फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा मुस्लिम समाजात घेऊन जाणारा नेता हरपला. मुस्लिम ओबीसींचा योद्धा गेला. शब्बीर अन्सारी गेले. मुस्लिम ओबीसींचा योद्धा गेला. पक्का लोहियावादी आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा मुस्लिम समाजात घेऊन जाणारा नेता हरपला. केवळ मुस्लिम ओबीसीत नव्हे तर महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचा पाया रचणाऱ्यांपैकी ते एक होते. महाराष्ट्रातील ओबीसींचे मूळपुरुष अॅड. जनार्दन पाटील यांच्यासोबत सत्तरच्या दशकातच ते काम करत होते. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ तर राष्ट्रीय पातळीवर शरद यादव, रामविलास पासवान, चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्यासोबतीने शब्बीर भाईंनी काम केलं. दिग्ग्ज सिने अभिनेते दिलीप कुमार पस्मांदा मुस्लिमांच्या चळवळीत उतरले तेही शब्बीर भाईंमुळेच. शायर हसन कमाल, अंजुमन इस्लामचे डॉ. झहीर काझी, बिहारचे अली अन्वर अन्सारी या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी मुस्लिम ओबीसींची चळवळ राष्ट्रीय स्तरावर नेली. जनार्दन पाटील यांच्या ओबीसी संघटनेत शब्बीर भाई मुस्लिम ओबीसी विभागाचे प्रमुख होते. पण हा विभाग नको स्वतंत्र संघटना हवी, असं मी जेव्हा दोघांना म्हणालो तेव्हा दोघांनीही ते मान्य केलं. शब्बीरभाई, जनार्दन पाटील आणि मी आम्ही तिघांनी महाराष्ट्रात मुस्लिम ओबीसी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जालन्याला १९८३ ला झालेल्या स्थापना मेळाव्याला चौधरी ब्रह्मप्रकाश, अझगर अली इंजिनिअर, रा. सु. गवई, रामविलास पासवान हजर होते. पुढे १९९५ मध्ये त्याच संघटनेचं रूपांतर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायशेनमध्ये झालं. विलासराव देशमुख आणि माधवराव शिंदे यांचंही प्रेम शब्बीर भाईंना मिळालं. काँग्रेसमधून त्यांनी दोन आमदार निवडून आणले होते. मिरजेला हाफिज धतुरे आणि भिवंडीला रशीद ताहीर मोमीन. शब्बीर भाई म्हणजे अखंड भ्रमंती. पायाला भिंगरी लावून ते फिरत होते. महाराष्ट्रातलं असं एकही खेडं नसेल जिथे पस्मांदा मुस्लिम राहत होते आणि तिथे शब्बीर भाई गेले नाहीत. मुस्लिम समाजातल्या ६० ते ७० हुन अधिक जाती त्यांनी शोधून काढल्या. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. पुढे शरद पवार मुख्यमंत्री असताना, त्यांच्या मदतीने (डिसेंबर १९९४) मंडल आयोग मुस्लिम ओबीसींसाठी लागू गेला. मीच तेव्हा त्यांना पवार साहेबांकडे घेऊन गेलो होतो. खेड्यापाड्यातल्या मागासवर्गीय मुस्लिमांची नावं, त्यांचे व्यवसाय, गावगाड्यातील त्यांचं स्थान पवार साहेबांना माहीत होतं. पण शब्बीर भाईंनी ज्या पद्धतीने या सर्वांना गोळा केलं होतं, ते पाहून पवार साहेब चकीत झाले होते. त्यांनी निर्णय घेतला आणि या सगळ्या वंचित मुस्लिम जातींना सवलती मिळाल्या. जुलाह, बुनकर, मोमीन, अत्तार, मेहतर, बकर कसाब, कुरेशी, मुलाणी, अस्वलवाले, माकडवाले, छप्परबंद डफलीवाले, रंगरेज, रंगारी, गुजर, मुजावर, मदारी, पिंजारी, नदाफ, पाथरवट, तांबोली, फकीर, अन्सारी अशा वंचित समाजातील मुलं आता शिकू लागली आहेत. एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मुलं पूर्वी मुस्लिम समाजातून डॉक्टर किंवा इंजिनिअर होत होती. आता हजारो मुलांना संधी मिळू लागली आहे. शिक्षण आणि नोकरी दोन्ही. हे केवळ शब्बीर अन्सारी यांच्यामुळे शक्य झालं आहे. वंचित, उपेक्षित आणि आताच्या काळात जणू अस्पृश्यता वाट्याला आलेल्या मुस्लिम समाजातील मागास जातींमध्ये एवढा मोठा कायापालट घडवून आणणारा स्वातंत्र्यानंतर शब्बीर अन्सारी यांच्यासारखा दुसरा नेता झाला नाही. इतकं मोठं काम करूनही हा माणूस आयुष्यभर पत्र्याच्या घरात राहिला. फकीर राहिला. आपल्याकडे माणसांची कदर नसते. ती मेल्यानंतरच होते. पस्मांदा मुस्लिमांना स्वातंत्र्याच्या चळवळीत नेतृत्व दिलं ते अब्दुल कयुम अन्सारी यांनी. पण स्वातंत्र्यानंतर आरक्षणाच्या चळवळीत संघटीत केलं ते शब्बीर अन्सारी यांनी. शब्बीर भाईंचे एक सहकारी अली अन्वर अन्सारी यांना त्यांचं काम पाहून नीतीश कुमार यांनी थेट खासदार केलं. शब्बीर भाईंमुळे अनेकांना राजकीय ताकद मिळाली, पण त्यांना मात्र ना सरकारी किताब मिळाला ना पद्म पुरस्कार. शब्बीर भाई जाणं ही माझ्यासाठी मोठी हानी आहे. ४५ ते ४६ वर्ष त्यांच्यासोबत काम करत होतो. हा सहप्रवास आता थांबला. शब्बीर भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली ! अलविदा ! ~ कपिल पाटील
फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा मुस्लिम समाजात घेऊन जाणारा नेता हरपला. मुस्लिम ओबीसींचा योद्धा गेला. शब्बीर अन्सारी गेले. मुस्लिम ओबीसींचा योद्धा गेला. पक्का लोहियावादी आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारांचा वारसा मुस्लिम समाजात घेऊन जाणारा नेता हरपला. केवळ मुस्लिम ओबीसीत नव्हे तर महाराष्ट्रातील ओबीसी चळवळीचा पाया रचणाऱ्यांपैकी ते एक होते. महाराष्ट्रातील ओबीसींचे मूळपुरुष अॅड. जनार्दन पाटील यांच्यासोबत सत्तरच्या दशकातच ते काम करत होते. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ तर राष्ट्रीय पातळीवर शरद यादव, रामविलास पासवान, चौधरी ब्रह्मप्रकाश यांच्यासोबतीने शब्बीर भाईंनी काम केलं. दिग्ग्ज सिने अभिनेते दिलीप कुमार पस्मांदा मुस्लिमांच्या चळवळीत उतरले तेही शब्बीर भाईंमुळेच. शायर हसन कमाल, अंजुमन इस्लामचे डॉ. झहीर काझी, बिहारचे अली अन्वर अन्सारी या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी मुस्लिम ओबीसींची चळवळ राष्ट्रीय स्तरावर नेली. जनार्दन पाटील यांच्या ओबीसी संघटनेत शब्बीर भाई मुस्लिम ओबीसी विभागाचे प्रमुख होते. पण हा विभाग नको स्वतंत्र संघटना हवी, असं मी जेव्हा दोघांना म्हणालो तेव्हा दोघांनीही ते मान्य केलं. शब्बीरभाई, जनार्दन पाटील आणि मी आम्ही तिघांनी महाराष्ट्रात मुस्लिम ओबीसी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जालन्याला १९८३ ला झालेल्या स्थापना मेळाव्याला चौधरी ब्रह्मप्रकाश, अझगर अली इंजिनिअर, रा. सु. गवई, रामविलास पासवान हजर होते. पुढे १९९५ मध्ये त्याच संघटनेचं रूपांतर ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायशेनमध्ये झालं. विलासराव देशमुख आणि माधवराव शिंदे यांचंही प्रेम शब्बीर भाईंना मिळालं. काँग्रेसमधून त्यांनी दोन आमदार निवडून आणले होते. मिरजेला हाफिज धतुरे आणि भिवंडीला रशीद ताहीर मोमीन. शब्बीर भाई म्हणजे अखंड भ्रमंती. पायाला भिंगरी लावून ते फिरत होते. महाराष्ट्रातलं असं एकही खेडं नसेल जिथे पस्मांदा मुस्लिम राहत होते आणि तिथे शब्बीर भाई गेले नाहीत. मुस्लिम समाजातल्या ६० ते ७० हुन अधिक जाती त्यांनी शोधून काढल्या. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं. पुढे शरद पवार मुख्यमंत्री असताना, त्यांच्या मदतीने (डिसेंबर १९९४) मंडल आयोग मुस्लिम ओबीसींसाठी लागू गेला. मीच तेव्हा त्यांना पवार साहेबांकडे घेऊन गेलो होतो. खेड्यापाड्यातल्या मागासवर्गीय मुस्लिमांची नावं, त्यांचे व्यवसाय, गावगाड्यातील त्यांचं स्थान पवार साहेबांना माहीत होतं. पण शब्बीर भाईंनी ज्या पद्धतीने या सर्वांना गोळा केलं होतं, ते पाहून पवार साहेब चकीत झाले होते. त्यांनी निर्णय घेतला आणि या सगळ्या वंचित मुस्लिम जातींना सवलती मिळाल्या. जुलाह, बुनकर, मोमीन, अत्तार, मेहतर, बकर कसाब, कुरेशी, मुलाणी, अस्वलवाले, माकडवाले, छप्परबंद डफलीवाले, रंगरेज, रंगारी, गुजर, मुजावर, मदारी, पिंजारी, नदाफ, पाथरवट, तांबोली, फकीर, अन्सारी अशा वंचित समाजातील मुलं आता शिकू लागली आहेत. एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मुलं पूर्वी मुस्लिम समाजातून डॉक्टर किंवा इंजिनिअर होत होती. आता हजारो मुलांना संधी मिळू लागली आहे. शिक्षण आणि नोकरी दोन्ही. हे केवळ शब्बीर अन्सारी यांच्यामुळे शक्य