लातुरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणा - भाजपाची निवेदनाद्वारे मागणी लातूर (एल पी उगीले) : लातूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्याच्या हत्त्येची घटना घडली आहे. या घटनेमुळे पालक, विद्यार्थी यांच्यासह नागरिकांमध्ये असुरक्षितते ची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेत लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने लातुरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणून नागरिकां मध्ये विश्वास निर्माण करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे लातूर जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्याकडे करण्यात आली आहे. लातूर शहरात सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्याची दुर्देवी हत्या करण्यात आली आहे. ही घटना अतिशय गंभीर व संतापजनक आहे. गेल्या काही महिन्यापासून लातूर शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेवून लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.या निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमानुसार गुन्हे दाखल करावेत, या गुन्ह्याचा तपास जलदगतीने व पारदर्शक करून दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा, शहरातील संवेदनशिल भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवून नियमित गस्त व प्रतिबंधक कारवाई करावी, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी कोंबिग ऑपरेशन, शस्त्र तपासणी व संशयितांवर देखरेख वाढवावी. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी कारवाईची अधिकृत माहिती वेळोवेळी जाहीर करावी, व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, शाळा, महाविद्यालय, पालक व सामाजिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना मनपाचे गटनेते अॅड. दीपक मठपती, माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक देविदास काळे, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रविण कस्तुरे, नगरसेविका रागिणी यादव, मंडलाध्यक्ष सचिन सुरवसे, संतोष पांचाळ, संतोष तिवारी, मंदार कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. गुन्हेगारीवर आळा बसवा तसेच अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र या सदर्भात पोलीस प्रशासनाकडून फक्त थातूरमातूर कारवाई केली जाते, असे चित्र दिसत आहेत. सत्ता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या हातात असताना आणि विशेषतः गृहमंत्रालय मुख्यमंत्र्याकडे असताना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखा अशा पद्धतीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देणे म्हणजे आपले सरकार किती हतबल आहे. हे दाखवून दिल्यासारखे आहे.
लातुरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणा - भाजपाची निवेदनाद्वारे मागणी लातूर (एल पी उगीले) : लातूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्याच्या हत्त्येची घटना घडली आहे. या घटनेमुळे पालक, विद्यार्थी यांच्यासह नागरिकांमध्ये असुरक्षितते ची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेत लातूर शहर जिल्हा भाजपाच्या वतीने लातुरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणून नागरिकां मध्ये विश्वास निर्माण करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे लातूर जिल्हा पोलिस अधिक्षक अमोल तांबे यांच्याकडे करण्यात आली आहे. लातूर शहरात सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्याची दुर्देवी हत्या करण्यात आली आहे. ही घटना अतिशय गंभीर व संतापजनक आहे. गेल्या काही महिन्यापासून लातूर शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेवून लातूर शहर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वात भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले आहे.या निवेदनाच्या माध्यमातून विद्यार्थी हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कलमानुसार गुन्हे दाखल करावेत, या गुन्ह्याचा तपास जलदगतीने व पारदर्शक करून दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करावा, शहरातील संवेदनशिल भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवून
नियमित गस्त व प्रतिबंधक कारवाई करावी, गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणण्यासाठी कोंबिग ऑपरेशन, शस्त्र तपासणी व संशयितांवर देखरेख वाढवावी. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी कारवाईची अधिकृत माहिती वेळोवेळी जाहीर करावी, व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, शाळा, महाविद्यालय, पालक व सामाजिक संस्थांच्या सहभागातून जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहीम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन देताना मनपाचे गटनेते अॅड. दीपक मठपती, माजी शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक देविदास काळे, जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रविण कस्तुरे, नगरसेविका रागिणी यादव, मंडलाध्यक्ष सचिन सुरवसे, संतोष पांचाळ, संतोष तिवारी, मंदार कुलकर्णी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. गुन्हेगारीवर आळा बसवा तसेच अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र या सदर्भात पोलीस प्रशासनाकडून फक्त थातूरमातूर कारवाई केली जाते, असे चित्र दिसत आहेत. सत्ता भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या हातात असताना आणि विशेषतः गृहमंत्रालय मुख्यमंत्र्याकडे असताना भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कायदा सुव्यवस्था राखा अशा पद्धतीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना देणे म्हणजे आपले सरकार किती हतबल आहे. हे दाखवून दिल्यासारखे आहे.
- राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.1
- दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..1
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- मुखेड तालुक्यातील जाहूर येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर जाहूर येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात मंगळवारी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी भव्य कुस्त्यांच्या हंगाव्याचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या या जंगी कुस्त्यांमध्ये महाराष्ट्रभरातील नामांकित पैलवानांनी आपला इंगा दाखवला यावेळी माजी आमदार अविनाशजी घाटे यांच्या हस्ते ११,००० रुपये इनामाची मानाची कुस्ती लावण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंजीतजी घाटे गोविंदराव पाटील रमाकांत पाटील हिवराळ कृष्णा पाटील ज्ञानेश्वर गोणगोपले देविदास पाटील बोडके मारोती पाटील वडजे उंद्रीकर परमेश्वर पाटील बोडके छत्रु पाटील बोडके यांची उपस्थिती होती7
- *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे4
- खून प्रकरणातील चारही आरोपीची धिंड काढून आरोपींना घटनास्थळाकडे नेण्यात आले. लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्ह्यात हातरून टाकणारी विद्यार्थ्यांतील हाणामारी आणि किरकोळ कारणावरून झालेल्या खून खटल्यातील चारही विद्यार्थी असलेल्या आरोपींना पोलिसांनी लवकरच अटक करून त्यांची धिंड काढून घटनास्थळावर घेऊन गेले. या परिसरात या परिसरात दादागिरी करण्याच्या उद्देशाने किंवा दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हाणामारी केली असेल तर ती त्यांची दहशत मोडीत काढली जावी. तसेच अशा पद्धतीने जर कोणी कायदा हातात घेतला तर पोलीस प्रशासन त्याची खैर करत नाही हा मेसेज समाजामध्ये जावा या उद्देशाने त्या आरोपींची धिंड काढली गेली आहे. असे आता लोक बोलू लागले आहेत.1