Shuru
Apke Nagar Ki App…
घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे
Ramdas Zakane
घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे घन चित्रपटाची शूटिंग चालू आहे पिक्चर चालणारा आहे चांगला शुद्ध गाव गाव गावातली पिक्चर आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हिंगोली | प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक राजू इंगोले, जिल्हा सचिव सिद्धांत गायकवाड, तसेच जिल्हा समन्वयक सरपंच राहुल करवंदे यांनी हिंगोली वंचित जिल्हाध्यक्ष नियुक्तीवर आक्षेप घेत पक्षश्रेष्ठींकडे आपले राजीनामे सादर केले होते. दरम्यान, आज पुन्हा एकदा “राजगृहातच राहण्याचा” निर्णय घेत त्यांनी वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे लहान बंधू तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेत अधिकृत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू व रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय युवा नेतृत्व अमनसाहेब आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे पार पडला. सदर पक्षप्रवेश कार्यक्रम युवक प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी म्हणून प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशिल कुमार सुर्यवंशी, लिगल सेल महाराष्ट्र नेते ॲड. रावन धाबे, जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे, आकाश दातार, विक्की काशिदे, ॲड. धम्मरत्न कांबळे, ॲड. बालाजी खरात, ॲड. रामराव जुमडे, विजय कांबळे, केशव कदम, गोरख खिल्लारे, सूरज वाघमारे, संदीप थोरात, राजू गायकवाड, रवी खंडागळे, सचिन जोंधळे, अरविंद साळवे, भारत गडधने, भीमराव इंगोले, कामाजी खिल्लारे, संजय वाकळे, भारत वाकळे, देवा कांबळे, लखन सरतापे, यशवंत साळवे, महेंद्र घोंगडे , अक्षय खाडे, मारोती राठोड, अनिल राठोड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात रिपब्लिकन सेनेची ताकद वाढणार असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. सूत्रसंचनल ॲड. रावन धाबे यांनी केले. तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष कैलास जोंधळे यांनी केले. आभार भारत गडधणे यांनी मानले.1
- प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.1
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by Dhanjay surve Surve1
- ----- (प्रतिनिधी):- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात ८ मार्च, जागतिक महिला दिनापासून करण्यात आली आहे. १४ ते १५ वयोगटातील मुलींसाठी ही लस उपलब्ध करून देण्यात आली असून लिंबागणेश येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस उपलब्ध आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक ०१ एप्रिल बुधवार रोजी लिंबागणेश येथील भालचंद्र माध्यमिक विद्यालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बीड तालुक्यातील लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.रूपाली चिटकुलवार यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात पालक व विद्यार्थिनींना गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण, त्याची कारणे, लक्षणे तसेच प्रतिबंधात्मक उपाय या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक किसन सावंत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद मोटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.रूपाली चिटकुलवार यांनी केले. या वेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सोप्या व प्रभावी भाषेत समजावून सांगितले. तसेच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करून आरोग्याबाबत सजग राहण्याचे आवाहन केले. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लोखंडे, गर्जे, वीर, कदम, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. __-__ एचपीव्ही लस पूर्णतः सुरक्षित :- डॉ.क्रांती देशपांडे, डॉ.सुनिता बारकुल एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित असून आतापर्यंत कोणते ही गंभीर दुष्परिणाम आढळलेले नाहीत. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक पात्र मुलीने ही लस घेणे आवश्यक आहे. पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ.क्रांती देशपांडे आणि डॉ.सुनिता बारकुल यांनी केले. __-__ या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एचपीव्ही लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून जनजागृतीत मोठी वाढ होणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. गणेश ढवळे यांनी व्यक्त केली.1
- बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात काल सायंकाळपासून अचानक वातावरणात बदल झाला असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहेहवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसारच हा बदल पाहायला मिळाला आहे.जिल्ह्यातील खामगाव, चिखली आणि सिंदखेड राजा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होताइतर तालुक्यांमध्येही सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाढत्या उन्हापासून आणि उकाड्यापासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा पसरला होता व काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता मात्र, दुसरीकडे हा पाऊस बळीराजासाठी संकट घेऊन आला आहे. शेतात उभी असलेली उन्हाळी आणि रब्बी हंगामातील पिके, जसे की गहू, ज्वारी आणि मका यांना या वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहेपिकांसोबतच फळबागा आणि भाजीपाला वर्गीय पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत पडला आहे. बिरो रिपोर्ट जिजाऊ एक्सप्रेस बुलडाणा1
- जालन्यात SIR मॅपिंगला वेग: शनिवार-रविवारी विशेष शिबिरे; 55% प्रक्रिया पूर्ण.---. दुबार मतदारांची नावे वगळण्यासाठी SIR मॅपिंगला गती...1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- खेड तालुक्यात जमीनी बळकवण्याच्या प्रकरणात वाढ.वाफगाव मध्ये जमिनीच्या ताब्यावरून महिलां-तरुणांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी1