Shuru
Apke Nagar Ki App…
पाथरी तालुक्यातील प्रहार जनशक्ती चे पदाधिकारी बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी पाथरी तालुक्यातील प्रहार जनशक्ती चे पदाधिकारी बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी
Rahul dhabale
पाथरी तालुक्यातील प्रहार जनशक्ती चे पदाधिकारी बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी पाथरी तालुक्यातील प्रहार जनशक्ती चे पदाधिकारी बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीशी
More news from Maharashtra and nearby areas
- विधवा,निराधार,श्रावण बाळ सेवा योजनेच्या पात्र लाभधारकांचे अनुदान पुर्ववत सुरू करा- महिला काँग्रेस वर्कर्स अध्यक्षा जानु बी शेख1
- *माहिती लपवल्याने संताप, मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचा एल्गार1
- Post by रुद्रशिव1
- नांदेड कौठा भागातील डेकोरेशन सामानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्यामुळे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमनाच्या दोन ते तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्नीक्षम दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी अथक परिश्रम घेऊन आपले कर्तव्य बजावले. नेमकी आग कशामुळे लागली आगीचं कारण काय आहे.अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यासंदर्भात तपास सुरू असून पुढील कारवाई साठी चौकशी चालू असल्याचे सांगण्यात आले आहे.1
- मंठा तालुक्यातील टकले पोखरी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. टकले पोखरी येथील शेतकरी मनोहर लिंबाजी टकले यांच्या गट क्रमांक 135 मधील शेतात अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीने काही वेळातच विकराळ रूप धारण करत शेतातील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत तुषार संच, ठिबक संच तसेच पेरणीसाठी नुकतेच आणलेले सुमारे 35 बॅग रासायनिक खत जळून पूर्णतः नष्ट झाले. याशिवाय शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजारे, पेट्रोल फवारणी यंत्र आणि पत्र्याचे शेडही आगीत जळून खाक झाले आहे. या आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानीचा आकडा मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी तत्काळ मदत करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून पंचनामा करून शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.1
- छत्रपती संभाजीनगर हादरलं! टेंभापुरी धरणात तीन कामगारांचा बुडून मृत्यू.. कामगार दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पोहायला गेलेल्या तिघा तरुण कामगारांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना संभाजीनगर शहराजवळील टेंभापुरी धरणात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) यांचा समावेश आहे. हे तिघेही रांजणगाव एमआयडीसी येथे कामगार म्हणून कार्यरत होते.1
- संभाजी ब्रिगेडच्या जनआंदोलनाचा दुसरा दिवस मंठा तालुक्यातील ग्रामपंचायत मधील ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून न दिल्यामुळे तसेच माहिती दडविण्याच्या प्रकाराविरोधात आज दिनांक १ मे, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या निवेदनांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, मंठा तालुक्यातील काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडे भत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमितता असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. यास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घालण्यात येत असल्याचाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ व भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असताना देखील संबंधित प्रशासनाने माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने हा संघर्ष उभा राहिल्याचे सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने प्रशासनास अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे तसेच माहिती दडविणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.1
- जालन्यात बौद्ध जयंती निमित्त कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामुहिक वाचन प्रतिनिधी जालना . जालना शहरातील महाप्रजापती बौद्ध विहार जयनगर येथे दिनांक 1 मे 2026 रोजी बौद्ध जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड .प्रकाश आंबेडकर यांच्या अहवानाला प्रतिसाद देत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामुहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी एम .व्ही चौधरी, सिध्दार्थ इंगळे, विलास दाभाडे,मैनाबाई खंडागळे आदीं प्रमुख उपस्थित होते .यावेळी उपासक शेषराव रनविर, किरण इंगळे,वामनराव दांडगे, साहेबराव साळवे, सिध्दार्थ पाईकराव,भुपेश पारधे, भाऊसाहेब दिवेकर,किरण कोळे, प्रशांत खंडागळे,येतेस सुकधाने, युवराज रनविर, किरण साळवे यांच्यासह महिलांचा मोठा सहभाग होता कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सुरेश सुकधाने यांनी मानले.2
- Post by Raghunath Aghao1