Shuru
Apke Nagar Ki App…
Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News
Gallinews Bharat
Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News Aimim पर फिर हमलावर 'Sdpi': SIR | Shah Sameer Ahmed | Hindi News
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भोकरदन येथे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थित मध्ये प्रसिद्ध व्यापारी अय्युब सेठ बेग, मंजूर सेठ बेग यांच्या निवास्थानी ईद स्नेह मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न1
- ऐन उन्हाळ्यात नदिला आला पुर ! अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा व बीडमधील वलीपूरमध्ये नदीला पूर.. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदिला पुर आला. बीडमध्ये अवकाळी पावसामुळे वलीपूरमध्ये नदीला पूर! 3 एप्रिल 2026 रोजी बीड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वडवणी तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसल्यानंतर आता बीड तालुक्यातील वलीपूर भागात मुसळधार पावसामुळे चक्क नदीला पूर आला आहे.1
- अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद चिघळला; तिसऱ्या दिवशीही तणाव कायम सोलापूर (माढा तालुका), ३ एप्रिल २०२६ — सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्थापनेमुळे मराठा आणि धनगर समाजात निर्माण झालेला वाद तिसऱ्या दिवशीही शमलेला नाही. गावात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. जमावबंदी लागू करण्यात आली असून, दगडफेक आणि लाठीचार्जच्या घटनाही घडल्या आहेत. वादाची पार्श्वभूमी खेलोबा मंदिर परिसरात (पालखी मार्गावर) मंगळवारी रात्री अंधारात पुतळा बसवण्यात आला. धनगर समाजाकडून याला तीव्र विरोध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, देवस्थानच्या २० गुंठे जागेवर अतिक्रमण झाले असून, पालखी मार्ग अडवला जाईल. त्यामुळे पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. मराठा समाजाकडून मात्र पुतळा सन्मानाने ठेवण्याची भूमिका घेण्यात आली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पूजा-अर्चा करण्याच्या मुद्द्यावर दोन्ही गट आमने-सामने आले. संतप्त जमावाने तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली. मोजमाप (सर्व्हे) सुरू असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अधिकाऱ्यांच्या अंगावर धाव घेतल्याचेही दिसले. गोपीचंद पडळकरांची आक्रमक भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले, “खेलोबा मंदिरालगत चुकीच्या पद्धतीने (रात्री अंधारात) पुतळा बसवणे कदापि सहन केले जाणार नाही. पुतळा बसवायची जबाबदारी माझ्यावर सोपवा — वाजत-गाजत, दिवसा सन्मानाने बसवू.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेंबरमध्ये माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत “सात गुंठे जागा उपलब्ध आहे, तिथे पुतळा बसवू” असे सूचित केल्याचे पडळकर यांनी सांगितले. त्यांनी यात राजकारण सुरू असल्याचा आरोपही केला. या वक्तव्यानंतर काही मराठा आंदोलकांनी पडळकरांची “जीभ घसरली” अशी टीका केली. लक्ष्मण हाके यांची भूमिका धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आंदोलन तीव्र केले. “छत्रपतींच्या पुतळ्याला नव्हे, त्या जागेला विरोध आहे,” असे सांगत त्यांनी पुतळा हटवण्यावर ठाम राहिले. “गोळ्या घातल्या तरी माघार नाही,” असेही त्यांनी म्हटले. आज मोजणी सुरू असताना हाके यांनी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसले. इतर प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दोन्ही समाजांना शांतता राखण्याचे आवाहन केले. प्रशासन दोन्ही बाजूंसोबत चर्चा करत आहे, पण तोडगा अद्याप निघालेला नाही. गावातील काही स्थानिकांनी “सर्व समाज मंदिराचे भक्त आहेत, जातीय तेढ कशी निर्माण झाली?” असा प्रश्न उपस्थित केला. शिवराय हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या पुतळ्यावरून समाजात भांडणे होणे आणि राजकीय रंग चढणे हे दुर्दैवी आहे. दोन्ही समाजांनी शांतता राखून, प्रशासनाच्या माध्यमातून योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- Post by AapTak Hindi News Channel1
- मराठवाडा सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय बाबासाहेब भाऊ आकात स्मृती पुरस्कार शुक्रवारी प्राचार्य डॉक्टर भागवत कटारे यांच्या हस्ते प्रसिद्ध चित्रपट निर्माती दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला हा सोहळा परतुर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी कवी दासू वैद्य, संस्थेचे सचिव कपिल भैया आकात, प्राचार्य भारत खांदारे यांच्यासह सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.1
- Post by AKBAR SHAHA1
- चोरट्यांनी कारची केली चोरी - तीच झाला अपघात ; चोरटे फरार.. कजगाव परिसरात दिनांक २ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक कार चोरीची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, हीच चोरी गेलेली कार नागद जवळील जामडी परिसरात भरधाव वेगात नेत असताना अपघातग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्यानंतर चोरट्यांनी गाडी घटनास्थळीच सोडून पळ काढला. अपघात झालेल्या गाडीचे मालक इंदल सिंग सरदार सिंग परदेशी असल्याचे सांगितले जात आहे.1
- Post by AapTak Hindi News Channel1