प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी पालकमंत्र्यांकडे साकडे... अर्जुनी मोरगाव -तालुक्यातील चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या आर्थिक अडचणींबाबत आज इंद्रनील नाईक, पालकमंत्री, गोंदिया यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात अर्जुनी मोरगाव, रामपुरी, खांबी व सिरेगाव येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १८ वर्षांपासून ग्रामीण भागातील सुमारे ५० टक्के नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करत असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, वाढता खर्च व अपुरी महसूल वसुली यामुळे या योजना सध्या मोठ्या आर्थिक तुटीत चालू असून, देखभाल व दुरुस्ती कामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना, विशेषतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांना, सकारात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या योजनांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, किशोर तरोणे तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे उपस्थित होते. दरम्यान, या सकारात्मक प्रतिसादामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी पालकमंत्र्यांकडे साकडे... अर्जुनी मोरगाव -तालुक्यातील चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या आर्थिक अडचणींबाबत आज इंद्रनील नाईक, पालकमंत्री, गोंदिया यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात अर्जुनी मोरगाव, रामपुरी, खांबी व सिरेगाव येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मागील १८ वर्षांपासून ग्रामीण भागातील सुमारे ५० टक्के नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करत असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, वाढता खर्च व अपुरी महसूल वसुली यामुळे या योजना सध्या मोठ्या आर्थिक तुटीत चालू असून, देखभाल व दुरुस्ती कामांवर त्याचा परिणाम होत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी तात्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना, विशेषतः मुख्य कार्यकारी अधिकारी यांना, सकारात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देत आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे या योजनांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे, किशोर तरोणे तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे उपस्थित होते. दरम्यान, या सकारात्मक प्रतिसादामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.1
- Post by मनिषा विजय काशीवार1
- Post by Dinesh kambli3
- काळी दौलत परिसरात अवकाळी पावसाने झोडपले काळी दौलत सह परीसरात मागील काही दिवसांपासून तप्त उन्हामुळे व प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह काळी दौलत सह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील ज्वारी मका हळद व भाजीपाला सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तांडवामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते. हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे4
- कृउबा समिती मार्केट मध्ये विक्रमी कापसाची आवक भिवापूर । उमरेड भिवापूर तालुक्यात कापसाचे लागवड क्षेत्र वाढल्याने कापसाचे उत्पादन मोठया प्रमाणात झाले असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समितीच्या मार्केट यार्ड मध्ये कापसा माल मोठया प्रमाणात आणित असल्याने जिकडे - तिकडे भरगच्च कापसाचे ठिग भरून असल्याचे दृष्टिक्षेपणास येत आहे. मार्च अखेर पर्यंत 53,656 क्विंटल इतकी विक्रमी आवक झाल्याची माहिती कृषी उत्पन बाजार समिती सचिव रामकृष्ण गोगल. यांनी दिली असून याबाबतची त्याची प्रतिक्रिया तसेच मार्केट यार्ड मध्ये दि.5 एप्रिलला 1876 क्विंटल आवक होती. व दर 6300 -8500 रुपये प्राप्त झाला. त्यामुळे शेतकऱ्यात समाधान व्यक्त केले जात आहे. भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये रविवार, बुधवार ,गुरुवार हे तीन दिवस कापूस खरेदी चे आहे. गेल्या वर्षी क्विंटल मागे 6330 ते 7600 रुपये भाव इतका होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केल्या जात आहे. खाजगी जिनिंग मध्ये कापसाच्या भावामध्ये तफावत असल्याने शेतकरी वर्ग कृउबा समिती कडे आकृष्ट होत असून कापसाचा माल यार्डत आणत असल्याची माहीती कृउबा समितीचे सभापती बालु इंगोले यांनी दिली आहे.1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- Post by कु सुषमा डबराल1
- हिवरा येथे परशुराम जयंती व बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी दि. 19 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय हिवरा येथे भगवान परशुराम जयंती व महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच सौ. मेघाताई बोरूळकर, उपसरपंच शरद पाटील, सदस्य राजुभाऊ धोतरकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या ‘कायका, दासोह, इष्टलिंग’ या तत्वांवर मार्गदर्शन करण्यात आले. अभय बोंपिलवार यांनी परशुरामांच्या कार्याचा उल्लेख केला. कार्यक्रमाचे आभार विशाल कदम यांनी मानले.2