Shuru
Apke Nagar Ki App…
परभणी शहरासह जिल्हाभरात शनिवारी सकाळी जाणवले भूकंपाचे धक्के
Mohsin ahmed khan
परभणी शहरासह जिल्हाभरात शनिवारी सकाळी जाणवले भूकंपाचे धक्के
More news from महाराष्ट्र and nearby areas
- परभणी जिल्ह्यात आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या 'धोंडे जेवण' कार्यक्रमाची राजकीय नेत्यांसह नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.1
- न्यूज मराठी 24x7 लाईव्ह टीव्ही चॅनलवर परभणी जिल्ह्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.1
- मंठा शहरातील जवाहर कॉलनी परिसरात एका धक्कादायक घटनेत देशी दारूच्या दुकानातून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंठा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनीतील देशी दारूच्या दुकानात काही कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी “अजून किती निरपराध जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. नागरिकांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशी दारूचे दुकान बंद करणे, आरोपींवर कठोर कारवाई करणे, परिसरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे या प्रमुख मागण्या केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंठा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या मृत्यूबद्दल शोककळा पसरली आहे.1
- कॉक्रोच जानता पार्टीने आपली पहिली मागणी मांडली असून, त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.1
- नांदेडच्या सांगवी येथील प्रसिद्ध श्री श्याम मंदिरात पवित्र 'पुरुषोत्तम मास'चे औचित्य साधून २४ तासांच्या अखंड नामजप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २४ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजता भक्तीमय वातावरणात या विधीला सुरुवात झाली असून, तो सोमवार, २५ मे २०२६ रोजी सकाळी ६:०० वाजेपर्यंत सलग २४ तास चालणार आहे. या कार्यक्रमात 'अखंड ॐ श्री श्याम देवाय नमः' या मंत्राचा महाजप केला जात आहे. 'कलियुग केवल नाम अधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा' या वचनानुसार कलियुगात नामस्मरणाचे महत्त्व भक्तांना पटवून देण्यात येत आहे. नांदेड शहर आणि परिसरातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी आणि जपामध्ये सहभागी होण्यासाठी मंदिरात गर्दी केली आहे, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. मंदिर समितीने या अखंड नामजपामध्ये सहभागी होण्यासाठी तसेच श्रमसेवा देण्यासाठी भाविकांना जाहीर आवाहन केले आहे. इच्छुक भक्त ९९७०७९५१११, ८२७५३१२२३३, ८५५२०६३००६ किंवा ९८८१११४१०६ या क्रमांकांवर संपर्क साधून आपली नाव नोंदणी करू शकतात. तसेच, कोणत्याही श्याम भक्ताला सेवा करण्याची इच्छा असल्यास, तो कितीही वेळ बसून सेवा देऊ शकतो, असेही आयोजकांनी सांगितले आहे. हे शुभ कार्य श्री हरीश मोदी, निलेश अग्रवाल, किशन अग्रवाल, गणेश गट्टानी अर्धापूर आणि सर्व श्याम भक्तांनी संकल्पित केले आहे. मंदिर प्रशासनाने भक्तांना या पवित्र सोहळ्याचा लाभ घेऊन पुण्य पदरी पाडण्याचे आवाहन केले आहे.4
- नांदेड जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या “ऑपरेशन क्रॅकडाऊन” मोहिमेअंतर्गत, स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई करत तब्बल १४ लाख ४ हजार ३०० रुपये किमतीचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे. या कारवाईत ४७० तलवारी, २०९ खंजर-चाकू आणि २४ फायटर-पंच असे एकूण ७०३ घातक शस्त्रे हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्र विक्रेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, ज्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक कार्यरत होते. २२ मे रोजी पेट्रोलिंग करत असताना पोउपनि मिलींद सोनकांबळे आणि त्यांच्या पथकाला देना बँक ते सचखंड गुरुद्वारा रोडवरील ३०० सालाना शॉपिंग प्लाझा येथील दुकान क्रमांक ०८ मध्ये अवैधरित्या तलवारी व घातक शस्त्रांची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या उपस्थितीत दुकानावर छापा टाकण्यात आला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच दुकान मालक रणजितसिंघ रामसिंघ सरदार (रा. नंदीग्राम सोसायटी, नांदेड) हा घटनास्थळावरून फरार झाला. दुकानाची झडती घेतली असता, १२ लाख ३१ हजार रुपयांच्या ४७० तलवारी, १ लाख ७० हजार ९०० रुपयांचे २०९ खंजर-चाकू आणि २४ हजार रुपयांचे २४ फायटर-पंच असा एकूण १४ लाख ४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात आढळून आला आणि तो जप्त करण्यात आला. या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३८/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायद्यानुसार कलम ४/२५, ७/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल वजीराबाद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून, फरार आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने सुरू असलेल्या या धडक कारवायांमुळे अवैध शस्त्र विक्रेते आणि गुन्हेगारांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या धाडसी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले आहे.1
- महाराष्ट्रामध्ये काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन भीषण अपघातांमुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. या दुर्दैवी घटनांमध्ये एकूण १४ जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये घडलेल्या या भीषण दुर्घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.1
- महाराष्ट्राच्या बातम्या आता 'न्यूज मराठी'वर 24x7 लाईव्ह पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.1