Shuru
Apke Nagar Ki App…
स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर बीड जिल्ह्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने स्थानिक राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे बीड शहरातील राजकीय वातावरण तापले असून, धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
बालाजी जगतकर
स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर बीड जिल्ह्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने स्थानिक राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे बीड शहरातील राजकीय वातावरण तापले असून, धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील बेळगाववस्ती येथील एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जिथे सर्पदंशामुळे त्यांच्या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर बीड जिल्हा रुग्णालयातील संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकरणाची कोणतीही नोंद न घेतल्याने हे कुटुंब शासनाच्या 'राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह' अनुदान योजनेपासून वंचित राहिल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केला आहे. बेळगाववस्ती येथील शेतकरी रोहिदास कोळपे आपल्या कुटुंबासह घरासमोरील अंगणात झोपले असताना पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास, इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेल्या त्यांचा मुलगा सोहम रोहिदास कोळपे झोपेतच किंचाळला. त्याने उजव्या पायावर साप चावल्याचे सांगितल्यावर, पिंडरीवर दातांच्या खुणा व रक्त दिसले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तातडीने सोहमला बीडकडे उपचारासाठी नेले. प्रथम एका खासगी रुग्णालयात उपचार न मिळाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओपीडीतील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही वैद्यकीय नोंद, पोलिस माहिती अथवा आवश्यक प्रक्रिया न करता त्यांना मृतदेह घेऊन जाण्यास सांगितले गेले. निरक्षर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या या शेतकरी कुटुंबाने मुलाचा मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार केले. ही गंभीर बाब डॉ. गणेश ढवळे यांनी कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली असता उघडकीस आली. डॉ. ढवळे यांनी स्पष्ट केले की, 'राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह' योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते. मात्र, यासाठी एफआयआर, पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला आणि शाळेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी प्रकरणाची नोंदच घेतली नसल्यामुळे, या गरीब कुटुंबाला शासनाच्या या महत्त्वाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, तसेच सोहम कोळपे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून सानुग्रह अनुदान मिळवून द्यावे, अशी मागणी डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंकी यांच्याकडे केली आहे. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे एका गरीब शेतकरी कुटुंबाचे मुलाच्या मृत्यूसह शासनाच्या आर्थिक मदतीपासून वंचित राहण्याचे दुहेरी नुकसान झाले असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी डॉ. ढवळे यांनी लावून धरली आहे.1
- स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यावर बीड जिल्ह्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याने स्थानिक राजकारण तापले आहे. या प्रकरणामुळे बीड शहरातील राजकीय वातावरण तापले असून, धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलीस प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.1
- बीड जिल्ह्यातील पाटोदा येथील श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी संस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या अधिकमास तपपूर्ती सोहळ्याची आणि भव्य दिव्य महिला कीर्तन महोत्सवाची सांगता प्रसिद्ध कथाकार ह.भ.प. कविताताई साबळे, शिर्डी यांच्या अमृततुल्य कीर्तनाने झाली. या सोहळ्याला महानंदच्या संचालिका आदरणीय सौ. प्रजाक्ताताई सुरेश आण्णा धस, पाटोदा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. दिपालीताई राजू भैय्या जाधव, काला महापंगतीचे यजमान सौ. मिरा सुदर्शन चव्हाण, संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. सतीश महाराज उरणकर आणि महिला सप्ताहाचे आयोजक सौ. सुनंदाताई सतीश महाराज उरणकर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी श्रीमती सुनिता उगले मॅडम आणि सौ. आशाताई सोमिनाथ कोल्हे यांच्यासह पाटोदा शहरातील मोठ्या संख्येने महिलावर्ग उपस्थित होता.1
- परभणी जिल्ह्यातील खळी येथे अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती साजरी करण्यात आली.1
- मंठा येथील तहसील कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून उपोषण सुरू आहे. संभाजी ब्रिगेडचे मंठा तालुका अध्यक्ष बाळासाहेब खवणे हे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हे उपोषण करत आहेत.1
- मंठा तालुक्यात दि. २६ मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे केहाळ वडगाव परिसरात मोठे नुकसान झाले आहे. गावातील एक वीज पोल कोसळला असून, शेतातील दोन ठिकाणी प्रत्येकी चार-चार वीज पोल मोडून पडल्याने विद्युत तारा तुटल्या आहेत. या घटनेला तब्बल पाच दिवस उलटूनही महावितरणकडून दुरुस्तीचे काम करण्यात आले नसल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शेतातील पिकांना पाणी देणे तसेच जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करणे अत्यंत कठीण झाले आहे. विहिरी व बोअरवेलच्या मोटारी बंद पडल्याने अनेक शेतकऱ्यांना जनावरांना हाताने पाणी शेंदून पाजावे लागत आहे, ज्यामुळे पशुपालक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले असून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, गावात कोसळलेला वीज पोल रस्त्यावर आडवा पडल्यामुळे वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय, अनेक मीटरधारकांनी स्वतःच्या खर्चाने वायर खरेदी करून दूरवरून घरापर्यंत वीज जोडणी केल्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या गोरगरीब नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडला आहे. पावसाळा तोंडावर आला असून लवकरच खरीप हंगामातील पेरणीची कामे सुरू होणार आहेत. पेरणी झाल्यानंतर शेतांमध्ये वीज पोल उभारणे व दुरुस्तीची कामे करणे अधिक अवघड होणार असल्याने, पाऊस व पेरणीपूर्वीच तातडीने नवीन पोल उभारून तुटलेल्या तारा दुरुस्त कराव्यात आणि वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी केहाळ वडगाव येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. महावितरणच्या या दिरंगाईमुळे नागरिकांना, शेतकऱ्यांना व पशुपालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून ही समस्या तातडीने मार्गी लावावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.1
- बीड तालुक्यातील रंजेगाव येथे एका महिलेसह तिच्या मुलांवर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गावातील पाच जणांविरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून, सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रंजेगाव येथील सुवर्णमाला बनसोडे या आपल्या घरी एकट्या असताना रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी त्यांच्या घरासमोर लघुशंका केली आणि पत्ते खेळत बसले होते. 'घरासमोर पत्ते खेळू नका, येथे लघुशंका करू नका व घरावर दगडफेक करू नका' अशी विनंती बनसोडे यांनी केली असता, संबंधित तरुणांना याचा राग आला. त्यांनी बनसोडे यांना जातीवाचक शिवीगाळ करत 'जास्त माजलीस का, चांभार डे तुझा काटा काढीन' अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी टांभी, बेल्ट, काठी आणि चप्पलने सुवर्णमाला बनसोडे यांना बेदम मारहाण केली. तसेच, त्यांच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. याच हल्ल्यात त्यांच्या १२ वर्षीय मुलीला उचलून फेकण्यात आले, तर १५ वर्षीय मुलालाही बेल्टने मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेनंतर सुवर्णमाला बनसोडे यांची मुलगी आणि मुलगा मोटारसायकलवरून पिंपळनेर पोलीस ठाण्याकडे निघाले होते, मात्र अर्ध्या रस्त्यात मोटारसायकल पंक्चर झाल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याची गाडी घटनास्थळी पोहोचली आणि जखमींना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडित सुवर्णमाला बनसोडे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या एपीआय यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून तात्काळ गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, या घटनेचा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.2
- जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात रविवारी (३१ मे) दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. या वादळी पावसाच्या तडाख्यामुळे तालुक्यात पत्रे उडून गेली, अनेक झाडे उन्मळून पडली आणि सौर पॅनलचेही नुकसान झाले. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.1