logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी......... कोल्हापूर: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून या कालावधीत उष्माघाताचा धोका वाढत असून सध्या वातावरणातील बदलामुळे शहरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघातासारख्या जीवघेण्या स्थितीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. यामध्ये उन्हात दीर्घकाळ काम करणे, कारखान्यांतील उष्ण वातावरणात काम करणे, बंद व उष्ण खोलीत राहणे तसेच घट्ट कपडे परिधान करणे ही उष्माघाताची प्रमुख कारणे आहेत. वाढत्या तापमानाशी सतत संपर्क आल्यास शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणे म्हणून त्वचा लालसर होणे, सूज येणे, ताप, डोकेदुखी, स्नायूंमध्ये गोळे येणे, अत्यधिक घाम येणे, थकवा, चक्कर, उलट्या होणे यांचा समावेश होतो. काही गंभीर प्रकरणांत त्वचा कोरडी व गरम होणे, नाडी वेगाने धडकणे आणि रुग्ण अर्धबेशुद्ध अवस्थेत जाणे अशी लक्षणेही दिसून येतात. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भरपूर पाणी पिणे, हलक्या व फिकट रंगाचे सैल कपडे वापरणे, उन्हात जाताना टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करणे तसेच घर थंड ठेवण्यासाठी पंखा, कुलर किंवा ओलसर पडद्यांचा वापर करणे आवश्यक आहे. पाळीव प्राण्यांनाही सावलीत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याउलट, दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळावे, कष्टाची कामे करू नयेत, लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, गडद व घट्ट कपडे वापरणे टाळावे तसेच मद्य, चहा, कॉफी आणि शीतपेये यांचे सेवन टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. उष्माघात झाल्यास रुग्णाला तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे, कपडे सैल करावेत, थंड पाण्याने अंग पुसावे आणि थोडेथोडे पाणी द्यावे. गंभीर स्थितीत रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. तरी संशयित उष्माघाताच्या रुग्णांनी विलंब न करता जवळच्या महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, वॉर्ड दवाखाना किंवा आरोग्यवर्धिनी केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

6 hrs ago
user_Journalist Ajay
Journalist Ajay
करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
6 hrs ago
83d70d35-3306-478f-99a1-449b80014f95

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी......... कोल्हापूर: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून या कालावधीत उष्माघाताचा धोका वाढत असून सध्या वातावरणातील बदलामुळे शहरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उष्माघातासारख्या जीवघेण्या स्थितीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. यामध्ये उन्हात दीर्घकाळ काम करणे, कारखान्यांतील उष्ण वातावरणात काम करणे, बंद व उष्ण खोलीत राहणे तसेच घट्ट कपडे परिधान करणे ही उष्माघाताची प्रमुख कारणे आहेत. वाढत्या तापमानाशी सतत संपर्क आल्यास शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. उष्माघाताची लक्षणे म्हणून त्वचा लालसर होणे, सूज येणे, ताप, डोकेदुखी, स्नायूंमध्ये गोळे येणे, अत्यधिक घाम येणे, थकवा, चक्कर, उलट्या होणे यांचा समावेश होतो. काही गंभीर प्रकरणांत त्वचा कोरडी व गरम होणे, नाडी वेगाने धडकणे आणि रुग्ण अर्धबेशुद्ध अवस्थेत जाणे अशी लक्षणेही दिसून येतात. नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भरपूर पाणी पिणे, हलक्या व फिकट रंगाचे सैल कपडे वापरणे, उन्हात जाताना टोपी, गॉगल किंवा छत्रीचा वापर करणे तसेच घर थंड ठेवण्यासाठी पंखा, कुलर किंवा ओलसर पडद्यांचा वापर करणे आवश्यक आहे. पाळीव प्राण्यांनाही सावलीत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याउलट, दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर पडणे टाळावे, कष्टाची कामे करू नयेत, लहान मुलांना पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, गडद व घट्ट कपडे वापरणे टाळावे तसेच मद्य, चहा, कॉफी आणि शीतपेये यांचे सेवन टाळावे, असेही सांगण्यात आले आहे. उष्माघात झाल्यास रुग्णाला तात्काळ सावलीत किंवा थंड ठिकाणी हलवावे, कपडे सैल करावेत, थंड पाण्याने अंग पुसावे आणि थोडेथोडे पाणी द्यावे. गंभीर स्थितीत रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. तरी संशयित उष्माघाताच्या रुग्णांनी विलंब न करता जवळच्या महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, वॉर्ड दवाखाना किंवा आरोग्यवर्धिनी केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले. सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला. महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
    1
    कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ (छ. शिवाजी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज तटाकडील तालीम चौक ते ताराबाई रोड तसेच महाद्वार परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 3 लोखंडी टेबल, 11 पार्किंग जाळ्या, 4 स्टॅन्ड बोर्ड, 4 छत्र्या, 5 लोखंडी स्टॅन्ड, 3 लोखंडी कॉट, 2 कॅरेट, 15 लाकडी टेबल, 1 स्पीकर, 6 पुतळे, 20 लोखंडी पाईप, 1 लोखंडी स्टूल, 4 स्टॅन्ड, 2 रांगोळी बॅग, 1 ढकल गाडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता सुरेश पाटील, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण विभाग व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
    user_Journalist Ajay
    Journalist Ajay
