Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयात अवयवदानातून एक यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला डायलिसिसपासून पूर्णविराम मिळाला आहे. या यशस्वी प्रत्यारोपणासंदर्भात उपस्थित डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
PRASIDDHI PRAMUKH NEWS
नाशिक येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयात अवयवदानातून एक यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला डायलिसिसपासून पूर्णविराम मिळाला आहे. या यशस्वी प्रत्यारोपणासंदर्भात उपस्थित डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नाशिक येथील अशोका मेडिकव्हर रुग्णालयात अवयवदानातून एक यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आले आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे रुग्णाला डायलिसिसपासून पूर्णविराम मिळाला आहे. या यशस्वी प्रत्यारोपणासंदर्भात उपस्थित डॉक्टरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.1
- नाशिक जिल्ह्यातील वरवंडी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी कुलूप लावून बंद केले आहे. या घटनेमुळे शाळेतील कामकाज थांबले.1
- येवला-मनमाड रस्त्यावरच्या कामात गंभीर त्रुटी समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या 'साईड पट्टा' भरण्यासाठी मुरमाऐवजी निकृष्ट दर्जाची माती वापरली जात आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. या निकृष्ट मातीमुळे पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो, परिणामी वाहने घसरून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. इतकेच नाही, तर पाऊस थांबून ऊन पडल्यास याच मातीची प्रचंड धूळ उडते. ही धूळ विशेषतः दुचाकी चालकांच्या डोळ्यात जात असल्याने, रस्त्यावर अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे.1
- मोखाडा तालुक्यात पाणीटंचाईमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाकडून विहिरी, शेततळी आणि सिमेंट बंधारे यांसारख्या उपाययोजनांद्वारे टंचाई कमी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, मोखाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. वनपरिक्षेत्रांतर्गत मुचोंडी येथील रोपवाटिकेमध्ये जेसीबीच्या साहाय्याने एक मोठा शोष खड्डा तयार करून, त्यात पाणी साठवण्याचा मानवनिर्मित प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. हा यशस्वी प्रयोग जव्हार वनविभागाचे उपवनसंरक्षक, सहाय्यक वन संरक्षक (रोहयो) आणि कॅम्प जव्हार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मोखाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने, वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीयुत दळवी आणि त्यांच्या सर्व वनपाल व वनरक्षक यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. या शोष खड्ड्याच्या निर्मितीमुळे रोपवाटिकेतील रोपांना नवसंजीवनी मिळण्यास मदत होणार असून, त्यांच्या वाढीसाठी मोठा आधार मिळेल. या उपक्रमामुळे नर्सरीतील रोपांना जीवदान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.1
- ठाणे जिल्ह्यातील नेवाली नाका परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तळोजा मार्गे बदलापूरकडे जाताना नेवाली नाक्यावर वाहनचालकांना एक तासाहून अधिक काळ वाहतूक जाममध्ये अडकून पडावे लागत आहे. याव्यतिरिक्त, तळोजा मार्गे मलंगगडच्या दिशेने नेवाली नाक्याकडे येतानाही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.1
- मुंब्रा पोलीस ठाण्यात नाजिया इलाही खान यांच्या विरोधात एफआयआर (F.I.R.) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर माजी मंत्री सय्यद अली अशरफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.1
- नाशिकमध्ये 'आऊट ऑफ सिलॅबस' या मराठी चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पार पडली. हा चित्रपट एमपीएससी परीक्षेच्या तयारीच्या धकाधकीतही निसर्गसंवर्धनासाठी लढा देणाऱ्या तरुणांची प्रेरणादायी आणि संघर्षमय कथा सांगतो, जो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. चित्रपटाचे कथानक 'पुस्तकांच्या पलीकडे...' हा आशय घेऊन आजच्या तरुणाईसमोरील स्पर्धा परीक्षा, करिअरची धडपड आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी यांचा समतोल साधते. स्वतःच्या भविष्याचा विचार करत असतानाच निसर्गासाठी उभे राहणाऱ्या युवकांचा संघर्ष, त्यांची जिद्द आणि सामाजिक बांधिलकी या चित्रपटातून प्रभावीपणे उलगडण्यात आली आहे. निर्माते सुगत वाघमारे आणि दिग्दर्शक नविन देशबोनिया यांच्यासह चित्रपटाचे कलाकार नाशिकमधील पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. 'अडू तिशू प्रोडक्शन्स'च्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात अजिंक्य राऊत आणि अद्वयी वाघमारे मुख्य भूमिकेत आहेत, तर मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, अभिजीत रामचंद्र, सानिका तोरस्कर आणि शेषपाल काळणील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मोहित कुलकर्णी यांनी संगीताची धुरा सांभाळली असून, वैशाली सामंत आणि अभय जोधपूरकर यांच्यासह नामवंत गायकांनी चित्रपटातील गीतांना स्वर दिले आहेत. पत्रकार परिषदेत चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा, कलाकारांचे अनुभव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश आणि आजच्या तरुणांसाठी या कथेत दडलेला आशय याविषयी सविस्तर संवाद साधण्यात आला. मनोरंजनासोबतच सामाजिक जाणीव जागृत करणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच विचार करायला भाग पाडणार आहे. निसर्ग संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारी आणि तरुणांच्या जिद्दीचा प्रवास मांडणारी 'आऊट ऑफ सिलॅबस' ही कथा ३ जुलैपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. पुस्तकांच्या पलीकडे जाऊन समाज आणि पर्यावरणासाठी उभे राहणाऱ्या या तरुणांचा संघर्ष अनुभवण्यासाठी प्रेक्षकांना सज्ज राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- मुंबईत जोरदार पाऊस सुरू असताना, शहराची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये केवळ दरवाजा बंद करण्याच्या एका क्षुल्लक वादातून २२ वर्षीय मयंक लोहार नावाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत मुसळधार पाऊस पडत असताना प्रवाशांमध्ये लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरून शाब्दिक वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीमुळे चिडलेल्या आरोपीने आपल्या पिशवीतून चाकू काढला आणि अचानक मयंक लोहारवर हल्ला केला. चाकूच्या गंभीर हल्ल्यात मयंक गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे लोकल ट्रेनमधील प्रवाशांमध्ये भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर आरोपी बोरिवली स्टेशनवर पोहोचण्यापूर्वीच ट्रेनमधून उतरून पळून गेला. प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच बोरिवली जीआरपी (सरकारी रेल्वे पोलीस) घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, त्यांनी आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत, जी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे त्याचा शोध घेत आहेत. धावत्या लोकलमध्ये झालेल्या या हत्येमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या बोरिवली जीआरपी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.1