logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी श्यामार्य कन्या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी उदगीर (प्रतिनिधी) श्यामार्य कन्या विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महान प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा जागर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता देशमुख या होत्या, तर पर्यवेक्षक राहुल लिमये यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते, भाषणे व विचार सादर केले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भाषण स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या प्रभावी वक्तृत्वातून राष्ट्रप्रेम, सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि महापुरुषांचे विचार प्रभावीपणे मांडले. स्पर्धेमुळे विद्यार्थिनींच्या वक्तृत्वकलेला चालना मिळाली तसेच आत्मविश्वासातही भर पडली. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापिका संगीता देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, स्वराज्याची संकल्पना आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा आदर्श विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले. पर्यवेक्षक राहुल लिमये यांनीही विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, वक्तृत्वकला आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यालयात देशभक्ती, सामाजिक समता आणि प्रेरणादायी विचारांचा संदेश विद्यार्थिनींपर्यंत प्रभावीपणे रुजवण्यात आले. भाषण स्पर्धेचे परीक्षक म्हणून माधव कांबळे व संगीता सुतार यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी स्पर्धकांचे मार्गदर्शन करत त्यांच्या सादरीकरणाचे मूल्यमापन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन साक्षी बिरादार व स्नेहा मोरतळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय व यशस्वी तयारी संगीता खादीवाले यांनी पार पाडली.

5 hrs ago
user_Laxman Ugile
Laxman Ugile
उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
d672d7e8-10fa-4281-992c-eade4971030f

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी श्यामार्य कन्या विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी उदगीर (प्रतिनिधी) श्यामार्य कन्या विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महान प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा जागर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता देशमुख या होत्या, तर पर्यवेक्षक राहुल लिमये यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थिनींनी लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते, भाषणे व विचार सादर केले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भाषण स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने विद्यार्थिनींनी स्पर्धेत सहभाग घेऊन आपल्या प्रभावी वक्तृत्वातून राष्ट्रप्रेम, सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि महापुरुषांचे विचार प्रभावीपणे मांडले. स्पर्धेमुळे विद्यार्थिनींच्या वक्तृत्वकलेला चालना मिळाली तसेच आत्मविश्वासातही भर पडली. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापिका संगीता देशमुख यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, स्वराज्याची संकल्पना आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा आदर्श विद्यार्थिनींनी आपल्या जीवनात अंगीकारावा, असे आवाहन केले. पर्यवेक्षक राहुल लिमये यांनीही विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, वक्तृत्वकला आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यालयात देशभक्ती, सामाजिक समता आणि प्रेरणादायी विचारांचा संदेश विद्यार्थिनींपर्यंत प्रभावीपणे रुजवण्यात आले. भाषण स्पर्धेचे परीक्षक म्हणून माधव कांबळे व संगीता सुतार यांनी जबाबदारी पार पाडली. त्यांनी स्पर्धकांचे मार्गदर्शन करत त्यांच्या सादरीकरणाचे मूल्यमापन केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन साक्षी बिरादार व स्नेहा मोरतळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय व यशस्वी तयारी संगीता खादीवाले यांनी पार पाडली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले. हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली. दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली
    1
    कारंजा चौकात गंगा-जमुनी संस्कृतीचे दर्शन; संदल व मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
अक्कलकोट शहरातील कारंजा चौक येथे हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या भव्य संदल मिरवणुकीसह गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणुकीमुळे धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुनी संस्कृतीचे प्रेरणादायी दर्शन घडले.
हजरत पीर शहाहुसेनी बाबा (र.अ.) यांच्या पवित्र संदल मिरवणुकीत हजारो भाविकांनी श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने सहभाग घेतला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्यांचा गजर, धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
याचवेळी गोल्ल समाजाच्या वतीने आयोजित मरीआई देवी (थंडी) मिरवणूकही मोठ्या उत्साहात पार पडली. कारंजा चौक परिसरात दोन्ही मिरवणुकांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. विविध समाज आणि सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत मिरवणुकांचे स्वागत केले, त्यामुळे अक्कलकोटच्या सामाजिक ऐक्याची आणि परस्पर सौहार्दाची परंपरा पुन्हा अधोरेखित झाली.
दोन्ही धार्मिक मिरवणुकांमुळे शहरात दिवसभर भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. शांतता, बंधुभाव आणि परस्पर आदराच्या भावनेतून पार पडलेल्या या सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष स्वागत करण्यात आले.
अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास यांच्या कडून मिळाली
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Fitness Trainer अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती घोटा देवी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी 👏👏👏👏 (प्रतिनिधी): हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वैजनाथ पावडे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी व मेंढपाळ समाजातील मुलांना या दोन्ही महान विभूतींच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, "महान पुरुषांचे विचार, त्याग, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. चांगले संस्कार, शिक्षण आणि समाजहिताची भावना जोपासून आपणही समाजसुधारक म्हणून कार्य केले, तर आपल्या जीवनालाही खरा अर्थ प्राप्त होईल. जयंती व पुण्यतिथी हे केवळ स्मरणाचे दिवस नसून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा देणारे दिवस आहेत." यावेळी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आश्रमातील विद्यार्थी, मेंढपाळ समाजातील मुले तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही महान व्यक्तींच्या विचारांचे पालन करून शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा यांचा संकल्प केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि महान व्यक्तींच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
    1
    वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 
घोटा देवी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
👏👏👏👏
(प्रतिनिधी): हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या निवासस्थानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वैजनाथ पावडे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी व मेंढपाळ समाजातील मुलांना या दोन्ही महान विभूतींच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, "महान पुरुषांचे विचार, त्याग, शिक्षणप्रेम आणि समाजसेवेची प्रेरणा प्रत्येकाने आपल्या जीवनात उतरवली पाहिजे. चांगले संस्कार, शिक्षण आणि समाजहिताची भावना जोपासून आपणही समाजसुधारक म्हणून कार्य केले, तर आपल्या जीवनालाही खरा अर्थ प्राप्त होईल. जयंती व पुण्यतिथी हे केवळ स्मरणाचे दिवस नसून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा देणारे दिवस आहेत."
यावेळी नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आश्रमातील विद्यार्थी, मेंढपाळ समाजातील मुले तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही महान व्यक्तींच्या विचारांचे पालन करून शिक्षण, शिस्त आणि समाजसेवा यांचा संकल्प केला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि महान व्यक्तींच्या विचारांबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
    3
    बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी
नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण

 दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार 
बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी
नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली.
या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा
    1
    तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा
तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार! परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    1
    मनसेकडून परंडा पोलीस स्टेशनच्या दोन नवपदोन्नत हवालदारांचा जाहीर सत्कार!
परंडा पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी रमेश नारायण शिरसागर आणि शिवानंद भीमाशंकर स्वामी यांची पोलीस नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
    user_Vijay Meher
    Vijay Meher
    Salesperson परंडा, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    1
    ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे
    user_दत्ता. सखाराम. बळी
    दत्ता. सखाराम. बळी
    गेवराई, बीड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल बीड प्रतिनिधी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.
    4
    लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे

 राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल 

लेखन प्रेरणा दिन म्हणून यावर्षीपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी करण्यास सुरुवात — माणिक वाघमारे
राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल 
बीड प्रतिनिधी :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस "लेखन प्रेरणा दिन" म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी  अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी "लेखन प्रेरणा दिन" ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.
ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला "लेखन प्रेरणा दिन" म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.
    user_बालाजी जगतकर
    बालाजी जगतकर
    Farmer बीड, बीड, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • लोकस्वराज्य आंदोलन इसारा परिषद नांदेड 1आगस्ट 2026 सत्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती निमित्त नांदेड लोकस्वराज्य आंदोलन इसारा परिषद नांदेड 1आगस्ट 2026 सत्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती निमित्त नांदेड
    1
    लोकस्वराज्य आंदोलन इसारा परिषद नांदेड 1आगस्ट 2026 सत्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती निमित्त नांदेड 
लोकस्वराज्य आंदोलन इसारा परिषद नांदेड 1आगस्ट 2026 सत्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती निमित्त नांदेड
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.