शेतकऱ्यांनो मक्का आठशे रुपये क्विंटल दराने विकायला तयार रहा – राहुल देशमुख यांचा इशारा शेतकऱ्यांनो मक्का आठशे रुपये क्विंटल दराने विकायला तयार रहा – राहुल देशमुख यांचा इशारा जालना | प्रतिनिधी देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारा भारत-अमेरिका कृषी करार तात्काळ रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एकदिवसीय सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजता जालना येथील शासकीय विश्रामगृहात नवनियुक्त प्रभारी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसेच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. भारत आणि अमेरिकेतील शेती उत्पादन खर्चातील मोठा फरक लक्षात घेता, भविष्यात मक्का पिकाचे दर ८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतो, असा इशारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिला. “शेतकऱ्यांनी येणाऱ्या संकटाची जाणीव ठेवून मक्का ८०० रुपये क्विंटल दराने विकण्याची मानसिकता तयार ठेवावी. अन्यथा या अन्यायकारक कराराविरोधात तीव्र आंदोलन उभारावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच, शेतकरी हिताच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेऊन हा करार रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. या प्रसंगी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम, सरचिटणीस विश्वदीप पडोळ, मोहित जाधव, रऊफ परशुवाले, बदर चाऊस, शेख शकील, शेख इम्रान, विधानसभा अध्यक्ष वसीम शेख, वसीम जागीरदार, आकाश भोपळे, चैतन्य जयेभाये, जावेद शेख, जुनेद शेख, राजीव जाईबहार, निलेश दळे, मोठेबा जाधव आदी उपस्थित होते. ⸻
शेतकऱ्यांनो मक्का आठशे रुपये क्विंटल दराने विकायला तयार रहा – राहुल देशमुख यांचा इशारा शेतकऱ्यांनो मक्का आठशे रुपये क्विंटल दराने विकायला तयार रहा – राहुल देशमुख यांचा इशारा जालना | प्रतिनिधी देशातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करणारा भारत-अमेरिका कृषी करार तात्काळ रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने एकदिवसीय सत्याग्रह आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजता जालना येथील शासकीय विश्रामगृहात नवनियुक्त प्रभारी व पदाधिकाऱ्यांचा सत्कार तसेच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानंतर दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. भारत आणि अमेरिकेतील शेती उत्पादन खर्चातील मोठा फरक लक्षात घेता, भविष्यात मक्का पिकाचे दर ८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत भारतीय शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतो, असा इशारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी दिला. “शेतकऱ्यांनी येणाऱ्या संकटाची जाणीव ठेवून मक्का ८०० रुपये क्विंटल दराने विकण्याची मानसिकता तयार ठेवावी. अन्यथा या अन्यायकारक कराराविरोधात तीव्र आंदोलन उभारावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच, शेतकरी हिताच्या या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तात्काळ निर्णय घेऊन हा करार रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली. या प्रसंगी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम, सरचिटणीस विश्वदीप पडोळ, मोहित जाधव, रऊफ परशुवाले, बदर चाऊस, शेख शकील, शेख इम्रान, विधानसभा अध्यक्ष वसीम शेख, वसीम जागीरदार, आकाश भोपळे, चैतन्य जयेभाये, जावेद शेख, जुनेद शेख, राजीव जाईबहार, निलेश दळे, मोठेबा जाधव आदी उपस्थित होते. ⸻
- जालना (प्रतिनिधी) – जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे रॅगिंगचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या नावाने महाविद्यालयाच्या अधिकृत ई-मेलवरून निनावी तक्रार करण्यात आली असून, या तक्रारीत दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने तत्काळ १३ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. सध्या समितीकडून संबंधित विद्यार्थ्यांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू असून, सखोल चौकशीनंतर प्रकरणाची सत्यता स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे महाविद्यालयातील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असल्याची माहिती मिळत आहे.1
