logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

2 days ago
user_Nandkumar Motiram Totewad
Nandkumar Motiram Totewad
Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
2 days ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • *यवतमाळ: 95 प्रशिक्षित चालक उमेदवारांचा इशारा – नियुक्ती न मिळाल्यास 27 एप्रिलपासून आमरण उपोषण* #उपनिवड समिती स्थापन करून तातडीने नियुक्ती देण्याची मागणी; प्रशासनावर दिरंगाईचा आरोप आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार पांढरकवडा येथील चालक प्रशिक्षण केंद्रातून अवजड वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सत्र 52, 53, 54 व 55 मधील 95 उमेदवारांनी नियुक्तीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार निवेदने व स्मरणपत्रे देऊनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. उमेदवारांनी विभाग नियंत्रक, यवतमाळ यांना दिलेल्या अंतिम निवेदनात नमूद केले आहे की, सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते MEO चाचणीतही उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, नियुक्ती प्रक्रिया रखडलेली असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे तातडीने उपनिवड समिती (Sub-Selection Committee) स्थापन करून नियुक्ती प्रक्रिया गतीमान करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. प्रशासनाने 26 एप्रिल 2026 पर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास 27 एप्रिल 2026 पासून विभाग नियंत्रक कार्यालय, यवतमाळ समोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात संबंधित निवेदनाची प्रत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आर्णी-केळापूरचे आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन उपोषणाची वेळ येऊ न देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
    1
    *यवतमाळ: 95 प्रशिक्षित चालक उमेदवारांचा इशारा – नियुक्ती न मिळाल्यास 27 एप्रिलपासून आमरण उपोषण*
#उपनिवड समिती स्थापन करून तातडीने नियुक्ती देण्याची मागणी; प्रशासनावर दिरंगाईचा आरोप
आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 
पांढरकवडा येथील चालक प्रशिक्षण केंद्रातून अवजड वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सत्र 52, 53, 54 व 55 मधील 95 उमेदवारांनी नियुक्तीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार निवेदने व स्मरणपत्रे देऊनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.
उमेदवारांनी विभाग नियंत्रक, यवतमाळ यांना दिलेल्या अंतिम निवेदनात नमूद केले आहे की, सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते MEO चाचणीतही उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, नियुक्ती प्रक्रिया रखडलेली असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे तातडीने उपनिवड समिती (Sub-Selection Committee) स्थापन करून नियुक्ती प्रक्रिया गतीमान करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
प्रशासनाने 26 एप्रिल 2026 पर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास 27 एप्रिल 2026 पासून विभाग नियंत्रक कार्यालय, यवतमाळ समोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात संबंधित निवेदनाची प्रत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आर्णी-केळापूरचे आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
उमेदवारांनी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन उपोषणाची वेळ येऊ न देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
    user_Ganesh Ekandwar jawala
    Ganesh Ekandwar jawala
    ATV repair shop आर्णी, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    1
    मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण 
टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • हिंगोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे आज नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महामार्गामुळे शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शासनाने हा प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार न केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले मत मांडत महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
    1
    हिंगोली (प्रतिनिधी) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात हिंगोली जिल्ह्यातील बाराशिव येथे आज नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष किशोर ढगे व स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत महामार्गामुळे शेती जमीन संपादन, पर्यावरणीय परिणाम तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर होणाऱ्या परिणामांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी शासनाने हा प्रकल्प राबविताना स्थानिकांचा विचार न केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.यावेळी अनेकांनी आपले मत मांडत महामार्गाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आणि हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली. तसेच पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
    user_Jafar tarodekar
    Jafar tarodekar
    परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • वाशिम जिल्हा अंतर्गत येत असलेल्या अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली. या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली. एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट
    1
    वाशिम जिल्हा अंतर्गत येत असलेल्या  अमानी गावामध्ये संत परमहंस मुंगसाजी महाराज संस्थान येथे नुकताच भागवत सप्ताह, शिवपुराण कथा आणि कीर्तन महोत्सव मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला.
या धार्मिक सोहळ्यात दररोज संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, तर रात्री ८ ते १० या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घेतला.