झालं आहे. वंचित, उपेक्षित आणि आताच्या काळात जणू अस्पृश्यता वाट्याला आलेल्या मुस्लिम समाजातील मागास जातींमध्ये एवढा मोठा कायापालट घडवून आणणारा स्वातंत्र्यानंतर शब्बीर अन्सारी यांच्यासारखा दुसरा नेता झाला नाही. इतकं मोठं काम करूनही हा माणूस आयुष्यभर पत्र्याच्या घरात राहिला. फकीर राहिला. आपल्याकडे माणसांची कदर नसते. ती मेल्यानंतरच होते. पस्मांदा मुस्लिमांना स्वातंत्र्याच्या चळवळीत नेतृत्व दिलं ते अब्दुल कयुम अन्सारी यांनी. पण स्वातंत्र्यानंतर आरक्षणाच्या चळवळीत संघटीत केलं ते शब्बीर अन्सारी यांनी. शब्बीर भाईंचे एक सहकारी अली अन्वर अन्सारी यांना त्यांचं काम पाहून नीतीश कुमार यांनी थेट खासदार केलं. शब्बीर भाईंमुळे अनेकांना राजकीय ताकद मिळाली, पण त्यांना मात्र ना सरकारी किताब मिळाला ना पद्म पुरस्कार. शब्बीर भाई जाणं ही माझ्यासाठी मोठी हानी आहे. ४५ ते ४६ वर्ष त्यांच्यासोबत काम करत होतो. हा सहप्रवास आता थांबला. शब्बीर भाईंना भावपूर्ण श्रद्धांजली ! अलविदा ! ~ कपिल पाटील
- शहरात कुंटणखाना चालू होणाऱ्या तीन आरोपींना वाळूज एमआयडीसी परिसरातील कामगार चौकातील एका लॉज परिसरातून गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.1
- बदनापूरच्या देवगाव फाटा परिसरात अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ बदनापूर (प्रतिनिधी) – शहरालगत असलेल्या देवगाव फाटा परिसरातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या या परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका इसमाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह दिसून आला असता. याची माहिती बदनापूर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नसून, मृत्यूचे नेमके कारण काय याबाबतही स्पष्टता आलेली नसली तरी, हा घातपात असल्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे. तर पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.2
- Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- नासिक में दर्दनाक हादसा! कुएं में गिरी कार, एक ही परिवार के 9 लोगों की मौत नासिक में एक दर्दनाक हादसा हो गया. जहां एक कार कुएं में गिर गई. जिससे 9 लोगों की मौत दर्दनाक मौत हो गई. बताया जाता है कि कार में सवार परिवार एक इवेंट में गया था. नासिक से 40 किमी दूर दिंडोरी तालुका के शिवाजीनगर इलाके में शुक्रवार रात करीब 11:30 बजे एक भयानक हादसा हो गया. यहां 'इंदौरे' गांव के दरगोड़े परिवार के 9 सदस्यों की उस समय दर्दनाक मौत हो गई, जब एक मारुति एक्सएल कार कुएं में गिर गई. दिंडोरीके शिवाजीनगर के राजे बैंक्वेट हॉल में वडजे क्लासेस की तरफ से वार्षिक समारोह आयोजित किया गया था. जहां इंदौरे गांव से सुनील दत्तात्रेय दरगोड़े अपने परिवार के बच्चों को इस इवेंट में लेकर आए थे. इवेंट के बाद दिंडोरी से दरगोड़े परिवार कार से घर लौट रहा था, तभी ड्राइवर का कंट्रोल खो गया और कार सड़क किनारे पानी से भरे कुएं में गिर गई. हादसे की जानकारी मिलते ही प्रशासन, पुलिस, समाजसेवी, नगर पंचायत की फायर ब्रिगेड, पुलिस और डिजास्टर मैनेजमेंट की टीम मौके पर पहुंची और तुरंत बचाव का काम शुरू किया गया. चूंकि कुआं पूरी तरह से पानी से भरा हुआ था, इसलिए राहत के काम में बड़ी रुकावटें आईं. आधी रात को दो क्रेन की मदद से कार को बाहर निकाला गया.1
- छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी : मराठा कुणबी मंत्रालय वेगळ्याने स्थापन करा मराठ्याचे मंत्री विखे पाटील कामच करत नाही मनोज जरांगे पाटील यांचा विखे पाटलावर..1
- आडगाव राजा जगदंबा देवीचा यात्रा महोत्सव उत्साहात साजरा1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- धुळे जिल्ह्यात पाकिस्तान निर्मित सौंदर्यप्रसाधनांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण 61 हजार 474 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.1