जालन्यात महिनाभरानंतर दमदार पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी; वातावरणात गारवा, पिकांना नवसंजीवनीची आशा जालन्यात महिनाभरानंतर दमदार पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी; वातावरणात गारवा, पिकांना नवसंजीवनीची आशा आज दिनांक 17 गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरासह परिसरात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर दमदार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली असली तरी पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचे भाव दिसून आले. मागील सुमारे महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट निर्माण झाले होते.
जालन्यात महिनाभरानंतर दमदार पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी; वातावरणात गारवा, पिकांना नवसंजीवनीची आशा जालन्यात महिनाभरानंतर दमदार पाऊस; शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी; वातावरणात गारवा, पिकांना नवसंजीवनीची आशा आज दिनांक 17 गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरासह परिसरात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर दमदार पावसाने हजेरी लावली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली असली तरी पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचे भाव दिसून आले. मागील सुमारे महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट निर्माण झाले होते.
- रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. रेल्वे प्रश्नांवर खासदार डॉ. कल्याण काळे यांचा आक्रमक पाठपुरावा नांदेड : जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सुविधा, सुरक्षा आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पांना गती देण्यासाठी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी नांदेड येथे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा केली.1
- भोकरदन नगरपरिषदेचे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते संपन्न स्वत च्या राहत्या घराची जागा बौद्ध विहारासाठी दान करणाऱ्या मातेचा नगरपरिषदेकडून सन्मान भोकरदन इसरारखान पठाण आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भोकरदन नगरपरिषद कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिनाचे ध्वजारोहण शहरातील त्यागाची मूर्ती असलेल्या ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई उत्तम जोगदंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या बाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे आणि नगराध्यक्षा सौ. समरीन मिर्झा यांनी १९ ऑगस्ट रोजीच घोषणा केली होती की, यंदाचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ध्वज शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते फडकवण्यात येईल. त्या घोषणेनुसार आज सकाळी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शशिकलाबाईंच्या हस्ते ध्वज फडकवताना संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्ती आणि अभिमानाचे वातावरण होते. फुलेनगर धनगरवाडी येथील रहिवासी असलेल्या शशिकलाबाई या दोन्ही डोळ्यांनी अंध असून स्नेहनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा दीपक उत्तम जोगदंडे याचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले, त्यानंतर पती उत्तम जोगदंडे यांचेही निधन झाले. एकट्या पडलेल्या या मातेने खचून न जाता मुलाच्या स्मृतीस अनोखी श्रद्धांजली देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत राहते घर पाडून त्या जागेवर बुद्धविहार उभारण्याचा आणि आपल्या मालकीची सुमारे ५० लाख रुपये किंमतीची दोन गुंठे जागा समाजासाठी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी त्यांनी भोकरदन नगर परिषद कार्यालयात येऊन मुख्याधिकारी गजानन तायडे आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा समरीन नाज वसीम बेग मिर्झा यांची भेट घेऊन दोन गुंठे जागेचे ७/१२ उतारे व ५०० रुपयांच्या बॉन्डवर केलेले दानपत्र नगरपरिषदेकडे सुपूर्द केले होते. आईच्या ममतेतून आणि मुलाच्या स्मृतीतून साकारलेले हे बुद्धविहार हे मातृत्व, त्याग आणि दानशूरपणाचे अनोखे उदाहरण ठरले आहे. स्वत ची मौल्यवान मालमत्ता समाजासाठी दान करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल नगर परिषदेने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला होता. समाजासाठी आपल्या आयुष्याची आणि संपत्तीची मोठी आहुती देणाऱ्या शशिकलाबाईंचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष कर्तृत्ववान दानशूर अशा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा गौरव करण्याची परंपरा या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार जोगदंडे ताईंनी स्वत च्या जागेवर बौद्ध विहार बांधून ते नगरपालिकेला दान केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला असून त्यांच्या कार्याचे शहरातून सर्व स्तरातून स्वागत होत आहे.1
- ग्रामपंचायत कार्यालय व कें. जि.प.प्राथमिक शाळा चांदई एक्को येथे मराठवाडा मुक्ती दिन साजरा मराठवाडा मुक्ती दिन साजरा1
- मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली. पाटोदा येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना सलाईन देण्यात आली आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, २० दिवसांचे उपोषण संपवल्यानंतर जरांगे पाटील बीडमधून छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.1
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सर्व मृत्यू प्रकरणाशी आपल्या कुटुंबाचा किंवा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले या प्रकरणाचा राजकीय तुम्ही वापर केला जात असल्याचा आरोप उद्योग ठाकरे यांनी केला वारंवार होणाऱ्या आरोपामुळे चारित्र्य आनंद होत असून हे थांबले पाहिजे अन्यथा कायदेशीर मार्ग ओळखण्याचा इशारा दिला पत्रकारांनाही उद्देशून या प्रकरणात कोणाचीही नाव जोडले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले1
- जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शहरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली.1
- निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई निधोना शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड : १४ जुगाऱ्यांवर कारवाई पोलीस ठाणे चंदनझिर जालना जुगाराचे साहीत्य व वाहनांसह २५ लक्ष ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक यांचे पथक व चंदनझिरा पोलीस यांची संयुक्त कारवाई1
- पिशोर में बिजली गिरने से 3 महिलाओं की मौत, 3 गंभीर। हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख हर्षवर्धन जाधव ने घटना पर दुख जताया #AQSNEWS #KannadNews #PishorNews #ChhatrapatiSambhajinagar #AQSNewsDigital#anisqureshisillod #sillod1
- पिशोर येथे वीज पडून तिघांचा मृत्यू ;तिघे गंभीर; मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत मदत देण्याची हर्षवर्धन जाधवांची मागणी छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे वीज पडून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना २४ तासांत शासकीय मदत देण्याची मागणी केली. दुर्घटनेतील कुटुंबीयांना तातडीने मदत मिळावी, यासाठी शासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे जाधव यांनी म्हटले आहे.1