मृत्यूला अपघाताचे रूप देत ५० लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न; डॉक्टर-पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गुन्हा मृत्यूला अपघाताचे रूप देत ५० लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न; डॉक्टर-पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गुन्हा . जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे वर्षभरापूर्वी आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू दाखवून विमा रक्कम लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या फसवणुकीचा पर्दाफाश झाल्यानंतर डॉक्टर, पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील राजेंद्र जाधव यांचा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी लिव्हरच्या आजारामुळे मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर २०२५ मध्ये त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या विमा दाव्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एका कंपनीकडून दाव्याची पडताळणी करताना या प्रकरणातील संशयास्पद बाबी समोर आल्या. तपासादरम्यान वापरलेल्या फोटोवरील मृत्यूची तारीख आणि इतर कागदपत्रांमधील माहिती यात विसंगती आढळून आली. यामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तपासात या प्रकरणात काही डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणामागे चार ते पाच कोटी रुपयांच्या मोठ्या विमा घोटाळ्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विमा दाव्यांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
मृत्यूला अपघाताचे रूप देत ५० लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न; डॉक्टर-पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गुन्हा मृत्यूला अपघाताचे रूप देत ५० लाखांचा विमा लाटण्याचा प्रयत्न; डॉक्टर-पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जणांवर गुन्हा . जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे वर्षभरापूर्वी आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू दाखवून विमा रक्कम लाटण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तब्बल ५० लाख रुपयांचा विमा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या फसवणुकीचा पर्दाफाश झाल्यानंतर डॉक्टर, पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील राजेंद्र जाधव यांचा २३ फेब्रुवारी २०२४ रोजी लिव्हरच्या आजारामुळे मृत्यू झाला होता. मात्र त्यानंतर २०२५ मध्ये त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला. या बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीकडे ५० लाख रुपयांच्या विमा दाव्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. दरम्यान, एका कंपनीकडून दाव्याची पडताळणी करताना या प्रकरणातील संशयास्पद बाबी समोर आल्या. तपासादरम्यान वापरलेल्या फोटोवरील मृत्यूची तारीख आणि इतर कागदपत्रांमधील माहिती यात विसंगती आढळून आली. यामुळे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. तपासात या प्रकरणात काही डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय या प्रकरणामागे चार ते पाच कोटी रुपयांच्या मोठ्या विमा घोटाळ्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विमा दाव्यांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून या घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
- महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन आमदार हिकमत उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हिकमत दादा उढाण यांनी सिंचन, रस्ते व साखर उद्योगाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना त्यांनी प्रादेशिक असमतोल दूर करण्याची जोरदार मागणी केली. घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाड्यातील सिंचनाचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे अधोरेखित केले. नदीजोड प्रकल्पांतर्गत वैतरणा व उल्हास खोऱ्यातील वाढीव पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या प्रस्तावाचे त्यांनी स्वागत केले. मात्र असे मोठे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे तोपर्यंत स्थानिक लघु सिंचन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “२५-३० वर्षांपूर्वी उभारलेले कोल्हापूर पद्धतीचे बंधारे (KT Weirs) आज जीर्ण अवस्थेत असून अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे चांगला पाऊस पडूनही पाणी साठत नाही. या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करून जायकवाडी धरणातून वाहून जाणारे पाणी अडवले, तर परिसरातील ३० ते ३५ गावांचा सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो,” असे त्यांनी सभागृहात नमूद केले. तसेच तब्बल १८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हतवन प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. रस्त्यांच्या विषयावर बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मुंबईसारख्या शहरांना माेठ्या प्रमाणात निधी तर ग्रामीण भागासाठी तुलनेने कमी निधी मिळत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. समृद्धी महामार्ग किंवा शक्तीपीठ महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प महत्त्वाचे असले तरी ग्रामीण भागातील ओडीआर (ODR) व एमडीआर (MDR) रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी भरीव निधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्यांनी जोडण्याच्या शासनाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले; मात्र यासाठी करण्यात आलेली साडेचार हजार कोटी रुपयांची तरतूद अपुरी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडताना आमदार उढाण यांनी साखर कारखान्यांवरील २५ किलोमीटर हवाई अंतराच्या नियमावर जोरदार टीका केली. “जगात असा कोणताही उद्योग नसेल जिथे नवीन युनिट सुरू करण्यासाठी इतके कडक निर्बंध असतील. या नियमामुळे ज्या भागात ऊस उत्पादन जास्त आहे, त्या ठिकाणी नवीन कारखाने उभे राहू शकत नाहीत आणि शेतकऱ्यांची कोंडी होते,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हा २५ किमीचा नियम रद्द करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच ऊस खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी कारखान्यांवरील काटामारी रोखण्यासाठी सरकारने डिजिटल काटे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार हिकमत दादा उढाण यांनी मांडलेल्या या मुद्द्यांमुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघासह मराठवाडा आणि ग्रामीण महाराष्ट्रातील प्रश्नांवर सभागृहात व्यापक चर्चा झाली1
- अयोग्य मार्गदर्शनामुळे बांबू शेती करूण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले1
- भोकरदन शहरातील फुलेनगर येथे दिलीप मामा पगारे, शुभम पगारे,सागर पगारे यांच्या गृहप्रवेश सोहळा आणि सान्वी शुभम पगारे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा 🎂💐देताना माजी नगरसेवक दीपक भाऊ बोर्डे, मिथुन पगारे, किरण वाघमारे,पत्रकार कमलकिशोर जोगदंडे आदी.1
- महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..1
- देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।1
- यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- mujeeb shaikh1
- राज्यात 17 ते 25 मार्च दरम्यान पाऊस-हवामान अभ्यास पंजाब डक यांचा अंदाज1