logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे हे पक्ष संघटन अधिक सक्षम आणि बळकट करण्याच्या उद्देशाने पुढील आठ दिवस नाशिक जिल्ह्याचा व्यापक दौरा करणार आहेत. मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी आणि मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत जनजागृती करणे हाही या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, तालुका आणि शहर स्तरावर बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. मतदार यादीतील पात्र मतदारांची नोंदणी, नवमतदारांचा समावेश, आवश्यक दुरुस्त्या, बूथस्तरावरील संघटन बळकटीकरण आणि पक्षविस्तार यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी नाशिक येथे, दि. २२ जून रोजी, जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष, तालुका व शहर अध्यक्ष तसेच पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी दौऱ्याचे वेळापत्रक, संघटनात्मक बांधणी आणि मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. तसेच, मतदार यादी पुनर्निरीक्षण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरही सखोल विचारमंथन करण्यात आले. यावेळी तालुका व शहरस्तरीय संघटनात्मक कामकाजाचे नियोजन, प्रलंबित संघटनात्मक नियुक्त्या, बूथ समित्यांचे बळकटीकरण आणि पक्षाच्या विविध सेलच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. युवक, महिला, विद्यार्थी, अल्पसंख्याक, ओबीसी आणि कामगार सेलसह इतर सेलच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता, जिल्हाभर व्यापक जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यात गावपातळीवरील बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि पक्षाचा जनाधार मजबूत करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे यांचा समावेश आहे. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील संघटनात्मक स्थिती, स्थानिक प्रश्न आणि पक्षवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना मांडल्या. जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सर्व सूचनांची नोंद घेऊन भविष्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्ष संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी, पक्षाची भूमिका प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक अध्यक्ष चेतन कासव, युवती अध्यक्षा पूजा आहेर, नाशिक लोकसभा युवक अध्यक्ष योगेश निसाळ, विद्यार्थी अध्यक्ष राहुल कदम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, ज्ञानेश्वर दराडे, मोहन शेलार, यशवंत शिरसाठ, भारत जाधव, संकेत निमसे, सोहेल मोमीन, रामेश्वर साबळे, युवक पदाधिकारी आकाश पगार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, सतीश पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे, भाऊसाहेब भवर, राजेंद्र सोनवणे, कैलास देवरे, राजेंद्र भामरे, राजेंद्र पवार, राजेंद्र उफाडे, शहराध्यक्ष दत्ता निकम, तन्वीर राजे, योगेश जाधव, सुशांत काकड, वर्षा लिंगायत, अरुण राठोड, शशिकांत बागुल, हबीब शेख, अक्षय देशमुख, संदीप भामरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

9 hrs ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
9 hrs ago
b48a6c9b-a09c-4f70-a67e-5f85abb02523

