समस्येला संधी म्हणून पाहा : डॉ. शैलेश वाढेरस्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जैविकशास्त्र संकुल व हरियाणा गुरुग्राम येथील वॉटर्स बायो सायेन्सस यांच्या संयुक्त विद्यमाने “अद्यावत पेशी विश्लेषण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि.१० मे, २०२६ रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयात सातत्याने अद्ययावत राहिले पाहिजे, या कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या विद्यार्थी विकासाभिमुख भूमिकेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलेश वाढेर हे होते. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अंकिता परब आणि श्री मोहम्मद यांनी मार्गदर्शन केले. अंकिता परब यांनी फ्लो सायटोमेट्री या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देताना कर्करोग निदान, अन्न व हवा प्रदूषण तपासणी, मूल पेशी शोध, पेशी विभाजन अवस्था, पेशी विकास, पेशी चक्रातील बदल, गुणसूत्रांची संख्या, नियत पेशी मृत्यू, औषध शोध आदी क्षेत्रांतील त्याच्या उपयोगांवर प्रकाश टाकला. यावेळी व्यासपीठावर डॉ. बी. एस. सुरवसे, डॉ. लक्ष्मीकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी “समस्येला समस्या न समजता संधी म्हणून पाहा,” असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. एस. सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन रुबिया शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. उमेश धुलधज यांनी केले. या कार्यशाळेस डॉ. परशुराम पवार व डॉ. नागेश ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक डॉ. बी. एस. सुरवसे, सहसंयोजक डॉ. सुनील हजारे, आयोजन सचिव डॉ. उमेश धुलधज, डॉ. ए. पी. पाठक, डॉ. हेमलता भोसले, डॉ. मिलिंद गायकवाड, गोविंद सूर्यवंशी, प्रतिभा ढवळे, समरीन पठाण, विद्या सुकरे, डॉ. चव्हाण, वसुधा कोडगिरे, राजू शेरे, सय्यद खाजा व सुशील खरवडकर यांनी परिश्रम घेतले.
समस्येला संधी म्हणून पाहा : डॉ. शैलेश वाढेरस्वारातीम' विद्यापीठात “अद्यावत पेशी विश्लेषण” विषयावरील एकदिवसीय कार्यशाळा संपन्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जैविकशास्त्र संकुल व हरियाणा गुरुग्राम येथील वॉटर्स बायो सायेन्सस यांच्या संयुक्त विद्यमाने “अद्यावत पेशी विश्लेषण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि.१० मे, २०२६ रोजी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या विषयात सातत्याने अद्ययावत राहिले पाहिजे, या कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या विद्यार्थी विकासाभिमुख भूमिकेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी डॉ. शैलेश वाढेर हे होते. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अंकिता परब आणि श्री मोहम्मद यांनी मार्गदर्शन केले. अंकिता परब यांनी फ्लो सायटोमेट्री या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देताना कर्करोग निदान, अन्न व हवा प्रदूषण तपासणी, मूल पेशी शोध, पेशी विभाजन अवस्था, पेशी विकास, पेशी चक्रातील बदल, गुणसूत्रांची संख्या, नियत पेशी मृत्यू, औषध शोध आदी क्षेत्रांतील त्याच्या उपयोगांवर प्रकाश टाकला. यावेळी व्यासपीठावर डॉ. बी. एस. सुरवसे, डॉ. लक्ष्मीकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी “समस्येला समस्या न समजता संधी म्हणून पाहा,” असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. एस. सुरवसे यांनी केले. सूत्रसंचालन रुबिया शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. उमेश धुलधज यांनी केले. या कार्यशाळेस डॉ. परशुराम पवार व डॉ. नागेश ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक डॉ. बी. एस. सुरवसे, सहसंयोजक डॉ. सुनील हजारे, आयोजन सचिव डॉ. उमेश धुलधज, डॉ. ए. पी. पाठक, डॉ. हेमलता भोसले, डॉ. मिलिंद गायकवाड, गोविंद सूर्यवंशी, प्रतिभा ढवळे, समरीन पठाण, विद्या सुकरे, डॉ. चव्हाण, वसुधा कोडगिरे, राजू शेरे, सय्यद खाजा व सुशील खरवडकर यांनी परिश्रम घेतले.
