पावसाळापूर्व नाले सफाई मोहिमेला वेग.... KMC Action मोडवर कोल्हापूर, ता. ९ : पावसाळ्यापूर्वी शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा व नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या आरोग्य विभागामार्फत नाले, चॅनेल व ओढे सफाई मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. दिनांक २३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेलद्वारे कामाला वेग देण्यात आला आहे. महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नालेसफाईचे काम सुरू आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी गाळ, कचरा व अडथळे दूर करण्यात आले असून पावसाळ्यापूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. कामाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे : १) मनुष्यबळाद्वारे सफाई – एकूण ४७६ ठिकाणांपैकी २४६ ठिकाणांची सफाई पूर्ण (६४ टक्के) २) JCB यंत्राद्वारे सफाई – एकूण २०६ ठिकाणांपैकी ८७ ठिकाणांची सफाई पूर्ण (४० टक्के) ३) पोकलॅंड मशिनद्वारे सफाई – एकूण २१ ठिकाणांपैकी ७ ठिकाणांची सफाई पूर्ण, ४ ठिकाणी काम सुरू (५२ टक्के) या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र मनुष्यबळ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पथक क्रमांक १ मध्ये २४ कर्मचारी तर पथक क्रमांक २ मध्ये २९ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच भाडेतत्त्वावर ३ पोकलॅंड, ३ JCB व ४ डंपर तैनात करण्यात आले असून महानगरपालिकेच्या स्वतःच्या १ पोकलॅंड मशिनचाही वापर सुरू आहे. मोठ्या नाल्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः ५० फूट लॉगबूम पोकलॅंड मशिनद्वारे सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्व सर्व नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही कचरा नाल्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
पावसाळापूर्व नाले सफाई मोहिमेला वेग.... KMC Action मोडवर कोल्हापूर, ता. ९ : पावसाळ्यापूर्वी शहरातील पाण्याचा निचरा सुरळीत राहावा व नागरिकांना पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकाच्या आरोग्य विभागामार्फत नाले, चॅनेल व ओढे सफाई मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. दिनांक २३ मार्च २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेलद्वारे कामाला वेग देण्यात आला आहे. महानगरपालिकेने शहरातील विविध भागांमध्ये मनुष्यबळ तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने नालेसफाईचे काम सुरू आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी गाळ, कचरा व अडथळे दूर करण्यात आले असून पावसाळ्यापूर्व तयारी अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. कामाची सद्यस्थिती पुढीलप्रमाणे : १) मनुष्यबळाद्वारे सफाई – एकूण ४७६ ठिकाणांपैकी २४६ ठिकाणांची सफाई पूर्ण (६४ टक्के) २) JCB यंत्राद्वारे सफाई – एकूण २०६ ठिकाणांपैकी ८७ ठिकाणांची सफाई पूर्ण (४० टक्के) ३) पोकलॅंड मशिनद्वारे सफाई – एकूण २१ ठिकाणांपैकी ७ ठिकाणांची सफाई पूर्ण, ४ ठिकाणी काम सुरू (५२ टक्के) या मोहिमेसाठी दोन स्वतंत्र मनुष्यबळ पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पथक क्रमांक १ मध्ये २४ कर्मचारी तर पथक क्रमांक २ मध्ये २९ कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच भाडेतत्त्वावर ३ पोकलॅंड, ३ JCB व ४ डंपर तैनात करण्यात आले असून महानगरपालिकेच्या स्वतःच्या १ पोकलॅंड मशिनचाही वापर सुरू आहे. मोठ्या नाल्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी विशेषतः ५० फूट लॉगबूम पोकलॅंड मशिनद्वारे सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्व सर्व नालेसफाई वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांनीही कचरा नाल्यात टाकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
- सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईमध्ये तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आता राज्याच्या प्रशासनात एक नवे पर्व सुरू होईल, असे मानले जात आहे.1
- नसरापूर अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात काढला मोर्चा ; नागरिक मोठ्या संख्येने सहभागी विक्रम शिंदे /भोर दि.१० नसरापूर येथे चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकातून मूक मोर्चा काढण्यात आला. “चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे” आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात पीडित मुलीचे आई-वडीलही सहभागी झाले होते. पुणे शहरातील विविध भागांतून नागरिक, महिला आणि लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संताप व्यक्त केला.1
- सोलापूर जिल्ह्यातील धनश्री पवारने वडिलांचे प्रेत घरात असतानाही अवघ्या दीड तासात मराठीचा पेपर दिला. या स्थितीतही तिने 65 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या जिद्दीची आणि संघर्षावर मात करण्याच्या वृत्तीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.1
- तळेगाव एमआयडीसीत आठव्या मजल्यावरून उडी; ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू... मावळ पुणे :- मावळमधील तळेगाव एमआयडीसी परिसरात अर्बन लाईफ टॉवर सोसायटीत एका ३५ वर्षीय महिलेने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.प्रतिभा शंकर असे मृत महिलेचे नाव असून, पतीसोबत झालेल्या वादानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.घटनेनंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या प्रकरणात घरगुती वादाचे नेमके कारण काय होते आणि महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले होते का, याचा तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.... : लक्ष्मण कांबळे,पोलीस उपनिरीक्षक तळेगाव MIDC #तळेगाव #मावळ #तळेगावएमआयडीसी #अर्बनलाईफटॉवर #महिलेचामृत्यू #घरगुतीवाद #पोलीसतपास #पुणेबातम्या #Talegaon #Maval #TalegaonMIDC #UrbanLifeTower #WomanDeath #DomesticDispute #PoliceInvestigation #PuneNews1
- पुण्यात वादळी वाऱ्यामुळे पुणे मेट्रोच्या बांधकामावरील पत्रे उडून गेली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मेट्रोच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1
- महामेट्रोच्या कामामुळे निगडी महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा जीव गेला. या घातक प्रकारामुळे पिंपरी चिंचवडकरांनी महामेट्रो संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.1
- नवी मुंबईतील खारघर येथे ५६ लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या टोळीतील दोघांना तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींकडून ५६ लाखांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ते तासगाव तालुक्यातील विसापूर येथील आहेत. खारघर आणि तासगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे ही मोठी यशस्वी कारवाई झाली.1
- सोलापूर शहरात मार्केट यार्ड परिसरातील एका घरात दिवसाढवळ्या धाडसी घरफोडी झाली असून, अज्ञात चोरट्याने तीन तोळे सोने आणि ४० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे.1
- पुणे जिल्ह्यातील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलाला मोठे भगदाड पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या महत्त्वाच्या पुलाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती व स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.1