उन्हाच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीच्या वेळेत बदल. .... जिल्ह्यात वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनचालक व वाहनमालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वाहन तपासणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मौजे जामवाडी, औंढा–हिंगोली रोड, देवळा पाटी जवळील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे दि. 12 मार्च 2026 पासून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनांची प्रत्यक्ष तपासणी सकाळी 7.30 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात येणार आहे. दुपारी 1 नंतर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार नाही. मात्र त्या वेळेनंतर संबंधित वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी तसेच वाहनप्रणालीवरील इतर कामकाज करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व वाहनधारक व अर्जदार नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच ज्यांना अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे त्यांनी नियोजित दिवशी सकाळी 7.30 ते दुपारी 1 या वेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
उन्हाच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणीच्या वेळेत बदल. .... जिल्ह्यात वाढत असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या वाहनचालक व वाहनमालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी वाहन तपासणीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मौजे जामवाडी, औंढा–हिंगोली रोड, देवळा पाटी जवळील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे दि. 12 मार्च 2026 पासून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनांची प्रत्यक्ष तपासणी सकाळी 7.30 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात येणार आहे. दुपारी 1 नंतर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार नाही. मात्र त्या वेळेनंतर संबंधित वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी तसेच वाहनप्रणालीवरील इतर कामकाज करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व वाहनधारक व अर्जदार नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच ज्यांना अपॉइंटमेंट देण्यात आलेली आहे त्यांनी नियोजित दिवशी सकाळी 7.30 ते दुपारी 1 या वेळेत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
- जायकवाडी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन; गणवेश,भत्ते व वेळेवर पगाराची मागणी1
- Post by Nanded_71
- हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.1
- Post by Info news1
- अमरण उपोषणाचा दुसरा दिवस भानेगाव येथील विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सिंगणवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे सुरू केलेल्या अमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. भानेगाव येथील जल जीवन मिशन (JJM) व पाणीपुरवठा कामातील अनियमितता, बनावट कागदपत्रे व सह्या, सन 2021–23 मधील ग्रामपंचायत विकास कामांची चौकशी, जि.प. प्राथमिक शाळेतील कामांची चौकशी, तसेच माजी मुख्याध्यापक चौकशीत दोषी आढळूनही कारवाई न झाल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पूरामुळे बंद होणारा गावाचा जीवनावश्यक रस्ता पुनर्वसन जागेतून तात्काळ खुला करावा व बेलगव्हाण–भानेगाव पांदन रस्ता तात्काळ सुरू करावा, या मागण्यांसाठी उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात आले.1
- विलास बारहाते मानवत : येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व काही पालकांच्या सहभागातून ८ मार्च २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ११ एसटी बसने निघाले जवळपास ५०० विद्यार्थी सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी या सहली मध्ये होते. प्रथम लोणार येथील जगप्रसिद्ध उल्काजन्य लोणार सरोवर पाहिले. हे पर्यटकांसह अभ्यासकांसाठी एक उत्तम सहलीचे ठिकाण आहे. ५० हजार वर्षांपूर्वीच्या या खऱ्या पाण्याच्या विवराच्या सभोवताली ऐतिहासिक मंदिरे व अद्वितीय जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालतेय. येथील १२ व्या शतकातील प्राचीन मंदिरे, जसे की कमळजा माता मंदिर, स्थापत्यकलेचा उत्तम नमुना पाहवयास मिळतोय. लोणार सरोवर हे जगातील एकमेव बेसॉल्ट खडकातील आघाती सरोवर आहे. जे भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी संशोधनाचा विषय आहे. या तलावाच्या आजूबाजूला घनदाट जंगल आणि अनेक पक्षी पाहायला मिळतात. नंतर खामगाव येथील नामांकित कंपनीचा बिस्किट कारखाना पाहिला. कश्या प्रकारे बिस्किटे निर्माण करतात हे पाहिल्यानंतर सर्वांना बिस्किट पुडे देण्यात आले. हा प्रकल्प स्थानिक रोजगार निर्मितीत मोलाची भूमिका बजावतो असं कामगारासोबत चर्चा केल्यानंतर समजलंय. त्यानंतर ही सहल शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी गेली. हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आणि विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९ व्या शतकात प्रकट झालेल्या महाराजांचे हे समाधी स्थळ असून, येथील संस्थानाचा कारभार अत्यंत शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तांसाठी सेवाभावी आहे. हे मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर मोफत महाप्रसाद वाटप केला जातोय. मंदिर परिसराच्या मध्यभागी श्री गजानन महाराजांचे अत्यंत आकर्षक संगमरवरी समाधी मंदिर आहे. श्री गजानन महाराज संस्थान हे भारतातील सर्वात मोठे आणि शिस्तप्रिय ट्रस्टपैकी एक आहे. जे सामाजिक व आध्यात्मिक कार्य करते. दर्शन व प्रसाद घेतल्या नंतर सहल मानवत च्या दिशेने वाटचाल करत शाळेत रात्री उशिरा दिड च्या सुमारास सुखद सहलीचा अनुभव घेत पोहोचली.1
- Post by Nanded_71
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- यादरम्यान ६० किलोमीटर मध्ये शिरपूर आणि खलघाट (सेंदवा) असे दोन टोल आहेत. या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता. अनेकवेळा निवेदने देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतींने अनोखे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील खड्ड्यामध्ये बसून '२६ लाखाच्या खड्ड्याची सत्यनारायण पूजा' करून निषेध नोंदवला. यानंतर परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, धम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. व त्वरित दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1