    करवीर, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेतला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी आशीर्वाद दिला आणि मी कायम राहुल तुझ्यासोबत आहे हे शब्द साहेबांचे ऊर्जा देतात एवढ्या व्यस्त वेळेतून राहुलला भेटायचे हे साहेबांच्या लक्षात राहतं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या पोलिसांची मदत करेल आणि प्रामाणिक काम करेल तुमची साथ आणि आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर राहू द्या ही विनंती महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व त्या परिवाराला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य
    1
    आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आशीर्वाद घेतला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त साहेबांनी आशीर्वाद दिला आणि मी कायम राहुल तुझ्यासोबत आहे हे शब्द साहेबांचे ऊर्जा देतात एवढ्या व्यस्त वेळेतून राहुलला भेटायचे हे साहेबांच्या लक्षात राहतं हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद आहे साहेब महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेवटच्या पोलिसांची मदत करेल आणि प्रामाणिक काम करेल तुमची साथ आणि आशीर्वाद असाच माझ्या डोक्यावर राहू द्या ही विनंती महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी व त्या परिवाराला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 
राहुल अर्जुनराव दुबाले 
संस्थापक अध्यक्ष 
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य
    user_चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
    चिपळुण न्यूज सं.स्वाती हडकर
    चिपळूण, रत्नागिरी, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सातारा वाई. वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागचा ढिसाळ कारभार समोर येत आहे मात्र पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे कडून जाणीव पूर्वक डोळे केली जात फआहे.पाणी शुद्धीकरणासाठी वाई नगर परिषद महिन्याला लाखों रुपये खर्च करत आहे आणि तेच हजारों लिटर पाणी रोज अशा पद्धतीने गटारित सोडले जात आहे एकी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या बैठका चालू आणि एकीकडे वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार याची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.
    1
    सातारा वाई. वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागचा ढिसाळ कारभार समोर येत आहे मात्र पाणी पुरवठा विभाग अधिकारी व ठेकेदार यांचे कडून जाणीव पूर्वक डोळे केली जात फआहे.पाणी शुद्धीकरणासाठी वाई नगर परिषद महिन्याला लाखों रुपये खर्च करत आहे आणि तेच हजारों लिटर पाणी रोज अशा पद्धतीने गटारित सोडले जात आहे एकी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या बैठका चालू आणि एकीकडे वाई नगरपरिषद पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार याची चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे.
    user_Nityanand More
    Nityanand More
    Auto Rickshaw Driver वाई, सातारा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • बारामती विधानसभा पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आ. रोहित पवार यांनी घोंगडी बैठका घेतल्या
    1
    बारामती विधानसभा पोट निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी आ. रोहित पवार यांनी घोंगडी बैठका घेतल्या
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ग्लोबल ब्रॅंड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखविला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विक्रम शिंदे /भोर दि.16 नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड असेल्या राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.16) पुणे जिह्यातील भोर येथील रांजे येथे दिली. त्यांच्या हस्ते रांजे इथं उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते. स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली, नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर असलेली दर्जेदार यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.
    2
    ग्लोबल ब्रॅंड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूंनी दाखविला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
विक्रम शिंदे /भोर दि.16
नव्या काळांच्या आव्हानांना सामोरे जावून ग्लोबल ब्रँड बनविण्याचा आत्मविश्वास चितळे बंधूनी दाखविला आहे. ग्लोबल ब्रँड असेल्या राज्यातील खाद्य उद्योगाला प्रगत ब्रँडच्या रुपात जागतिक पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.16) पुणे जिह्यातील  भोर येथील रांजे येथे  दिली. त्यांच्या हस्ते रांजे इथं उभारण्यात आलेल्या चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, यांच्यासह इंद्रनील चितळे, गोविंद चितळे, श्रीकृष्ण चितळे, केदार चितळे आदी उपस्थित होते.
स्वच्छता आणि शुद्धतेच्या बाबतीत कुठेही मानवी हस्तक्षेप नसलेली, नूतनीकरणीय ऊर्जेचा वापर असलेली दर्जेदार यंत्रणा या पार्कमध्ये उभारण्यात आली आहे.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे... या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे... #चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज #Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने चिखली येथील आदित्य लॉजवर छापा टाकून एका मोठ्या देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे...
