घरकुल बांधले अनुदान कुठे गेले लिंगसा येथील लाभार्थ्यांचा प्रशासनाला अल्टिमेटम १६ सप्टेंबरला पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा इशारा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईचा गरीबांना फटका मोजमाप जिओ-टॅगिंग अन् अनुदानाची प्रक्रिया रखडल्याचा आरोप परतूर प्रतिनिधी :- गरिबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर देण्यासाठी सरकारच्या घरकुल योजना आहेत पण घर उभे राहूनही अनुदानासाठी लाभार्थ्यांची फरफट सुरू असेल तर ही कोणती व्यवस्था असा संतप्त सवाल मौजे लिंगसा येथील लाभार्थ्यांनी प्रशासनाला केला आहे. पीएमएवाय-जी आणि रमाई आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून घरकुलांची बांधकामे पूर्ण केली मात्र त्यानंतरही अनुदानाचे हप्ते व प्रलंबित बिले मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गरीबांच्या घरकुलासाठी पैसा नाही पण फाईल फिरवण्यासाठी वेळ आहे का असा थेट सवाल उपस्थित करीत अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीने प्रशासनाला इशारा दिला आहे. प्रलंबित घरकुल प्रकरणे तातडीने निकाली न काढल्यास १६ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती परतूरसमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.घर पूर्ण तरी सरकारी कागदोपत्री प्रलंबित लिंगसा येथील लाभार्थ्यांनी शासनाच्या मदतीच्या भरवशावर घरकुलांचे बांधकाम सुरू केले.उपलब्ध अनुदान अपुरे पडल्याने अनेकांनी पदरमोड करून अतिरिक्त खर्च केला.घर उभे राहिले छप्पर आले मात्र मोजमाप जिओ-टॅगिंग नोंदणी आणि पुढील अनुदानाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.यामुळे घरकुल पूर्ण करूनही लाभार्थ्यांना आपल्या हक्काच्या अनुदानासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.शासन गरीबांसाठी योजना आणते; मग त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गरीबांनाच इतकी फरफट का? हा सवाल आता ऐरणीवर आला आहे. दिरंगाई असेल तर जबाबदारी निश्चित करा संबंधित अधिकारी किंवा अभियंता यांच्या कार्यालयीन दिरंगाईमुळे लाभार्थ्यांची प्रकरणे रखडली असतील तर त्याची चौकशी करून दिरंगाईस जबाबदार असलेल्या व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी आणि नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.लाभार्थ्यांच्या घरकुलांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून रखडलेले मोजमाप जिओ-टॅगिंग व नोंदणी पूर्ण करावी आणि पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे अशी मागणी समितीने केली आहे. १६ सप्टेंबरला प्रशासनाची परीक्षा प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन उपोषणापूर्वीच घरकुल प्रकरणे मार्गी लावावीत अन्यथा १६ सप्टेंबरला पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू असा इशारा अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुका संघटक पिराजी अश्रुबा गायकवाड यांनी दिला आहे. या निवेदनावर पिराजी अश्रुबा गायकवाड,अर्जून कुंडलीक गायकवाड,जनाबाई अंकुश गायकवाड आणि मूंजाभाऊ काशिनाथ उजगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गरीबांच्या घराच्या भिंती उभ्या राहिल्या आता त्यांच्या हक्काच्या अनुदानाची भिंत कोण तोडणार? असा संतप्त सवाल लिंगसा येथील लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात असून आता प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे परतूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
