logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*हरित आणि सुंदर नाशिकबरोबरच देशातील सर्वात स्वच्छ बनविणार* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शिवसेना - रिपब्लिकन सेना युतीचा वचननाम्यात निर्धार* *नाशिक:–* वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकला हरित आणि सुंदर करण्याबरोबरच देशातील सर्वात स्वच्छ बनविणार तसेच नाशिक शहर खड्डे मुक्त करणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शिवसेना - रिपब्लिकन सेना युतीने केला आहे. युतीच्या वतीने नाशिककरांसाठीचा वचननामा आज सादर करण्यात आला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे अनिल ढिकले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोरख बोडके, रवी भोये यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी रिपब्लिकन सेना युतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक शहरात वृक्षतोड न करता विकास केला जाईल असा पुनरूच्चार युतीच्या नेत्यांनी केला आहे. नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी जाहीरनाम्यात ठोस उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. गोदावरीच्या उपनद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या नद्यांचे 'अक्विफर मॅपिंग' करून त्यांना बारमाही वाहते केले जाईल. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून गोदावरी आणि नंदिनीला प्रदूषणमुक्त केले जाईल. गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी बांबूची लागवड करून नैसर्गिक तटबंदी निर्माण केली जाईल, असेही युतीच्या नेत्यांनी सांगितले. सद्यस्थितीत मध्य प्रदेशातील इंदूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे. मात्र, आगामी काळात नाशिकला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविले जाईल. त्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवून कचऱ्याचे संकलन केले जाईल. शास्त्रोक्त विलगीकरण करून विल्होळी येथील कचरा डेपोवर 'बायोडिझेल प्रकल्प' सुरू केला जाईल. रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंचलित यंत्रांचा वापर आणि शहरात ठिकठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहांची निर्मिती केली जाईल. मनपाच्या मोकळ्या भूखंडांवर, उद्यानांत आणि जलकुंभांच्या परिसरात देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे दीर्घकालीन जतन केले जाईल, असा निर्धार युतीच्या वचननामा मध्ये करण्यात आला आहे. नाशिक शहरातील रस्त्यांवर सध्या खुप खड्डे आहेत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारणे, महापालिकेचा कारभार ऑनलाईन आणि पारदर्शक करणे, फाळके स्मारकाचे रूपडे बदलणे, तारांगणाला पुनरुज्जिवीत करणे, शहरात बस आणि रिक्षा सेवेचा दर्जा वाढविणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे, झोपडपट्टीमुक्त शहर करणे, नाशिकला आयटी पार्क कार्यान्वित करणे आदी बाबींचा वचननामा मध्ये समावेश करण्यात आला आहे. *सिंहस्थासाठी हे करणार* नाशिक विमानतळावर दुसरी धावपट्टी, टर्मिनल २, इमिग्रेशन चेक पोस्ट, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणे. नाशिक–त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडॉर मध्ये हवाई वाहतूक प्रस्तावित करणे, नाशिक शहरासह जिल्ह्यात मोबाईल टॉवर्स 5G करणे, एसटीच्या ५०० बसेस उपलब्ध करणे, डबल डेकर ५० ई-बस प्रस्तावित करून नाशिक कुंभमेळा २०२७ मध्ये सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहित करणे, त्र्यंबकेश्वरला डॉपलर वेदर रडार उभारणे, नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा विकास, मनमाड-कसारा तिसरा व चौथा रेल्वे मार्ग, २०० खाटांचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आदी कामे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केली जाणार असल्याचे वचननामा मध्ये नमूद करण्यात आले आहे. नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने वाढतो आहे. ओझऱ, दिंडोरी,त्र्यंबकेश्वर यासारखी शहरे आता नाशिकच्या विस्तारात येत आहेत. त्यामुळे पुढील २५ वर्षांचा विचार करूनच विकासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही वचननामा तयार केला आहे. तसेच, नाशिक हे हरितच रहावे यावर आमचा भर आहे. *नरहरी झिरवाळ,मंत्री,अन्न व औषध प्रशासन,महाराष्ट्र राज्य* ‘हरित नाशिक,सुंदर नाशिक’चा संकल्प आम्ही केला आहे. तपोवन ही नाशिकची खरी ओळख ती कायम ठेवली जाईल. झाडे न तोडता शहराचा परिपूर्ण विकास साधला जाईल. शाश्वत विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बांबू लागवडी करून महापालिकेचे उत्पन्नही वाढविले जाईल. *-माजी खासदार समीर भुजबळ,स्टार प्रचारक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* नाशिकची खरी ओळख असलेल्या तपोवन परिसराचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून त्याचे संवर्धन करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्राधान्य दिले आहे.