या कारवाईत ९ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यात एका बांगलादेशी तरुणीचा समावेश आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार, चिखली येथील देहू-आळंदी रोडवरील आदित्य लॉजवर ही धाड टाकण्यात आली. या ठिकाणी लॉजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. सुटका करण्यात आलेल्या ९ महिलांपैकी एका तरुणीला आरोपींनी बांगलादेशातून तस्करी करून आणले होते. तिला पुन्हा मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज मॅनेजर अशोक बाबुराव बाबर आणि कामगार अकिबुल खालेक मुल्ला या दोघांना अटक केली आहे. तसेच लॉज चालक सुदर्शन पवार, जागा मालक नाना बोराटे आणि साहिल ऊर्फ शाहीन मंडल यांच्याविरुद्ध चिखली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे...
#चिखली #पिंपरीचिंचवड #पोलीसकारवाई #देहविक्रयप्रकरण #मानवीतस्करी #रेस्क्यूऑपरेशन #महिलांचीसुटका #गुन्हेगारी #क्राईमन्यूज #पोलिसछापा #बांगलादेशीपीडित #आदित्यलॉज
#Chikhali #PimpriChinchwad #PoliceRaid #SexRacketBusted #HumanTrafficking #RescueOperation #CrimeNews #WomenRescued #BangladeshiVictim #IllegalActivities #LodgeRaid #AdityaLodge
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता. 10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.
    3
    कात्रज कोंढावा रोड परिसर शत्रुंजय मंदिरा समोर बी जे पार्क बिल्डिंग च्या समोर चा रस्ता.
10 वर्ष झाली रस्ता असाच आहे. कोणी दखल घेत नाही. त्यामुळे दुकानाच्या धंद्यावर मोठया प्रमाणावर फरक पडला आहे. तरी हे काम लवकरात लवकर करावे ही विनंती.
    user_श्री गणेश इंटरप्राईजेस
    श्री गणेश इंटरप्राईजेस
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.16 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती भोर तालुका (एक तालुका, एक जयंती) यांच्या वतीने विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक बुद्धवंदना, भव्य मिरवणूक/शोभारथ, व्याख्यान, अभिवादन सभा, आरोग्य शिबिर(निमा), पथनाट्य (अं.नि.स संघटना), आंबेडकरी जलसा (भोर तालुका सिंगर ग्रुप), भोजन इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला स्वराज्य निर्माण करून दिले, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्वराज्याला संविधानाच्या माध्यमातून टिकविले, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. भोर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व अभ्यासिका साठी 2.50 कोटी मंजूर केले आहेत.. अभिवादन सभेवेळी दिवंगत नेते अजित दादा पवार यांनी आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या माध्यमातून निधी मंजूर केल्याचे रणजितदादा शिवतरे, नगराध्यक्ष नाना आवारे, गटनेते केदार देशपांडे यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्हा परिषदेचे मा.उपाध्यक्ष रणजीत दादा शिवतरे, जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रमदादा खुटवड, प्रविणशेठ जगदाळे, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, सभापती मनिषाताई कंक, उपसभापती विशाल बंटी कोंडे, गटनेते केदार देशपांडे, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, मुख्याधिकारी गजानन शिंदे, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य राजेश बोडके, नगरसेवक कुणाल धुमाळ, अनिल भेलके, वन अधिकारी संतोष कंक, अध्यक्ष भोर शहर संदिप शेटे, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत पडवळ, ओबीसी अध्यक्ष मारूती गोरे, डॉ.अरूण बुरांडे, डॉ.इम्रान खान, डॉ.राजेश धिवार, नेहा डोंबे, परवेझ शेख, सोमनाथ ढवळे, बाळासाहेब खुटवड, बाळा शेटे, गौतम शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
भोर तालुक्यातील अविनाश गायकवाड, राजन घोडेस्वार, गणेश साळुंके, अरूण रणखांबे, अक्षय गायकवाड, रणजीत रणखांबे, मयूर गायकवाड, नितीन माने, निलेश घोडेस्वार, सतीश गायकवाड, संतोष जाधव, सिद्धोधन कांबळे, प्रकाश ओव्हाळ, स्वप्निल सावंत, विशाल शाक्य, महेंद्र सपकाळ, सुनील गायकवाड श्रीकांत जाधव, अमोल भालेराव, विकास सपकाळ, दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, युवराज शेलार, अंकुश साळुंके इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक मयूर गायकवाड यांनी, सूत्रसंचालन राजन घोडेस्वार, तर आभार अविनाश गायकवाड यांनी मानले. 🙏
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.