विशेष म्हणजे, श्री पांडुरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळा (ता. मालेगाव) येथील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हरिपाठ दरम्यान त्यांनी फुगडी आणि पावली सादर करत कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढवली.
या विद्यार्थिनींना शाळेचे शिक्षक श्री भगवानराव गवळी सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांची मनं जिंकली.
एकूणच, या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे अमानी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
टाइम्स ऑफ महाराष्ट्र साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी सारनाथ अवचार यांचा रिपोर्ट
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • हडोळती परिसरातील वीज व्यवस्थेचा बोजवारा; नागरिकांत तीव्र नाराजी हडोळती येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पदाचा कार्यभार स्वीकारला असला, तरी परिसरातील अनेक ग्राहकांना आजही त्यांची ओळख नाही. ते नेमके कधी येतात, कधी जातात याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कार्यालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हडोळती उपकेंद्रातून तब्बल २५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी डीपींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. डीपीवरील वायर तुटलेल्या, किटकॅट जळालेल्या, तसेच वेलींनी वेढलेल्या अवस्थेत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी येणारे साहित्य नेमके कुठे वापरले जाते, याबाबतही नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. अपुर्‍या देखभालीमुळे दोन दिवसांपूर्वी स्पार्किंग होऊन एका नागरिकाचे घर जळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिरासमोरील डीपीला अचानक स्पार्किंग होऊन आग लागली. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमित मेंटेनन्स करावे, जीर्ण डीपी दुरुस्त कराव्यात तसेच वाढत्या भारानुसार नवीन डीपी बसवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
    2
    हडोळती परिसरातील वीज व्यवस्थेचा बोजवारा; नागरिकांत तीव्र नाराजी
हडोळती येथील महावितरण कार्यालयात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांनी गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून पदाचा कार्यभार स्वीकारला असला, तरी परिसरातील अनेक ग्राहकांना आजही त्यांची ओळख नाही. ते नेमके कधी येतात, कधी जातात याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कार्यालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हडोळती उपकेंद्रातून तब्बल २५ गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र अनेक ठिकाणी डीपींची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. डीपीवरील वायर तुटलेल्या, किटकॅट जळालेल्या, तसेच वेलींनी वेढलेल्या अवस्थेत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी येणारे साहित्य नेमके कुठे वापरले जाते, याबाबतही नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे.
अपुर्‍या देखभालीमुळे दोन दिवसांपूर्वी स्पार्किंग होऊन एका नागरिकाचे घर जळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेव मंदिरासमोरील डीपीला अचानक स्पार्किंग होऊन आग लागली. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
या सततच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महावितरण प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नियमित मेंटेनन्स करावे, जीर्ण डीपी दुरुस्त कराव्यात तसेच वाढत्या भारानुसार नवीन डीपी बसवाव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
    user_Vishwanath Hengne
    Vishwanath Hengne
    अहमदपूर, लातूर, महाराष्ट्र•
    16 min ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    1
    मुखेड टोलनाका कर्मचाऱ्यांची लापरवाहीमुळे अनेक लोकांना अडचण 
टोलनाका वसुली करायला अधिकारी आहेत कामासाठी नाही असं अधिकाऱ्याचं संवाद
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • Post by Ramesh Mulgir
    1
    Post by Ramesh Mulgir
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    12 min ago
  • मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
    1
    मंठा (जि. जालना) प्रतिनिधी — मंठा तालुक्यातील पूर्णा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुभाष सखाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असून संबंधित वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवलेली नाही. तसेच अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने या अवैध प्रकाराला चालना मिळत आहे. एकाच रॉयल्टी पावतीचा दिवसातून अनेक वेळा वापर होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, वाळू वाहतूक करणारी वाहने क्षमतेपेक्षा जास्त वाळू भरून वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक वाहनांना नंबर प्लेट नसून झाकण (कव्हर) नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. शासनाच्या नियमांनुसार ३ फूटपर्यंत उत्खननाची परवानगी असताना प्रत्यक्षात १० ते १५ फूट खोल उत्खनन होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तक्रार करूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला असून उलट तक्रारदारांवर दबाव टाकला जात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वाळू वाहतुकीसाठी जीपीएस व सीसीटीव्ही व्यवस्था अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रारदारांचे संरक्षण करण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, योग्य ती कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.