घरकुल बांधले अनुदान कुठे गेले लिंगसा येथील लाभार्थ्यांचा प्रशासनाला अल्टिमेटम १६ सप्टेंबरला पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा इशारा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईचा गरीबांना फटका मोजमाप जिओ-टॅगिंग अन् अनुदानाची प्रक्रिया रखडल्याचा आरोप परतूर प्रतिनिधी :- गरिबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर देण्यासाठी सरकारच्या घरकुल योजना आहेत पण घर उभे राहूनही अनुदानासाठी लाभार्थ्यांची फरफट सुरू असेल तर ही कोणती व्यवस्था असा संतप्त सवाल मौजे लिंगसा येथील लाभार्थ्यांनी प्रशासनाला केला आहे. पीएमएवाय-जी आणि रमाई आवास योजनेअंतर्गत अनेक लाभार्थ्यांनी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून घरकुलांची बांधकामे पूर्ण केली मात्र त्यानंतरही अनुदानाचे हप्ते व प्रलंबित बिले मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. गरीबांच्या घरकुलासाठी पैसा नाही पण फाईल फिरवण्यासाठी वेळ आहे का असा थेट सवाल उपस्थित करीत अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीने प्रशासनाला इशारा दिला आहे. प्रलंबित घरकुल प्रकरणे तातडीने निकाली न काढल्यास १६ सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती परतूरसमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे.घर पूर्ण तरी सरकारी कागदोपत्री प्रलंबित लिंगसा येथील लाभार्थ्यांनी शासनाच्या मदतीच्या भरवशावर घरकुलांचे बांधकाम सुरू केले.उपलब्ध अनुदान अपुरे पडल्याने अनेकांनी पदरमोड करून अतिरिक्त खर्च केला.घर उभे राहिले छप्पर आले मात्र मोजमाप जिओ-टॅगिंग नोंदणी आणि पुढील अनुदानाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.यामुळे घरकुल पूर्ण करूनही लाभार्थ्यांना आपल्या हक्काच्या अनुदानासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.शासन गरीबांसाठी योजना आणते; मग त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गरीबांनाच इतकी फरफट का? हा सवाल आता ऐरणीवर आला आहे. दिरंगाई असेल तर जबाबदारी निश्चित करा संबंधित अधिकारी किंवा अभियंता यांच्या कार्यालयीन दिरंगाईमुळे लाभार्थ्यांची प्रकरणे रखडली असतील तर त्याची चौकशी करून दिरंगाईस जबाबदार असलेल्या व्यक्तींची जबाबदारी निश्चित करावी आणि नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.लाभार्थ्यांच्या घरकुलांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून रखडलेले मोजमाप जिओ-टॅगिंग व नोंदणी पूर्ण करावी आणि पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने वितरित करावे अशी मागणी समितीने केली आहे. १६ सप्टेंबरला प्रशासनाची परीक्षा प्रशासनाने निवेदनाची दखल घेऊन उपोषणापूर्वीच घरकुल प्रकरणे मार्गी लावावीत अन्यथा १६ सप्टेंबरला पंचायत समितीसमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारू असा इशारा अन्याय अत्याचार व भ्रष्टाचार विरोधी समितीचे तालुका संघटक पिराजी अश्रुबा गायकवाड यांनी दिला आहे. या निवेदनावर पिराजी अश्रुबा गायकवाड,अर्जून कुंडलीक गायकवाड,जनाबाई अंकुश गायकवाड आणि मूंजाभाऊ काशिनाथ उजगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. गरीबांच्या घराच्या भिंती उभ्या राहिल्या आता त्यांच्या हक्काच्या अनुदानाची भिंत कोण तोडणार? असा संतप्त सवाल लिंगसा येथील लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात असून आता प्रशासन या प्रश्नावर काय भूमिका घेते याकडे परतूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.1
- चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई.. चंदनझिरात मनपाची धडक कारवाई; १४ चिकन-मटन दुकाने सील, उघड्यावर मांसविक्री करणाऱ्यांचे साहित्य जप्त.. नगरसेवक अनिल तिरुखे यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई; आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशाने कारवाई..1
- 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना ! ताफ्यासह 🚨 ड्रोन व्हिडीओ - मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अखेर आज १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे रवाना झाले आहेत. कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले.ड्रोन व्हिडीओ1