- खामगाव : शहरातील नगरपरिषदेच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या 'नाना-नानी' पार्कमध्ये आता प्रति व्यक्ती ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याने सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये नागरिक आणि पार्कच्या कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव नगरपरिषदेने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी आणि लहान मुलांसाठी नाना-नानी पार्कची निर्मिती केली आहे. मात्र, आता या ठिकाणी प्रत्येकी ५ रुपये प्रवेश शुल्क आकारण्यास सुरुवात झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एक नागरिक कर्मचाऱ्याला विचारणा करताना म्हणतो, "एका व्यक्तीचे ५ रुपये ठीक आहेत, पण जर कुटुंबातील १०-१२ लोक एकत्र आले, तर ५०-६० रुपये भरावे लागतील. हे नगरपरिषदेचे गार्डन असून, सामान्य माणसाला हे पैसे देणे जड जाते." हे उद्यान लोकांसाठी आहे, मग तिथे प्रवेशासाठी पैसे का मोजावे लागतात?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. एकाच वेळी संपूर्ण कुटुंब फिरायला गेल्यास त्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.अशा तक्रारी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे हा निर्णय कोणी घेतला आणि जमा होणारा पैसा कशासाठी वापरला जातो, याबाबत स्पष्टता हवी अशी मागणी होत आहे. या व्हिडिओमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक युजर्सनी याला "सामान्य नागरिकांची लूट" असे संबोधले आहे. नगरपरिषदेने अशा सार्वजनिक सुविधांवर शुल्क आकारू नये, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणावर नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, गार्डनच्या देखभालीसाठी हे शुल्क आहे की अन्य काही कारण, हे प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.1
- Post by Latur 241
- जनगणना-2026 संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन1
- सत्य प्रकाश पब्लिक स्कूल में तृतीय लिटरेचर फेस्ट 2026 का भव्य समापन सत्य प्रकाश पब्लिक स्कूल में तृतीय लिटरेचर फेस्ट 2026 उत्साहपूर्ण वातावरण में सम्पन्न हुआ। कार्यक्रम में अध्यक्ष अनिल ग्रोवर, निदेशक सुश्री तरंग ग्रोवर एवं प्राचार्या श्रीमती दविंदर कौर सेठी की गरिमामयी उपस्थिति रही, जबकि मुख्य अतिथि के रूप में प्रसिद्ध लेखक एवं फिल्म निर्माता विश्वपति सरकार ने सहभागिता की फेस्ट की शुरुआत पारंपरिक दीप प्रज्ज्वलन एवं "रिदम्स ऑफ एक्सप्रेशन" नृत्य-नाट्य प्रस्तुति से हुई। एक सप्ताह तक आयोजित प्रतियोगिताओं-माय टॉय सीक्रेट स्टोरी, टॉक लाइक अ कैरेक्टर, इफ आई वेयर..., स्टोरी इन 5 इमोशंस, ह्यूमरस एलोक्यूशन, माइम एक्ट एवं क्लासिकल प्ले विद अ ट्विस्ट के विजेताओं ने मंच पर अपनी प्रतिभा का प्रभावशाली प्रदर्शन किया और उन्हें सम्मानित किया गया। कार्यक्रम में "मोमेंट्स ऑफ प्राइड" के अंतर्गत पुरस्कार वितरण एवं विद्यालय पत्रिका के तृतीय संस्करण का विमोचन किया गया। "एक्सप्लोरेशन एंड सेलिब्रेशन" में प्रदर्शनी स्टॉल्स, बुक फेयर और फूड स्टॉल्स आकर्षण का केंद्र रहे। "लाइव एंड अनफिल्टर्ड" सत्र में मुख्य अतिथि ने विद्यार्थियों से संवाद कर अपने अनुभव साझा किए, वहीं कक्षा 7 के विद्यार्थियों द्वारा उनका विशेष पॉडकास्ट इंटरव्यू भी लिया गया, जिसने सभी को रचनात्मकता और अभिव्यक्ति के लिए प्रेरित किया। कार्यक्रम के सफल आयोजन में श्रीमती हर्षा तिवारी, श्रीमती रचिता अग्रवाल एवं श्री मनीष शर्मा का विशेष योगदान रहा।1
- मोताळा वन विभागात घोटाळा? परवानगीशिवाय बांधकाम सुरू!1
