भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ३१ मे ते ३ जून या कालावधीत 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे. मेघगर्जना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली अथवा मोकळ्या मैदानात थांबू नये, तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र आणि लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा आणि कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. घराबाहेर मोकळ्या जागेत वीज चमकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावेत आणि डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा, असेही सुचवण्यात आले आहे. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल तसेच जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला थांबणे टाळावे आणि योग्य ती दक्षता घ्यावी. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करून आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या वा नियोजित केलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनावरांचेही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. धरण व नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन धरणाच्या पाण्यात, नदीच्या वा कालव्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी स्वतःचे छायाचित्र काढणे टाळावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी नजीकचे पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधता येईल. याव्यतिरिक्त, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ११२, १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा 'येलो अलर्ट' कायम राहणार आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ३१ मे ते ३ जून या कालावधीत 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गिते यांनी केले आहे. मेघगर्जना, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना नागरिकांनी झाडाखाली अथवा मोकळ्या मैदानात थांबू नये, तर सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच टॉवर्स, ध्वजांचे खांब, विजेचे खांब, धातूचे कुंपण, रोहित्र आणि लोंबकळणाऱ्या केबल्सपासून दूर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा आणि कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. घराबाहेर मोकळ्या जागेत वीज चमकल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने कान झाकावेत आणि डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवावा, असेही सुचवण्यात आले आहे. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल तसेच जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी त्यांच्या आजूबाजूला थांबणे टाळावे आणि योग्य ती दक्षता घ्यावी. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच नियोजन करून आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या वा नियोजित केलेल्या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनावरांचेही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. धरण व नदी क्षेत्रात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेऊन धरणाच्या पाण्यात, नदीच्या वा कालव्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी स्वतःचे छायाचित्र काढणे टाळावे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. मदतीसाठी नजीकचे पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधता येईल. याव्यतिरिक्त, जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय येथील ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४० या दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ११२, १०७७ या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात ३ जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा 'येलो अलर्ट' कायम राहणार आहे.
- बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिकमास तपपूर्ती सोहळ्याची आणि भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सवाची सांगता प्रसिद्ध कथाकार ह.भ.प. कविताताई साबळे, शिर्डी यांच्या अमृततुल्य कीर्तनाने झाली. या सोहळ्याला महानंदच्या संचालिका आदरणीय सौ. प्रजाक्ताताई सुरेश आण्णा धस, पाटोदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. दिपालीताई राजू भैय्या जाधव, काला महापंगतीचे यजमान सौ. मिरा सुदर्शन चव्हाण, संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. सतीश महाराज उरणकर आणि महिला सप्ताहाचे आयोजक सौ. सुनंदाताई सतीश महाराज उरणकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीमती सुनिता उगले मॅडम आणि सौ. आशाताई सोमिनाथ कोल्हे यांच्यासह पाटोदा शहरातील मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.1
- बारामती शहर आणि परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. या कारवाई अंतर्गत अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकण्यात आले, ज्यामुळे अवैध दारू व्यवसायाला मोठा दणका बसला आहे.1
- गुजरातमध्ये एका रस्त्याच्या मधोमध एक होर्डिंग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणत्याही मालमत्तेचे नुकसान झाले नाही.1
- शिरूर एमआयडीसी पोलिसांनी निमगाव भोगी येथील शेळके वस्ती परिसरात छापा टाकून गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा मोठा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे, ज्याला न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश गुलाब लोंढे (वय ३४, रा. शेवाळे वस्ती, निमगाव भोगी, ता. शिरूर) याला २९ मे रोजी अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. निमगाव भोगी येथील शेळके वस्ती परिसरात शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपीकडे तयार हातभट्टी दारू, तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे कच्चे रसायन आणि साहित्य आढळून आले. कारवाईदरम्यान सुमारे ५०० लिटर कच्चे रसायन, २०० लिटर तयार गावठी हातभट्टी दारू आणि एक अल्टो कार (एमएच १२ पीएन ३६३४) असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घटनास्थळी असलेले दारू निर्मितीसाठीचे रसायन व साहित्य दोन जेसीबी मशीनच्या साहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३ आणि महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीविरुद्ध यापूर्वीही दारूबंदी कायद्यांतर्गत तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, विलास आंबेकर, संतोष औटी, उमेश कुतवळ, योगेश गुंड, विद्या बनकर, किशोर शिवणकर, अमोल रासकर, अजित पवार आणि चालक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात करीत आहेत.1
- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील बेळगाववस्ती येथील एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जिथे सर्पदंशामुळे त्यांच्या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर बीड जिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाची कोणतीही नोंद न घेतल्याने हे कुटुंब शासनाच्या 'राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह' अनुदान योजनेपासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. बेळगाववस्ती येथील शेतकरी रोहिदास कोळपे आपल्या कुटुंबासह घरासमोरील अंगणात झोपले असताना पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास, इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेल्या त्यांचा मुलगा सोहम रोहिदास कोळपे झोपेतच किंचाळला. त्याने उजव्या पायावर साप चावल्याचे सांगितल्यावर, पिंडरीवर दातांच्या खुणा व रक्त दिसले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने सोहमला बीडकडे उपचारासाठी नेले. प्रथम एका खासगी रुग्णालयात उपचार न मिळाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओपीडीतील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही वैद्यकीय नोंद, पोलिस माहिती अथवा आवश्यक प्रक्रिया न करता त्यांना मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले गेले. निरक्षर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या शेतकरी कुटुंबाने मुलाचा मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार केले. ही गंभीर बाब डॉ. गणेश ढवळे यांनी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली असता उघडकीस आली. डॉ. ढवळे यांनी स्पष्ट केले की, 'राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह' योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र, यासाठी एफआयआर, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला आणि शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी प्रकरणाची नोंदच घेतली नसल्यामुळे, या गरीब कुटुंबाला शासनाच्या या महत्त्वाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच सोहम कोळपे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून सानुग्रह अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंकी यांच्याकडे केली आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका गरीब शेतकरी कुटुंबाचे मुलाच्या मृत्यूसह शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याचे दुहेरी नुकसान झाले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी डॉ. ढवळे यांनी लावून धरली आहे.1
- स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर बीड जिल्ह्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने स्थानिक राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे बीड शहरातील राजकीय वातावरण तापले असून, धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.1
- शिरूर शहरात एका थार कार चालकाने भररस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या पटांगणात धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये चालक भरधाव वेगात थार वाहन गोलाकार फिरवताना दिसत आहे. या वेळी मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून परिसरात काही काळ थरारक वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. या बेफाम स्टंटबाजीमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, कारण अशा प्रकारच्या कृत्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि व्हायरल होण्याच्या नादात अनेकजण स्वतःचा तसेच इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत आहेत. दरम्यान, हा व्हिडिओ शिरूर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित वाहन चालकाची ओळख पटवून त्याच्यावर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस कोणती भूमिका घेतात आणि कायदेशीर कारवाई करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.1