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे हे पक्ष संघटन अधिक सक्षम आणि बळकट करण्याच्या उद्देशाने पुढील आठ दिवस नाशिक जिल्ह्याचा व्यापक दौरा करणार आहेत. मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी आणि मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत जनजागृती करणे हाही या दौऱ्याचा प्रमुख उद्देश आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, तालुका आणि शहर स्तरावर बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाईल. मतदार यादीतील पात्र मतदारांची नोंदणी, नवमतदारांचा समावेश, आवश्यक दुरुस्त्या, बूथस्तरावरील संघटन बळकटीकरण आणि पक्षविस्तार यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी नाशिक येथे, दि. २२ जून रोजी, जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष, तालुका व शहर अध्यक्ष तसेच पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी दौऱ्याचे वेळापत्रक, संघटनात्मक बांधणी आणि मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. तसेच, मतदार यादी पुनर्निरीक्षण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरही सखोल विचारमंथन करण्यात आले. यावेळी तालुका व शहरस्तरीय संघटनात्मक कामकाजाचे नियोजन, प्रलंबित संघटनात्मक नियुक्त्या, बूथ समित्यांचे बळकटीकरण आणि पक्षाच्या विविध सेलच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. युवक, महिला, विद्यार्थी, अल्पसंख्याक, ओबीसी आणि कामगार सेलसह इतर सेलच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता, जिल्हाभर व्यापक जनसंपर्क अभियान राबवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यात गावपातळीवरील बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद साधणे, नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि पक्षाचा जनाधार मजबूत करण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे यांचा समावेश आहे. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील संघटनात्मक स्थिती, स्थानिक प्रश्न आणि पक्षवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना मांडल्या. जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे यांनी सर्व सूचनांची नोंद घेऊन भविष्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पक्ष संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी, पक्षाची भूमिका प्रत्येक बूथपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि मतदार विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, युवक अध्यक्ष चेतन कासव, युवती अध्यक्षा पूजा आहेर, नाशिक लोकसभा युवक अध्यक्ष योगेश निसाळ, विद्यार्थी अध्यक्ष राहुल कदम, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, ज्ञानेश्वर दराडे, मोहन शेलार, यशवंत शिरसाठ, भारत जाधव, संकेत निमसे, सोहेल मोमीन, रामेश्वर साबळे, युवक पदाधिकारी आकाश पगार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, सतीश पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, ज्ञानेश्वर शेवाळे, भाऊसाहेब भवर, राजेंद्र सोनवणे, कैलास देवरे, राजेंद्र भामरे, राजेंद्र पवार, राजेंद्र उफाडे, शहराध्यक्ष दत्ता निकम, तन्वीर राजे, योगेश जाधव, सुशांत काकड, वर्षा लिंगायत, अरुण राठोड, शशिकांत बागुल, हबीब शेख, अक्षय देशमुख, संदीप भामरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • राज्यभर चर्चेत राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते यांचे बंधू असलेल्या गोकुळ गीतेंच्या या विजयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निकाल जाहीर होताच गोकुळ गीते यांनी कार्यकर्त्यांसमवेत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करत आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.
    1
    राज्यभर चर्चेत राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गणेश गीते यांचे बंधू असलेल्या गोकुळ गीतेंच्या या विजयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. निकाल जाहीर होताच गोकुळ गीते यांनी कार्यकर्त्यांसमवेत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा करत आपल्या विजयाचा आनंद व्यक्त केला.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • भरत तिवारी यांच्या एन्काऊंटरनंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भरत तिवारी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. यासोबतच, ते आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेले काही महत्त्वाचे 'पुरावे' सुरक्षित ठेवण्याबद्दलही बोलताना दिसतात. भरत तिवारी ज्या पुराव्यांच्या संरक्षणाची मागणी करत होते, ते नेमके कोणते पुरावे होते, आणि त्यांचा संबंध एखाद्या मोठ्या खुलाशाशी होता का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत आणि लोक या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
    1
    भरत तिवारी यांच्या एन्काऊंटरनंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे संपूर्ण प्रकरणाबाबत अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये भरत तिवारी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसतात. यासोबतच, ते आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेले काही महत्त्वाचे 'पुरावे' सुरक्षित ठेवण्याबद्दलही बोलताना दिसतात.

