ग्रामसेवकांना संरक्षण आणि ग्रामसभांचे सुसूत्रीकरण करा: आमदार अर्जुन खोतकर यांची ग्रामविकास राज्यमंत्र्यांकडे मागणी भोकरदन विश्वास धसाळ राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांना ग्रामसभा तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अतिरिक्त प्रशासकीय ताण, धमक्या, अनधिकृत व्हिडिओ शूटिंग आणि सुरक्षेच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसभा कार्यपद्धतीचे सुसूत्रीकरण करून ग्रामसेवकांना कडक संरक्षण देण्याची आग्रही मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री श्री. योगेश कदम यांना अधिकृत पत्र पाठवून तातडीने कायदेशीर सुधारणा करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (जिल्हा शाखा जालना) यांच्या निवेदनाचा संदर्भ देत आमदार खोतकर यांनी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील म्हसे शिवार येथील घटनेकडे लक्ष वेधले. तेथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी श्री. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३-अ नुसार ग्रामसभेचे घटनात्मक महत्व अबाधित ठेवून आमदार खोतकर यांनी खालील महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे: ग्रामसभांचे सुसूत्रीकरण: वर्षातून केवळ दोन नियोजित मुख्य ग्रामसभा आणि आवश्यकतेनुसार विशेष ग्रामसभा घेण्याबाबत कायदेशीर व्यवहार्यता तपासावी. विनामूल्य पोलीस संरक्षण: संवेदनशील गावांतील ग्रामसभांसाठी मागणीनुसार विनामूल्य पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा. ध्वनिचित्रणावर कारवाई: ग्रामसभेचे अधिकृत ध्वनिचित्रण (शूटिंग) फक्त ग्रामपंचायतीमार्फतच व्हावे; अनधिकृत व्हिडिओ काढून बदनामी करणाऱ्यांवर किंवा धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. विभागीय जबाबदारी: इतर विभागांच्या योजनांची माहिती व अंमलबजावणीची जबाबदारी थेट संबंधित विभागांवरच निश्चित करावी. छाननी समिती: वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी स्वतंत्र छाननी समिती गठित करावी. तातडीने गुन्हे नोंदणी: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांच्या प्रकरणात विलंब न होता तातडीने गुन्हे नोंदवण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती लागू करावी. ग्रामविकास, गृह तसेच विधि व न्याय विभागाची संयुक्त बैठक घेऊन या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करावा आणि आवश्यक त्या प्रशासकीय सुधारणांचे निर्देश द्यावेत, अशी विनंती आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे.
ग्रामसेवकांना संरक्षण आणि ग्रामसभांचे सुसूत्रीकरण करा: आमदार अर्जुन खोतकर यांची ग्रामविकास राज्यमंत्र्यांकडे मागणी भोकरदन विश्वास धसाळ राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांना ग्रामसभा तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अतिरिक्त प्रशासकीय ताण, धमक्या, अनधिकृत व्हिडिओ शूटिंग आणि सुरक्षेच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामसभा कार्यपद्धतीचे सुसूत्रीकरण करून ग्रामसेवकांना कडक संरक्षण देण्याची आग्रही मागणी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री श्री. योगेश कदम यांना अधिकृत पत्र पाठवून तातडीने कायदेशीर सुधारणा करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (जिल्हा शाखा जालना) यांच्या निवेदनाचा संदर्भ देत आमदार खोतकर यांनी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील म्हसे शिवार येथील घटनेकडे लक्ष वेधले. तेथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी श्री. पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. भारतीय संविधानातील अनुच्छेद २४३-अ नुसार ग्रामसभेचे घटनात्मक महत्व अबाधित ठेवून आमदार खोतकर यांनी खालील महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची शिफारस केली आहे: ग्रामसभांचे सुसूत्रीकरण: वर्षातून केवळ दोन नियोजित मुख्य ग्रामसभा आणि आवश्यकतेनुसार विशेष ग्रामसभा घेण्याबाबत कायदेशीर व्यवहार्यता तपासावी. विनामूल्य पोलीस संरक्षण: संवेदनशील गावांतील ग्रामसभांसाठी मागणीनुसार विनामूल्य पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा. ध्वनिचित्रणावर कारवाई: ग्रामसभेचे अधिकृत ध्वनिचित्रण (शूटिंग) फक्त ग्रामपंचायतीमार्फतच व्हावे; अनधिकृत व्हिडिओ काढून बदनामी करणाऱ्यांवर किंवा धमक्या देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. विभागीय जबाबदारी: इतर विभागांच्या योजनांची माहिती व अंमलबजावणीची जबाबदारी थेट संबंधित विभागांवरच निश्चित करावी. छाननी समिती: वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी पात्र लाभार्थींची निवड करण्यासाठी स्वतंत्र छाननी समिती गठित करावी. तातडीने गुन्हे नोंदणी: ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांच्या प्रकरणात विलंब न होता तातडीने गुन्हे नोंदवण्यासाठी स्वतंत्र कार्यपद्धती लागू करावी. ग्रामविकास, गृह तसेच विधि व न्याय विभागाची संयुक्त बैठक घेऊन या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करावा आणि आवश्यक त्या प्रशासकीय सुधारणांचे निर्देश द्यावेत, अशी विनंती आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे.
- अवघडराव सावंगी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 11 जणांवर कारवाई भोकरदन तालुका | अवघडराव सावंगी : पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवघडराव सावंगी येथे 25 ऑगस्ट रोजी दुपारी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत 11 जणांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत 5 हजार 370 रुपये रोख रक्कम, 52 पत्त्यांचा कॅट आणि 45 हजार रुपये किमतीची मोटारसायकल, असा एकूण 50 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघडराव सावंगी येथील मारोती मंदिरालगत आनंदा शेषराव पाडळे यांच्या बकऱ्यांच्या टिनशेडमध्ये काही जण गोलाकार बसून 52 पत्त्यांवर पैसे लावून हार-जीतीचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी अशोक राजगीर मुळे, दिलीप विठ्ठल खराडे, रमेश सौदागीर हजारे, विजय तेजराव शिंदे, विष्णु शिवाजी गायकवाड, संदीप बाबुराव कडेकर, अरबाज शेख रशीद, सचीन शांताराम म्हस्के, शेख ईस्माईल शेख महेमुद, आनंदा शेषराव पाडळे आणि भिका किसण पाडळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींकडून वेगवेगळ्या रकमा जप्त केल्या असून, शेख ईस्माईल शेख महेमुद याच्या ताब्यातून MH-28-AK-7264 क्रमांकाची मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाने करीत आहेत. धुरंधर वृत्त NEWS | सच के साथ1
- kya sahaba ne milad manaya tha #aqsnews #anisqureshusillod क्या सहाबा इकराम ने ईद मिलादुन नबी मनाई थी? जानिए हक़ीक़त AQS NEWS kya sahaba ne milad manaya tha kya sahaba ne Eid milad manaya tha #eidmiladunnabi #aqsnews #sillod #aurangabad #anisqureshisillod #12rabbiunawwal1
- वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. वाळू उपशाविरोधात कारवाईला गेलेल्या तहसीलदारांवरच हल्ला!.. चापट-बुक्क्यांनी मारहाण; महसूल पथकाच्या वाहनावर दगडफेक, कोतवाल गंभीर जखमी; ५ हायवा पोलिसांच्या ताब्यात.. आज दिनांक 26 बुधवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील अवैध वाळू उपशाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबडचे तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्यावरच चापट-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओही समोर आले असून, गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदावरी नदीकाठावरील सिद्धेश्वर मंदिर परिसरात पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तहसीलदार सोमेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते.1
- सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा येथे ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक उत्साहात; पोलिसांचा चोख बंदोबस्त सावळदबारा : येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. धार्मिक उत्साह आणि शांततेच्या वातावरणात मिरवणूक पार पडली. यावेळी मुस्लिम समाजबांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायतीचे सरपंच मोहम्मद आरिफ यांच्या अध्यक्षतेखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान नागरिकांनी शिस्त व शांतता राखत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. धार्मिक घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फर्दापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील यांनी मिरवणुकीच्या मार्गावर विशेष दक्षता घेतली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी आवश्यक खबरदारी घेतली. नागरिकांनीही पोलिस प्रशासनाला सहकार्य करत शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवला. ईद-ए-मिलादुन्नबीचा कार्यक्रम उत्साहात व शांततेत पार पडल्याने आयोजक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.2
- भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली.. भाजप-काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश.. अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वावर विश्वास; जालना शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली..1
- चिखली तहसील कार्यालयात राडा; निकृष्ट रेशन तांदळाविरोधात नागरिकांचे अनोखे आंदोलन, आधी तुम्ही खा, मग आम्ही खाऊ!" चिखलीत तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला रेशनचा तांदूळ,चिखलीत निकृष्ट तांदळामुळे लाभार्थी आक्रमक....1
- बिहारमध्ये सरकारचा राजीनामा मागितला म्हणून पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षाच्या चिमुकल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं..1
- राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन.. जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.. राष्ट्रीय लोकअदालतीतून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन.. जालन्यात 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.. आज दिनांक 26 बुधवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये येत्या 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. धनादेश अनादर, अपघात भरपाई, कौटुंबिक व दिवाणी वाद सामोपचाराने मिटविण्याची सुवर्णसंधी पक्षकारांना उपलब्ध होणार असून, अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्यामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये ही लोकअदालत आयोजित केली जाणार आहे. लोकअदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई दावे, कौटुंबिक व वैवाहिक वाद, दिवाणी दावे (जमीन, मालमत्ता, वाटप, भाडेकरू वाद आदी), तडजोडपात्र फौजदारी गुन्हे तसेच बँकिंग, वीज वितरण कंपन्या आणि फायनान्स कंपन्यांशी संबंधित दाखलपूर्व (Pre-Litigation) प्रकरणे तडजोडीसाठी ठेवता येणार आहेत. तसेच कामगार, औद्योगिक, सहकार न्यायालय व ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित प्रकरणांचाही समावेश करण्यात आला आहे. लोकअदालतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोर्ट फी परतावा. लोकअदालतीत तडजोडीने वाद मिटल्यास पक्षकारांनी भरलेली न्यायालयीन फी नियमानुसार परत मिळते. तसेच लोकअदालतीच्या निवाड्याविरुद्ध अपीलची आवश्यकता नसल्याने प्रकरणाचा कायमस्वरूपी निपटारा होतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच परस्पर सलोखा व नातेसंबंध टिकून राहण्यास मदत होते. ज्या पक्षकारांची प्रलंबित किंवा दाखलपूर्व प्रकरणे सामोपचाराने मिटवायची आहेत, त्यांनी आपल्या संबंधित वकिलामार्फत प्रकरण लोकअदालतीत दाखल करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.1