गॅस टंचाईचा घाव! Parle-G उत्पादन ठप्प; 500 कामगार रस्त्यावर येण्याच्या उंबरठ्यावर.. Parle-G उत्पादन ठप्प! गॅस टंचाईने खामगावचा उद्योग कोलमडला — 500 कामगारांवर बेरोजगारीचे संकट बुलढाणा : सर्वसामान्यांच्या चहासोबत अविभाज्य नातं असलेल्या Parle-G बिस्किटाच्या उत्पादनाला बुलढाणा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. खामगाव येथील ‘शिवांगी बेकर्स’ कारखाना ११ मार्चपासून पूर्णपणे बंद असून तब्बल ५०० कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. आखाती देशांतील युद्धाचे परिणाम आता थेट स्थानिक उद्योगांवर उमटताना दिसत आहेत. गॅसच्या तीव्र टंचाईमुळे कारखान्याला आवश्यक पुरवठा मिळत नसल्याने संपूर्ण उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. दररोज सुमारे ८० टन बिस्किटांचे उत्पादन करणाऱ्या या कारखान्यात ६० टन ग्लुकोज व २० टन क्रीम बिस्किटे तयार केली जात होती. मात्र, ओव्हन पूर्णपणे गॅसवर चालत असल्याने पुरवठा खंडित होताच उत्पादनाला अचानक ब्रेक लागला. कंपनीचे संचालक अभय अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, * “दररोज ३ टन गॅस लागतो, पण पुरवठा होत नाही.” * “दोन्ही उत्पादन लाईन बंद असून कामगारांवर मोठं आर्थिक संकट ओढावण्याची भीती आहे.” प्रशासनाला इशारा : बिस्किट उत्पादन हा अत्यावश्यक उद्योग असतानाही गॅस पुरवठा ठप्प असल्याने कंपनीने तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. अन्यथा खामगावचा महत्त्वाचा उद्योग कोलमडून शेकडो कुटुंबांवर उपासमारीचे संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे. गॅस टंचाईमुळे उद्योग ठप्प — आता प्रशासन काय भूमिका घेणार?
गॅस टंचाईचा घाव! Parle-G उत्पादन ठप्प; 500 कामगार रस्त्यावर येण्याच्या उंबरठ्यावर.. Parle-G उत्पादन ठप्प! गॅस टंचाईने खामगावचा उद्योग कोलमडला — 500 कामगारांवर बेरोजगारीचे संकट बुलढाणा : सर्वसामान्यांच्या चहासोबत अविभाज्य नातं असलेल्या Parle-G बिस्किटाच्या उत्पादनाला बुलढाणा जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. खामगाव येथील ‘शिवांगी बेकर्स’ कारखाना ११ मार्चपासून पूर्णपणे बंद असून तब्बल ५०० कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. आखाती देशांतील युद्धाचे परिणाम आता थेट स्थानिक उद्योगांवर उमटताना दिसत आहेत. गॅसच्या तीव्र टंचाईमुळे कारखान्याला आवश्यक पुरवठा मिळत नसल्याने संपूर्ण उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. दररोज सुमारे ८० टन बिस्किटांचे उत्पादन करणाऱ्या या कारखान्यात ६० टन ग्लुकोज व २० टन क्रीम बिस्किटे तयार केली जात होती. मात्र, ओव्हन पूर्णपणे गॅसवर चालत असल्याने पुरवठा खंडित होताच उत्पादनाला अचानक ब्रेक लागला. कंपनीचे संचालक अभय अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, * “दररोज ३ टन गॅस लागतो, पण पुरवठा होत नाही.” * “दोन्ही उत्पादन लाईन बंद असून कामगारांवर मोठं आर्थिक संकट ओढावण्याची भीती आहे.” प्रशासनाला इशारा : बिस्किट उत्पादन हा अत्यावश्यक उद्योग असतानाही गॅस पुरवठा ठप्प असल्याने कंपनीने तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. अन्यथा खामगावचा महत्त्वाचा उद्योग कोलमडून शेकडो कुटुंबांवर उपासमारीचे संकट येण्याची भीती व्यक्त होत आहे. गॅस टंचाईमुळे उद्योग ठप्प — आता प्रशासन काय भूमिका घेणार?