भरत तिवारी ज्या पुराव्यांच्या संरक्षणाची मागणी करत होते, ते नेमके कोणते पुरावे होते, आणि त्यांचा संबंध एखाद्या मोठ्या खुलाशाशी होता का, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणावर विविध चर्चा सुरू झाल्या आहेत आणि लोक या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरीनगर येथील विहिरीने तळ गाठला आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात भवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरीनगर येथील विहिरीने तळ गाठला आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • आज दिनांक २२-०६-२०२६ रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुसरवाडी येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, जे स्पष्टपणे पहायला मिळाले.
    1
    आज दिनांक २२-०६-२०२६ रोजी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सुसरवाडी येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, जे स्पष्टपणे पहायला मिळाले.
    user_Rama Manga pokala
    Rama Manga pokala
    शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनाला तात्काळ स्थगिती दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून हे लेपन केले जाणार होते. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत, न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे. वारकरी संप्रदाय, श्री. बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. पुरुषोत्तम (गणेश) लंके यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला होता. अधिवक्ता सुधीर रानडे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मंदिर समितीला वज्रलेप न करण्याविषयी सक्त ताकीद दिली आहे. न्यायालयात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये, हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते, ज्यामुळे काकड आरतीपासून नैवेद्यापर्यंत सर्व कृती त्याच भावनेतून केल्या जातात. मंदिर समिती 'दगडाची मूर्ती' समजून कृत्रिम आणि अपवित्र रासायनिक पदार्थांचा (उदा. इपॉक्सी) वापर करत आहे, ज्यामुळे मूर्तीचे देवत्व नष्ट होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यात आला. यापूर्वी चार वेळा रासायनिक लेपन करूनही ते निष्फळ ठरले आहे आणि कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून अधिक ठिसूळ होण्याचा मोठा धोका असल्याचेही सांगितले गेले. 'महाकालेश्वर मंदिर' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा संदर्भही दिला गेला, त्यानुसार भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत. करवीर पीठाच्या जगद्गुरु शंकराचार्यांनीही या रासायनिक लेपनास स्पष्ट विरोध करणारे पत्र दिले होते, ज्याची न्यायालयाने नोंद घेतली. या निर्णयावर समाधान व्यक्त करताना, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले, याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्त्व विभागाला देता आलेले नाही, असे ते म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केवळ मते नोंदवली गेली; मात्र कोणती रसायने वापरणार आणि संवर्धन कसे करणार याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाने दिली नाही. अचानक पत्रक काढून मंदिर बंद ठेवत वज्रलेपाचा निर्णय जाहीर केल्याने भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मूर्ती संवर्धनासाठी 'आयुर्वेदिक वज्रलेप' हा अधिक सुरक्षित आणि परंपरेस अनुरूप असल्याचे न्यायालयात सप्रमाण मांडले आहे. यापुढील काळात तरी मंदिर समिती वारकरी, धर्माचार्य, संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भावनांचा आदर करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
    2
    पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनाला तात्काळ स्थगिती दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून हे लेपन केले जाणार होते. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत, न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे.

वारकरी संप्रदाय, श्री. बाळकृष्ण डिंगरे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. पुरुषोत्तम (गणेश) लंके यांनी पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती सोनाली राऊळ यांच्या न्यायालयात हा दावा दाखल केला होता. अधिवक्ता सुधीर रानडे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मंदिर समितीला वज्रलेप न करण्याविषयी सक्त ताकीद दिली आहे.

न्यायालयात मांडलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये, हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्ती ही केवळ दगडी शिल्प नसून त्यात साक्षात देवत्व (प्राण) असते, ज्यामुळे काकड आरतीपासून नैवेद्यापर्यंत सर्व कृती त्याच भावनेतून केल्या जातात. मंदिर समिती 'दगडाची मूर्ती' समजून कृत्रिम आणि अपवित्र रासायनिक पदार्थांचा (उदा. इपॉक्सी) वापर करत आहे, ज्यामुळे मूर्तीचे देवत्व नष्ट होऊ शकते, असा युक्तिवाद करण्यात आला. यापूर्वी चार वेळा रासायनिक लेपन करूनही ते निष्फळ ठरले आहे आणि कृत्रिम रसायनांमुळे पाषाणाचे नैसर्गिक श्वसन रोखले जाऊन मूर्ती आतून अधिक ठिसूळ होण्याचा मोठा धोका असल्याचेही सांगितले गेले. 'महाकालेश्वर मंदिर' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचा संदर्भही दिला गेला, त्यानुसार भक्तांच्या धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही निर्णय प्रशासनाला घेता येणार नाहीत. करवीर पीठाच्या जगद्गुरु शंकराचार्यांनीही या रासायनिक लेपनास स्पष्ट विरोध करणारे पत्र दिले होते, ज्याची न्यायालयाने नोंद घेतली.