- नांदेड शहरातील जुना मोंढा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता अनेक महिन्यांपासून रखडल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि धुळीचा त्रास वाढला आहे. यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक प्रचंड त्रस्त असून, व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. आमदारांच्या मध्यस्थीनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.1
- “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप “सोने खरेदी करू नका” सल्ल्यावर उपहासात्मक आंदोलन करत मेट्रो ट्रेनची खिल्ली भाजप विरोधात राष्ट्रवादीचा संताप1
- पुरोगामी महाराष्ट्रात भाजपच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिले नाही राज्य सरकारच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे यांचा आरोप1
- हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हि हिंगोली शहराच्या स्वच्छतेसाठी नगरपालिकेचे पाऊल; ७०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे वाटप आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ; 'सुंदर हिंगोली'साठी सहकार्य करण्याचे आवाहन हिंगोली (प्रतिनिधी): शहरातील बाजारपेठेतील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली नगरपालिकेने एक कौतुकास्पद आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत पसरणारे कचऱ्याचे साम्राज्य रोखण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर यांच्या संकल्पनेतून शहरातील तब्बल ७०० ते ८०० व्यापाऱ्यांना डस्टबिनचे (कचरा कुंडी) प्रत्यक्ष दुकानावर जाऊन वाटप करण्यात आले. प्रत्यक्ष दुकानावर जाऊन संवाद गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत अस्वच्छता वाढत असल्याचे नगराध्यक्षांच्या निदर्शनास आले होते. केवळ दंड आकारण्यापेक्षा व्यापाऱ्यांना स्वच्छतेच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांनी स्वतः व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना ओला व सुका कचरा डस्टबिनमध्येच टाकण्याचे आवाहन केले. आमदार संतोष बांगर कडून कौतुक या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी नगराध्यक्षांच्या या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "हिंगोली शहर सुंदर आणि स्वच्छ ठेवणे ही केवळ पालिकेचीच नाही, तर प्रत्येक नागरिकाची आणि व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यापाऱ्यांनी पालिकेला सहकार्य करून कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबिनचा वापर करावा." प्रशासकीय व राजकीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या मोहिमेत मुख्याधिकारी अरविंद मुंडे, शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, उपनगराध्यक्ष मामूद भगवान यांच्यासह पालिकेचे सर्व प्रमुख पदाधिकारी खांद्याला खांदा लावून सहभागी झाले होते. यांची लाभली उपस्थिती: कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष बांगर, राम कदम, कपिल खंडेलवाल, चंदू लव्हाळे, साद अहमद, सज्जाद बिल्डर, गणेश बांगर, रवींद्र वाडे, निधी गोरे, सुरभी चौधरी, राम किसन बांगर, सुमित कांबळे, खली बांगर, श्याम कदम, विशाल गोठरे यांनी परिश्रम घेतले. तसेच स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, पंडित मस्के, अक्षय देशमुख आणि कैलास थिटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांची मोठी फौज यावेळी तैनात होती. प्रतिक्रिया: "बाजारपेठ ही शहराचे हृदय असते. ते स्वच्छ राहिल्यास शहराचे आरोग्य चांगले राहील. व्यापाऱ्यांनी दिलेले डस्टबिन वापरावेत आणि आपल्या शहराला 'नंबर वन' करण्यासाठी सहकार्य करावे." — सौ. रेखाताई श्रीराम बांगर, नगराध्यक्षा, हिंगोली. #hingoli1
- यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना २०२६ च्या जनगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भविष्यातील पिढ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.1
- मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्या हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मांवरील एका विधानामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामागील हेतू आणि परिणामांवर चर्चा सुरू आहे.1
- Udgir -एकुरका रोड जवळ मोटरसायकल व कारचा भिषण अपघातात एकाचा मृत्यू...!?1
- महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शक्ती पीठ महामार्गाच्या अध्यादेशाची होळी करत तीव्र विरोध दर्शवला. शेतकऱ्यांनी हा महामार्ग तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.1