मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेबाबत आढावा बैठक पंचायत समिती, दक्षिण सोलापूर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती, दक्षिण सोलापूर (अक्कलकोट विधानसभा) येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन कामांची गती वाढविणे, गुणवत्ता मानकांचे काटेकोर पालन करणे, निधीचा प्रभावी वापर करणे तसेच अडथळे दूर करून वेळेत काम पूर्ण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. विशेषतः शेतकरी हिताला प्राधान्य देत, प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा प्रभावी लाभ पोहोचविण्यासाठी स्थानिक पातळीवरील अडचणी तात्काळ सोडविणे आणि विभागांमधील समन्वय अधिक बळकट करणे यावर भर देण्यात आला. या योजनेमुळे शेती उत्पादन वाहतुकीस गती मिळून खर्चात बचत, बाजारपेठेपर्यंत जलद पोहोच आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, ही योजना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचा विश्वास व्यक्त केला. बैठकीस विविध गावांतील सरपंच, ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या सूचना व समस्या मांडल्या. प्रशासनाच्या वतीने त्यांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी मा. सुमीत शिंदे, तहसीलदार मा. किरण जमदांडे, गटविकास अधिकारी मा. मनोज राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. विलास यामावर, वन अधिकारी मा. रोहितकुमार गांगरडे, जिल्हा परिषद कृषी सभापती मा. रामप्पा चिवडशेट्टी, सभापती मा. संदीप टेळे, जिल्हा परिषद सदस्य मा. नेताजी खंडागळे, उप अभियंता मा. रामाराव म्हेत्रे, उपअभियंता मा. उषा बीडला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेबाबत आढावा बैठक पंचायत समिती, दक्षिण सोलापूर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती, दक्षिण सोलापूर (अक्कलकोट विधानसभा) येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन कामांची गती वाढविणे, गुणवत्ता मानकांचे काटेकोर पालन करणे, निधीचा प्रभावी वापर करणे तसेच अडथळे दूर करून वेळेत काम पूर्ण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. विशेषतः शेतकरी हिताला प्राधान्य देत, प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा प्रभावी लाभ पोहोचविण्यासाठी स्थानिक पातळीवरील अडचणी तात्काळ सोडविणे आणि विभागांमधील समन्वय अधिक बळकट करणे यावर भर देण्यात आला. या योजनेमुळे शेती उत्पादन वाहतुकीस गती मिळून खर्चात बचत, बाजारपेठेपर्यंत जलद पोहोच आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून, ही योजना शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचा विश्वास व्यक्त केला. बैठकीस विविध गावांतील सरपंच, ग्रामसेवक तसेच मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या सूचना व समस्या मांडल्या. प्रशासनाच्या वतीने त्यांच्या मागण्यांची सकारात्मक दखल घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी मा. सुमीत शिंदे, तहसीलदार मा. किरण जमदांडे, गटविकास अधिकारी मा. मनोज राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी मा. विलास यामावर, वन अधिकारी मा. रोहितकुमार गांगरडे, जिल्हा परिषद कृषी सभापती मा. रामप्पा चिवडशेट्टी, सभापती मा. संदीप टेळे, जिल्हा परिषद सदस्य मा. नेताजी खंडागळे, उप अभियंता मा. रामाराव म्हेत्रे, उपअभियंता मा. उषा बीडला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
- जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,या शिबिरात तब्बल 61 तरुणांनी सहभाग नोंदवत त्यांनी प्रत्यक्ष रक्तदान केले,कार्यक्रमाची सुरुवात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली,रक्तसंकलनासाठी सोलापूर येथील सिद्धेश्वर ब्लड बँकेचे कर्मचारी उपस्थित होते आणि त्यांचा विशेष सहकार्य या शिबिरास लाभला, मंडळाच्या वतीने सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळाने पहिल्यांदाच रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आणि पहिल्याच वेळी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,या विधायक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.याप्रसंगी ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.1
- सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.1
- *लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई – प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, वाहनासह ८.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.* लातूर शहरामध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थ (गुटखा) विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी उल्लेखनीय व प्रभावी कारवाई करून प्रतिबंधित गुटखा वाहनासह जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १८.०० वाजता गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल या मार्गावरून एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिजायर कार (क्रमांक MH-09 CV-9124) मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे अशी माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने मजगे नगर ते ट्विंकल लॅन्ड इंग्लिश स्कूल रोडवरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समोर सापळा रचून संशयित वाहन ताब्यात घेतले. चौकशीअंती चालकाने आपले नाव 1) नागनाथ हरीभाऊ मुंडे (वय ४५ वर्ष, रा. मजगे नगर, लातूर) असे सांगितले. वाहनाची झडती घेतली असता गाडीतील सीट मागे व डिकीत पांढऱ्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. त्यामध्ये विमल पान मसाला अंदाजे ₹1,24,800/-,V-1 तंबाखू , अंदाजे ₹31,200/-स्विफ्ट डिजायर कार अंदाजे ₹7,00,000/- असा एकूण ₹8,56,000/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 274, 275, 223 अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, पोलीस अंमलदार अर्जुन रजपूत, रियाज सौदागर, साहेबराव हाके, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली आहे.1
- *लातूर शहरात अल्पवयीन विद्यार्थ्यावर मारहाण करून सोन्याची अंगठी लुटणाऱ्या आरोपींना अटक; पोलिसांची जलद व प्रभावी कारवाई.* लातूर शहरातील गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका लूटप्रकरणाचा पोलिसांनी अल्पावधीत उलगडा करत दोन आरोपींना अटक केली असून, गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या आरोपींविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. दिनांक 14 मार्च 2026 रोजी फिर्यादी अथर्व दुष्यांत गाडेकर (वय 17 वर्षे, रा. माळी गल्ली, पटेल चौक, लातूर) यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ते व त्यांचे मित्र महाविद्यालय सुटल्यानंतर दुपारी अंदाजे 2.00 वाजता घराकडे जात असताना, आरोपी अजय दिलीप काळे (रा. मंठाळे नगर, लातूर) व त्याचे दोन साथीदार यांनी संगनमत करून मोटारसायकलवर येत त्यांना अडवले. आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व फिर्यादीच्या हातातील अंदाजे 20,000/- रुपये किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेतली व घटनास्थळावरून पसार झाले. सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समीरसिंह साळवे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड यांनी पथक गठित करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहिती संकलित करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला. अत्यंत शिताफीने आरोपी १) अजय दिलीप काळे २) देवेंद्र शिवराम सलगर ( दोघे रा. कातपूर रोड, लातूर) यांना ताब्यात घेण्यात आले. दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी त्यांना अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेली सुमारे 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत अंदाजे 75,000/- रुपये) तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल (किंमत अंदाजे 60,000/- रुपये) असा एकूण 1,35,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश चित्ते तसेच पोलीस अंमलदार राम गवारे, रविसन जाधव, संतोष गिरी, सचिन चंद्रपटले, अनिल कज्जेवाड, दीपक थोटे, राहुल गव्हाणे व राजू हनमंते यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.1
- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- प स कार्यालय तुळजापूर कामानिमित्त आलेल्या माणसांसाठी पंखे होतात बंद, ज्या विभागात माणसंच नाहीत त्या विभागाचे पंखे होतात चालू1