या निर्णयावर समाधान व्यक्त करताना, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तब्बल २८ युगे विटेवर सुखरूप उभा असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या पायाला कोरोना टाळेबंदीच्या काळात खड्डा कसा पडला आणि श्री रुक्मिणीमातेचे पाय का खराब झाले, याचे कोणतेही शास्त्रीय उत्तर अद्याप मंदिर समिती किंवा पुरातत्त्व विभागाला देता आलेले नाही, असे ते म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत केवळ मते नोंदवली गेली; मात्र कोणती रसायने वापरणार आणि संवर्धन कसे करणार याची कोणतीही स्पष्ट माहिती प्रशासनाने दिली नाही. अचानक पत्रक काढून मंदिर बंद ठेवत वज्रलेपाचा निर्णय जाहीर केल्याने भाविकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. मूर्ती संवर्धनासाठी 'आयुर्वेदिक वज्रलेप' हा अधिक सुरक्षित आणि परंपरेस अनुरूप असल्याचे न्यायालयात सप्रमाण मांडले आहे. यापुढील काळात तरी मंदिर समिती वारकरी, धर्माचार्य, संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या भावनांचा आदर करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहारोली येथील विश्वास दिवा यांनी आपली कन्या प्रसूतकाळासाठी सरकारी रुग्णालय, वाडा येथे दाखल केली होती. मात्र, येथील डॉक्टरांनी रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याचे सांगत रुग्णाला इतरत्र हलवण्यास सांगितले. दिवा यांनी त्यांच्याकडे इतर ठिकाणी जाण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून वाड्याच्या सरकारी रुग्णालयातच प्रसूती करण्याची विनंती केली. त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना IDL रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि तिथे उपचार मोफत होतील असे आश्वासन दिले. त्यानुसार, त्यांनी रुग्णाला IDL रुग्णालयात दाखल केले. परंतु, आता IDL रुग्णालयातील कर्मचारी पैशांची मागणी करत आहेत. विश्वास दिवा यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असल्याचे म्हटले आहे आणि त्यामुळे त्यांना पैसे भरणे शक्य नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या रुग्णाकडे आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालयाने हे कार्ड स्वीकारण्यास नकार दिला आहे, असे सांगत की आयुष्मान योजनेतून उपचार होणार नाही. या गंभीर स्थितीत त्यांनी मदतीची याचना केली आहे.
    1
    पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहारोली येथील विश्वास दिवा यांनी आपली कन्या प्रसूतकाळासाठी सरकारी रुग्णालय, वाडा येथे दाखल केली होती. मात्र, येथील डॉक्टरांनी रुग्णालयात पुरेशा सुविधा नसल्याचे सांगत रुग्णाला इतरत्र हलवण्यास सांगितले. दिवा यांनी त्यांच्याकडे इतर ठिकाणी जाण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून वाड्याच्या सरकारी रुग्णालयातच प्रसूती करण्याची विनंती केली.

त्यानंतर, डॉक्टरांनी त्यांना IDL रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला आणि तिथे उपचार मोफत होतील असे आश्वासन दिले. त्यानुसार, त्यांनी रुग्णाला IDL रुग्णालयात दाखल केले. परंतु, आता IDL रुग्णालयातील कर्मचारी पैशांची मागणी करत आहेत.

विश्वास दिवा यांनी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब असल्याचे म्हटले आहे आणि त्यामुळे त्यांना पैसे भरणे शक्य नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या रुग्णाकडे आयुष्मान कार्ड असूनही रुग्णालयाने हे कार्ड स्वीकारण्यास नकार दिला आहे, असे सांगत की आयुष्मान योजनेतून उपचार होणार नाही. या गंभीर स्थितीत त्यांनी मदतीची याचना केली आहे.
    user_Vishwas Diva
    Vishwas Diva
    वाडा, पालघर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील चांदवड परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे चांदवड येथील रेणुका कॉम्प्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने परिसरातील नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली.
    1
    नाशिक जिल्ह्यातील चांदवड परिसरात सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे चांदवड येथील रेणुका कॉम्प्लेक्स परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने परिसरातील नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली.
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.