. मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करताना एका केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदार जोडले जाणार नाहीत याची दक्षता घेऊन सुसूत्रीकरणाचे प्रस्ताव 15 मार्च 2026 पर्यंत तयार करण्याचे सूचनाही दिल्या गेल्या. भारत निवडणूक आयोगाने बीएलओ ॲपमध्ये मतदारांना संबंधित बीएलओंना कॉल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, कॉल बुक झाल्यानंतर अर्जदारास प्रतिसाद देण्यासाठी कॉल बॅक करण्याची कार्यपद्धती देखील प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली. बीएलओ आर. एस. शिरसेवाड यांनी दुबार नोंदीबाबत कार्यवाही करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. आगामी विशेष सखोल पुनरिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे बीएलओंना सहाय्य करण्यासाठी गावपातळीवरील कर्मचारी, संगणक ऑपरेटर व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी पीपीटीद्वारे उपस्थितांना प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, गटशिक्षण अधिकारी, निवडणूक नायब तहसीलदार तसेच बीएलओ सुपरवायझर उपस्थित होते.
- Post by Ramesh Mulgir1
- तालुक्यातील मौजे बेलोरा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या फळबाग, पोखरा योजना तसेच सामाजिक वनीकरण योजनेत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे कायदेशीर अर्ज सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, गावातील ग्रामरोजगार सहाय्यक व कृषी सहाय्यक यांनी संगनमत करून शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर फळबाग, पोखरा योजना व सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत झाडे प्रत्यक्षात न लावता अनुदान काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासनाची योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी असताना संबंधित अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी व काल्पनिक अहवाल तयार करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होण्यासोबतच शेतकऱ्यांचाही विश्वासघात झाल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. शासनाच्या निधीचा अपहार करणे हा भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असल्याने संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी तात्काळ चौकशी समिती नेमून सर्व कागदपत्रे व नोंदींची पडताळणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेण्यात टाळाटाळ झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.1
- शासनाचा नदी जोड प्रकल्प मोठा आहे परंतु सध्या पडीक बंधारे दुरुस्त करण्याची वेळ आहे हिकमत दादा आमदार घनसांगी1
- Post by Parmeshor Khoje1
- जालना शहरातील आझाद मैदान परिसरात असलेल्या अंकुश कोचिंग क्लासेस येथे विजेचा धक्का लागून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुधवारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करण मोरे (वय १८, रा. खरपुडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक कोचिंग क्लासच्या इमारतीवर टँकरद्वारे पाणी चढवण्याचे काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली. या प्रकरणात जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत काही नागरिकांनी सदर बाजार पोलीस ठाण्यातही गर्दी केली. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तसेच सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.1
- पुसरा येथील मेंढपाळ बांधव यांना मारहाण. वडवणी प्रतिनिधी- वडवणी तालुक्यातील पुसरा येथील मेंढपाळ बांधव लहू बीटे आणि बाबा बीटे यांना झालेली मारहाण ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. गाडीचे झालेले नुकसान भरून दिल्यानंतरही, केवळ सत्तेच्या किंवा पैशाच्या माजातून गरीब मेंढपाळांना ढोरासारखे मारणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. तातडीने गुन्हा दाखल: संबंधित मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा. पोलीस अधीक्षक हस्तक्षेप: बीड जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या घटनेची स्वतः दखल घेऊन पीडित मेंढपाळ बांधवांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी नागरिकांनी केली आहे.1
- जय मल्हार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यापेक्षा मोठे आमच्यासाठी कोणीही नाही सर्व महापुरुष हे आमच्यासाठी आमचा मान अभिमान स्वाभिमान आणि सर्व काही आहेत आणि आज बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाची खाडाखोड होत असताना आम्ही शांत बसणार नाही अनेक समाज बांधव यांचे मला फोन आले आणि 16 तारखेच्या आंदोलनाला माझी भूमिका काय राहील हे विचारली त्यांना माझे मी मत सांगतोय की मी वैयक्तिक किंवा यशवंत संघर्ष सेना 16 तारखेला मुंबईला जाणार नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे एसटी आरक्षणाची लढाई लढत असताना हे जाणीवपूर्वक अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो टाकत नाहीत, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानामध्ये आरक्षण दिले आहे त्याच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावायला लाज वाटते उपकार विसरले छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो लावू शकत नाहीत स्व. बी. के. कोकरे साहेब यांना विसरले आपल्याच नेत्यांना शिव्या देणे सोशल मीडिया मध्ये काम करणाऱ्या बांधवाना शिव्या देणे फक्त स्वतःच्या स्टंटबाजीसाठी समाज बांधवांचा जीव धोक्यात घालून आपलाच फोटो टाकून मुंबईला चला आणि परत माघारी फिरा या भूमिकेमुळे1
- जुने जे प्रकल्प आहेत ते बंद पडले आहेत त्यांना सुरू करण्यात यावे अशी मागणी हिकमत दादा उढान यांनी केली1