- User10183Khamgaon, Buldhana👏on 19 March
- Post by Shivaji Bhosale1
- भारत देश त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य परिस्थिती आहे. याला जनता जबाबदार आहे1
- Post by Santosh Bahekar PRESS1
- अशोक खरातांना वाचवणारे सत्तेत बसलेत, हर्षवर्धन सपकाळांचा सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by स्मिता तलेय1
- Post by Shaha News Marathi1
- खामगांव : जन सामान्यांसाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक महत्वकांशी योजना सुरू केल्या आहेत, या योजणांचा लाभ प्रत्येक घटकातील गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करा,त्यांना त्यांचा लाभ द्या आणि जनसंघापासून भाजपाचे देशासाठी असलेले अंत्योदयाचे स्वप्न पूर्ण करा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अँड. आकाश फुंडकर यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. खामगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गास आज 3 मार्च रोजी श्रीहरी लॉन्स खामगाव येथे प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन ना. अँड. आकाश फुंडकर यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व भारत माता पूजनाने करण्यात आले त्यावेळी ते भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. जनसंघापासून बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला हा पक्ष आज जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेला आहे. पक्षासाठी अनेकांनी दिलेले बलिदान व सतत झटणारे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. देश सेवेसाठी नेहमी सतत करत असलेले कार्य व जनहितासाठी आपल्या सरकारने आणलेल्या योजना व त्या प्रभावीपणे राबवून जनसामान्यांना दिलेला त्यांचा लाभ या लोकांना माहिती असाव्या व ज्या गरजूना लाभ मिळाला नाही अश्या सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी असे प्रशिक्षण वर्ग सातत्याने भाजपाच्या वतीने राबविण्याचा उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकारने समाजातील प्रत्येक घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत व त्या प्रभावीपणे राबविले सुद्धा जात आहेत. परंतु अजूनही अनेक गरजू व्यक्तींना या शासकीय योजनांचा लाभ कसा मिळावा व योजना कशा आहेत याची काहीच माहिती नाही. त्यामुळे समाजातील प्रत्येक वंचित गोरगरीब प्रत्येक नागरिकाला या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचा आणि जो ज्या योजनेत बसत असेल त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊन त्यांची मदत करा जेणेकरून आपल्याला सुद्धा पुण्य लाभेल व गरजू व्यक्तींचे सुद्धा आयुष्य उज्वल होईल. प्रधानमंत्री आवास योजना, पी एम किसान योजना,कौशल्य विकास योजना,जलजीवन योजना अशा शेकडो अनेक योजना मार्फत शेतकरी व इतर सर्व घटकातील नागरिकांना लाभ मिळत आहे. विद्यार्थी,नोकरदार असो वा इतर क्षेत्रातील प्रत्येकासाठी कोणती न कोणती चांगल्या लाभाची योजना सरकारने आणलेल्या आहेत. आयुष्मान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा आरोग्य संबंधितही योजनेमार्फत कोट्यावधी रुग्णांना याचा लाभ होत आहे. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आपण महामारीवर मात केली. देशातील करोडो नागरिकांनाच नव्हे तर जगातील अनेक देशांना आपण व्हॅक्सिन देऊन जीवनदान दिले व मानवता जोपसली. त्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याण योजना सुरू केली त्या अंतर्गत देशातील सुमारे 50 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले होते आजही देणे सुरू आहे. असे अनेक कल्याणकारी कार्य आपले सरकार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत करत आहे याची माहिती प्रचार व प्रसार करून प्रत्येकापर्यंत पोहोचवावा जेणेकरून भाजपाचे देशसेवा व समाजसेवा हेच कार्य आहे असे अभिमानाने सांगून पटवून द्या. लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांनी दिलेला शत प्रतिषद भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेला मेरा बूथ सबसे मजबूत हा नारा सदैव लक्षात ठेवून जनसेवेसाठी सदैव तत्पर रहा व भारतीय जनता पार्टीचा पक्ष विस्तार आणखी वाढेल यासाठी सातत्याने प्रयत्न करा असे आवाहन सुद्धा यावेळी ना. अँड. आकाश फुंडकर यांनी केले. या उद्घाटनचा सत्रास भाजपा खामगाव जिल्हा व खामगाव मतदार संघातील प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आज झालेल्या प्रशिक्षण वर्गास आपली (कार्यकर्ता सांभाळणे ) या विषयावर भाजपा सोशल मीडिया प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर, मन की बात बूथ व्यवस्थापन भाजपा जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी, SIR विशेष सखोल निरीक्षण या विषयावर याचे खामगाव प्रमुख तथा भाजपा जिल्हा सचिव संजय शिनगारे, कार्य विस्तार आमची दृष्टी खामगाव तालुका सरचिटणीस वैभव डवरे, वैचारिक अधिष्ठान शेखर कुलकर्णी, केंद्र व राज्य सरकार योजना व सरकारची कामगिरी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेवराव मानकर, इतिहास व विकास ज्येष्ठ नेते संतोषराव देशमुख, व मीडिया, सोशल मीडिया, AI, नमो ॲप या विषयावर सोशल मीडियाचे जिल्हा संयोजक रोहन जयस्वाल यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.2