नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांच्या न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी विविध शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यस्थळी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पॉश (लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच असंघटित क्षेत्रातील आस्थापनांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही समिती स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विजया रहाटकर यांनी सांगितले की, महिलाविषयक योजनांचे नियमित ऑडिट आणि डिजिटल मॉनिटरिंग केले गेले पाहिजे. महिलांना त्वरित न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी दर तीन महिन्यांनी संयुक्त आढावा बैठक घ्यावी. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तातडीने एफआयआर नोंदवणे, वेळेत आरोपपत्र दाखल करणे आणि पोलीस, संरक्षण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वन स्टॉप सेंटर व विधी सेवा प्राधिकरण यांच्यात सुसूत्र समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बँक सखी, अंगणवाडी सेविका आणि महिला शेतकरी गट यांचा सहभाग वाढवून कायद्यांची व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यात संरक्षण अधिकाऱ्यांसाठी तातडीने स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करणे आणि महिला शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र हेल्प डेस्क सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच, सन २०३० पर्यंत बालविवाह पूर्णपणे थांबविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश देत त्यांनी बेटी बचाओ-बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, वन स्टॉप सेंटर आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (एनआरएलएम) अशा विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात सर्व कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याचे, संरक्षण अधिकाऱ्यांसाठी जागा देण्याचे आणि बालविवाह व स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचे आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी जिल्ह्यात महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या भरोसा सेल, दामिनी व चार्ली पथक, पोक्सो कायद्याची अंमलबजावणी आणि इतर उपक्रमांची माहिती दिली. बैठकीच्या सांगतेनंतर विजया रहाटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षाला भेट देऊन पाहणी केली.
नांदेड येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी महिलांच्या न्याय, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी विविध शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यस्थळी महिलांना सुरक्षित, सन्मानजनक व भेदभावमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पॉश (लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी तसेच असंघटित क्षेत्रातील आस्थापनांमध्ये अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही समिती स्थापन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या महत्त्वपूर्ण बैठकीला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विजया रहाटकर यांनी सांगितले की, महिलाविषयक योजनांचे नियमित ऑडिट आणि डिजिटल मॉनिटरिंग केले गेले पाहिजे. महिलांना त्वरित न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी दर तीन महिन्यांनी संयुक्त आढावा बैठक घ्यावी. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये तातडीने एफआयआर नोंदवणे, वेळेत आरोपपत्र दाखल करणे आणि पोलीस, संरक्षण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वन
स्टॉप सेंटर व विधी सेवा प्राधिकरण यांच्यात सुसूत्र समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी बँक सखी, अंगणवाडी सेविका आणि महिला शेतकरी गट यांचा सहभाग वाढवून कायद्यांची व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यात संरक्षण अधिकाऱ्यांसाठी तातडीने स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था करणे आणि महिला शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र हेल्प डेस्क सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच, सन २०३० पर्यंत बालविवाह पूर्णपणे थांबविण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्याचे निर्देश देत त्यांनी बेटी बचाओ-बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, वन स्टॉप सेंटर आणि राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (एनआरएलएम) अशा विविध योजनांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात सर्व कार्यालयांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समित्या स्थापन करण्याचे, संरक्षण अधिकाऱ्यांसाठी जागा देण्याचे आणि बालविवाह व स्त्रीभ्रूणहत्या रोखण्याचे आश्वासन दिले. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी जिल्ह्यात महिला सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या भरोसा सेल, दामिनी व चार्ली पथक, पोक्सो कायद्याची अंमलबजावणी आणि इतर उपक्रमांची माहिती दिली. बैठकीच्या सांगतेनंतर विजया रहाटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील हिरकणी कक्षाला भेट देऊन पाहणी केली.
- शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावरील तळणी फाटा येथे जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला सध्या योग्य भाव मिळत नसून, सरकारने बी-बियाणे व खतांचे दर वाढवल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. निवडून येण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता जाचक अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज तातडीने माफ करावे, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.1
- नांदेडच्या पीर-बुरहान परिसरात आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका युवकाच्या बोटाला गंभीर दुखापत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पीर-बुरहान परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.1
- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे महेश बिरगड यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. महेश बिरगड यांना मारहाण झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.1
- हिंगोली जिल्ह्यातील घोटा देवी येथे धनगर समाज युवा मल्हार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाची गोडी लागावी आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी स्वतः मुलांसोबत बसून अभ्यास करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. केवळ शिक्षणाचे महत्त्व न सांगता, स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून अभ्यास करत त्यांनी कृतीतून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. "मेंढपाळांच्या हातातील काठीसोबत त्यांच्या हातात पुस्तक आणि पेनही असले पाहिजे" या ध्येयाने प्रेरित होऊन वैजनाथ पावडे यांनी आपल्या निवासस्थानी या मुलांसाठी मोफत शिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे मेंढपाळांच्या मुलांमध्ये शिक्षणाविषयी मोठा उत्साह निर्माण झाला असून पालकांमध्येही सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. वंचित मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, यामुळे धनगर समाजातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.1
- हिंगोलीच्या सेनगाव येथे काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून आगामी निवडणुका आणि पक्ष संघटन वाढवण्याबाबत यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सेनगाव तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच इतर विविध महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.1
- महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.1
- परभणी येथील महानगरपालिकेच्या महापौरांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. महापौरांवर थेट चाकूने हल्ला करण्याचा हा प्रयत्न नेमका कोणी केला आणि यामागचे कारण काय होते, याबाबतची अधिक माहिती समोर आलेली नाही.1
- नांदेडमधील SGGS समोरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर शिवसेनेचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर अत्यंत आक्रमक झाले आहेत. आमदार बोंढारकर यांनी थेट कोसळलेल्या पुलाच्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला आणि त्याला चांगलेच धारेवर धरले. या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून यात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार बोंढारकर यांनी केली आहे. अशा दुर्घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वच पुलांचे ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, या कामाशी संबंधित असणाऱ्या कंपनीला थेट काळ्या यादीत टाकण्याची मागणी करणार असल्याचेही बोंढारकर यांनी स्पष्ट केले।1