- भोकरदन शहरात शहीद स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी मांडला ठराव माजी सैनिकांच्या मागणीला मिळाला न्याय भोकरदन इसरारखान पठाण भोकरदन नगर परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. माजी सैनिकांच्या मागणीला मान देऊन भोकरदन शहरात ‘शहीद स्मारक’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. हा महत्त्वपूर्ण ठराव नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी सभागृहात मांडला. सभेदरम्यान हातात ठरावाची प्रत घेऊन उभे राहत रणवीर सिंग देशमुख यांनी भावनिक आवाहन केले. ते म्हणाले, आपल्या देशाकरता जे जवान शहीद होतात... त्या शहिदांकरता आपल्या तालुक्यात कुठंही स्मारक नाही. नगरपालिकेच्या ठिकाणी पैसा आहे, तर तो आपल्या काळात आपण सर्वांनी हात वर करून हा ठराव मंजूर करावा. रणवीरसिंग देशमुख यांनी मांडलेल्या या ठरावाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवकांनी तत्काळ पाठिंबा दर्शवला. नगराध्यक्षा सौ. समरीन नाज बेग वसीम मिर्झा आणि उपनगराध्यक्षा सौ. सुरेखाताई जाधव यांनी ठरावाला संमती देत हा निर्णय एकमताने पारित केला. या ठरावाचे अनुमोदक म्हणून कदीर बापू यांचे नाव जाहीर करण्यात आले. ठराव मंजूर झाल्यानंतर बोलताना नगरसेवक रणवीर सिंग देशमुख म्हणाले, आज भोकरदन नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मी तालुक्यातील सर्व माजी सैनिकांच्या विनंतीला मान देऊन भोकरदन शहरात शहीद स्मारक व्हावे याकरिता या सभेत जागा मागणीचा ठराव मांडला. उपस्थित सर्व सदस्य, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा यांनी सर्व संमतीने ठराव मंजूर केला. अनुमोदक म्हणून कदीर बापू सह सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आभार. सभेच्या व्हिडिओमध्ये दिसते की, नगरसेवक रणवीर सिंग देशमुख कागदपत्र हातात घेऊन ठरावाचे वाचन करत आहेत. सभागृहात नगरसेवक पांढऱ्या वेशात बसलेले असून, अधिकारी वर्ग समोर टेबलवर उपस्थित आहे. ठराव मांडल्यानंतर सर्व सदस्यांनी हात वर करून एकमताने संमती दर्शवली हा ठराव मंजूर झाल्याने आता नगर परिषद प्रशासनाकडून शहीद स्मारकासाठी योग्य जागेची निवड, आराखडा व निधी मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. भोकरदन तालुक्यातून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास माजी सैनिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत शहीद जवानांसाठी स्वतंत्र स्मारक नसल्याची खंत अनेक वर्षांपासून व्यक्त केली जात होती. नगरसेवक रणवीर सिंग देशमुख यांनी उचललेल्या या पावलामुळे शहीद कुटुंबीयांच्या भावनांचा सन्मान झाला असून, येणाऱ्या पिढीला देशभक्तीची प्रेरणा मिळणार आहे. स्मारकाच्या कामास लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती नगर परिषद सूत्रांनी दिली.1
- मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे यांची प्रतिक्रिया मनोज पाटील जरांगे मुंबईकडे रवाना मराठा सेवक सुभाष पाटील वनारसे. यांची प्रतिक्रिया1
- श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन... श्री.गणेश महासंघ भोकरदन आयोजित गणेश फेस्टिवल 2026 मध्ये विविध स्पर्धेचे आयोजन...1
- आपला गणेश मंडळ जरीपुरचा राजा गणरायाचे धुमधडाक्यात आगमन1
- अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही अग्निशमन केंद्रात शिस्तीचा बोजवारा! अधिकारी झाले कर्मचारी, कर्मचारी झाले अधिकारी; मनमानी कारभारामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर कोण कधी येतो, कधी जातो याचा नियमच नाही; वर्दीचा अभाव आणि मनमानी उपस्थितीचा आरोप, सूचना दिल्यास राजकीय दबाव आणला जात असल्याची चर्चाही आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अग्निशमन केंद्रातील कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या शिस्तीबाबत गंभीर आरोप समोर येत आहेत. अग्निशमन दलाचे इन्चार्ज नियमितपणे वर्दीमध्ये कर्तव्य बजावताना दिसून येतात मात्र त्यांच्या अधिनस्त काही कर्मचारी वर्दीचा वापर करत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अग्निशमन केंद्रातील अधिकारी झाला कर्मचारी आणि कर्मचारी झाले अधिकारी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा असून कोणता कर्मचारी कधी येतो आणि कधी जातो, याबाबत निश्चित नियमांचे पालन होत नसल्याचे बोलले जात आहे.1