- पीलीभीत में आज इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में मेधावी छात्र छात्राओं तथा अभिभावकों का किया गया सम्मान । इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में कक्षा 10 एवं 12 के मेधावी छात्र छात्राओं तथा उनके अभिभावकों के सम्मान में समारोह का आयोजन बड़े उत्साह और गरिमा के साथ किया गया। कक्षा 10 एवं कक्षा 12 की मेधावी छात्राओं को उनके उत्कृष्ट प्रदर्शन के लिए विद्यालय प्रबंधन की ओर से पुरस्कृत किया गया तथा उनके अभिभावकों को भी सम्मानित किया गया । कक्षा 10 में प्रथम स्थान पर अलीना बी ने 77.5% अंक प्राप्त कर विद्यालय का नाम रोशन किया। कनीज फातिमा ने 75.33% अंक प्राप्त कर द्वितीय तथा इल्मा ने 74.83% अंकों के साथ तृतीय स्थान हासिल किया। इनके अतिरिक्त अलीशा, फैजला अंसारी, गानिया फातिमा, इरम बी और हबीबा और उनके माता पिता को भी सम्मानित किया गया। कक्षा 12 में फारिया 80% इकरा नूर 77% इलमा खान 74.6% ने क्रमशः प्रथम द्वितीय एवं तृतीय स्थान प्राप्त किया । रहनुमा, मुस्कान, सोबिया, तलत और ज़ईमा खान ने भी शानदार प्रदर्शन करते हुए विद्यालय का गौरव बढ़ाया। समारोह की मुख्य अतिथि मदद फाउंडेशन की निदेशक श्रीमती समीना शाहिद ने छात्राओं के अभिभावकों का सम्मान करते हुए कहा कि जिन बच्चों ने विद्यालय का गौरव बढ़ाया है उनके माता पिता तारीफ के काबिल हैं जिन्होंने बच्चों के भविष्य के लिए विद्यालय पर अपना विश्वास दिखाया और बच्चों की शिक्षा के लिए अपना समय और सहयोग प्रदान किया।यही बच्चे कल उनका सहारा बनेंगे। प्रधानाचार्य श्री अखलाक हसन खान ने कहा हम वादा करते हैं कि आगे भी विद्यालय शिक्षा के क्षेत्र में नए कीर्तिमान स्थापित करता रहेगा श्री इकबाल हसन खान ने सभी उत्तीर्ण छात्राओं और उनके अभिभावकों का आभार व्यक्त किया और छात्राओं को जीवन में कुछ बन के अपने माता पिता के सपने सच करने के लिए प्रेरित किया। इस अवसर पर पूर्व वरिष्ट लिपिक एजाज़ हसन खान ने कक्षा 10 एवं कक्षा 12 के प्रथम आने वाली छात्राओं को एक एक हज़ार रूपए का नकद पुरस्कार दिया। समारोह में विद्यालय के शिक्षकों ने सभी छात्राओं के उज्ज्वल भविष्य की कामना की और उन्हें आगे भी इसी तरह मेहनत करने के लिए प्रेरित किया। इस समारोह में बच्चों और उनके अभिभावकों का उत्साह देखते ही बनता था।इस कार्यक्रम में कमाल शम्सी, मोनिस अयाज़, नसीब उद्दीन, सैयद शरिक अली सैयद तारिक अली मुमताज अहमद श्री वसीम उद्दीन खान, श्री नाजिर हुसैन, सैयद सीमा अली, मधु सक्सेना, रजनी सक्सेना, शबाना खान, अफसर हुसैन, मेहविश खान, मुताल हसन खान आदि लोग मौजूद रहे।1
- लातूर : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची गरज आहे त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी सर्व उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी दिल्या.लातूर शहर महानगरपालीकेत सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी,निधीचा विनियोग योग्य होईल याची दक्षता घ्यावी. योजनांची कामे ठरलेल्या वेळापत्रकानुसार दर्जेदार पद्धतीने करावीत.एकूण कारभार पारदर्शकआणि लोकाभिमुख राहील, हे पाहावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी आ.अमित देशमुख यांनी खा. डॉ.शिवाजी काळगे यांच्यासह लातूर महानगरपालिकेत महापौर सौ.जयश्री सोनकांबळे, उपमहापौर ॲड.स्नेहल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. किरण जाधव, माजी महापौर दिपक सुळ, काँग्रेसचे गटनेते विजयकुमार साबदे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, परिवहन समिती सभापती फैसलखान कायमखानी, मनपा आयुक्त मानसी मीना,अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ.पंजाब खानसोळे यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शहरात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजना, प्रस्तावित योजना,नियमित कामकाजाबाबत आढावा घेतला.सध्या उन्हाळी सुट्ट्या आणि लग्न समारंभांचे दिवस असल्याने शहरात वाहतूक कोंडीच्या तक्रारी येत आहेत.यावर तातडीने कार्यवाही करून शहरातील वाहतुकीला शिस्त लावावी.सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत करावी.हा प्रश्नकायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रभावीपणे अतिक्रमणविरोधी मोहीम राबवावी.शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालये, रुग्णालये, व्यापारी प्रतिष्ठाने तसेच रहिवासी संकुलांत पार्किंग व्यवस्था अनिवार्य करावी. शासनमान्य सल्लागाराची नियुक्ती करून भविष्यातील नियोजनकरावे. प्रदूषणाचा स्तर कमी राहील यासाठी प्रयत्न करावेत अशी सुचना त्यांनी दिली शहरातील कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाली असली तरी त्यात आणखी दुरुस्त्या करा. कचऱ्यावर प्रक्रिया करून ढीग लागणार नाहीत याची काळजी घ्यावी. या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवावा, असे आ.देशमुख म्हणाले. शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य-दिव्य पुतळा उभारणीचे काम सुरू झाले आहे.या कामाचा दर्जा आणि पारदर्शकतेबाबत तक्रारी आहेत. या प्रकल्पाचे पुनरावलोकन करावे. हैदराबादच्या धरतीवर हे काम व्हावे, अशी लोकभावना असल्याने तेथे अभ्यास गट पाठवून सूचना घ्याव्यात.डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्कचा सर्वंकष विकास आराखडा तयार करून स्मारकाची उभारणी करावी असे त्यांनी सांगीतले. शहरात नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. पिवळे किंवा दूषित पाणी वितरित होणार नाही याची काळजी घ्यावी. ठिकठिकाणी होणारी गळती थांबवावी. हरंगुळ जलशुद्धीकरण केंद्रातून बाहेर सोडण्यात येणाऱ्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करावा असे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. शहरातील पथदिव्यांची देखभाल नियमित व्हावी.घर तिथे पथदिवा अशी योजना तयार करून विस्तार करावा. मंजूर सोलर प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून वीज वापराच्या बाबतीत महापालिका स्वयंपूर्ण करावी. नागरिकांना बांधकाम परवाना मिळण्यात होणारी दिरंगाई टाळावी. नागरिकांना मनस्ताप होणार नाही याची काळजी घ्यावी आणि दिलेल्या परवान्याप्रमाणेच बांधकामे होतील याची दक्षता घ्यावी. शहरातील प्रलंबित कबाले वाटपाचा आढावा घेऊन, नियमानुसार असलेले कबाले वाटप ताबडतोब करावेत, यासाठी शासनाच्या नवीन धोरणाचा आधार घ्यावा असे यावेळी सांगीतले. लातूर शहरात मागच्या काळात उभारण्यात आलेल्या युनिपोल संदर्भात कायदेशीर प्रक्रिया तपासून घ्यावी, हे युनिपोल नियमानुसार नसतील तर ते काढून टाकावेत. आगामी काळात जाहिरात फलक परवानगी देताना नियमाचे उल्लंघन होणार नाही, शहराचे सौंदर्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आमदार देशमुख यांनी सांगीतले. नागरिकांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वेळेत मिळण्यासाठी कामकाजात सुधारणा करावी. फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, गंजगोलाई तसेच शहरातील इतर ऐतिहासिक सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी असे सांगीतले. एकूणच प्रशासकीय कामकाज पारदर्शक, सुलभ आणि गतिमान होण्यासाठी एआय व इतर अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, यासह अनेक महत्त्वाच्या सूचना याप्रसंगी केल्या असून अधिकारी, कर्मचारी यांचेही म्हणणे ऐकून घेऊन, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येइल व आवश्यक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपूरावा करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या प्रसंगी नगरसेवक फारुक शेख, विकास कांबळे, युनुस मोमीन, इसरार सगरे, डॉ. बालाजी सांळुके, अतिश चिकटे, मुक्तार शेख, अमोल लांडगे,सचिन गायकवाड यांच्यासह मनपाचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.1
- धुळे जिल्ह्यातील निजामपूर (ता. साक्री) पोलिसांनी अपहरण प्रकरणात मोठी कारवाई करत मुख्य संशयितासह अन्य दोन जणांना गोव्यातून अटक केली आहे. या कारवाईत पीडित अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.1