निसर्ग आणि आधुनिक विकास यांचा समतोल साधणारा हा जाहीरनामा नाशिककरांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. *-माजी खासदार हेमंत गोडसे,शिवसेना* *वचननामाची ठळक वैशिष्ट्ये* -शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता किकवी धरण -महापालिकेत पर्यटन विकास सेल सुरू करणार -द्वारका येथे ५०० बेडचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल साकारणार -महापालिका शाळेत ई लर्निंग आणि डिजीटल क्लासरूम -छत्रपती संभाजी स्टेडिअम येथे क्रीडा प्रशिक्षण केंद्र -शहराच्या एण्ट्री पॉईण्टवर कॉमन सर्व्हिस सेंटर -सीएनजी पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स -इंडस्ट्रिअल एक्झिबिशन सेंटर -महिला बचत गटांसाठी विशेष मॉल -शहराच्या सर्व भागात प्रसाधनगृहे -पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर नाशिक फेस्टिव्हल -सहाही विभागात भाजीपाला मॉल

1 hr ago
user_Kapil Katyare
Kapil Katyare
Photographer Nashik, Maharashtra•
1 hr ago
38dd121e-234b-4180-b8af-4ef677559923

*हरित आणि सुंदर नाशिकबरोबरच देशातील सर्वात स्वच्छ बनविणार* *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शिवसेना - रिपब्लिकन सेना युतीचा वचननाम्यात निर्धार* *नाशिक:–* वेगाने विकसित होणाऱ्या नाशिकला हरित आणि सुंदर करण्याबरोबरच देशातील सर्वात स्वच्छ बनविणार तसेच नाशिक शहर खड्डे मुक्त करणार असल्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शिवसेना - रिपब्लिकन सेना युतीने केला आहे. युतीच्या वतीने नाशिककरांसाठीचा वचननामा आज सादर करण्यात आला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे अनिल ढिकले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गोरख बोडके, रवी भोये यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी रिपब्लिकन सेना युतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. नाशिक शहरात वृक्षतोड न करता विकास केला जाईल असा पुनरूच्चार युतीच्या नेत्यांनी केला आहे. नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी जाहीरनाम्यात ठोस उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. गोदावरीच्या उपनद्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे या नद्यांचे 'अक्विफर मॅपिंग' करून त्यांना बारमाही वाहते केले जाईल. सातपूर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सीईटीपी यंत्रणा तातडीने कार्यान्वित करून गोदावरी आणि नंदिनीला प्रदूषणमुक्त केले जाईल. गोदावरी आणि तिच्या उपनद्यांच्या किनारी बांबूची लागवड करून नैसर्गिक तटबंदी निर्माण केली जाईल, असेही युतीच्या नेत्यांनी सांगितले. सद्यस्थितीत मध्य प्रदेशातील इंदूर हे देशातील पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर आहे. मात्र, आगामी काळात नाशिकला देशातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनविले जाईल. त्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवून कचऱ्याचे संकलन केले जाईल. शास्त्रोक्त विलगीकरण करून विल्होळी येथील कचरा डेपोवर 'बायोडिझेल प्रकल्प' सुरू केला जाईल. रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी स्वयंचलित यंत्रांचा वापर आणि शहरात ठिकठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहांची निर्मिती केली जाईल. मनपाच्या मोकळ्या भूखंडांवर, उद्यानांत आणि जलकुंभांच्या परिसरात देशी वृक्षांची लागवड करून त्यांचे दीर्घकालीन जतन केले जाईल, असा निर्धार युतीच्या वचननामा मध्ये करण्यात आला आहे. नाशिक शहरातील रस्त्यांवर सध्या खुप खड्डे आहेत. त्यामुळे रस्त्यांचा दर्जा सुधारणे, महापालिकेचा कारभार ऑनलाईन आणि पारदर्शक करणे, फाळके स्मारकाचे रूपडे बदलणे, तारांगणाला पुनरुज्जिवीत करणे, शहरात बस आणि रिक्षा सेवेचा दर्जा वाढविणे, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविणे, झोपडपट्टीमुक्त शहर करणे, नाशिकला आयटी पार्क कार्यान्वित करणे आदी बाबींचा वचननामा मध्ये समावेश करण्यात आला आहे. *सिंहस्थासाठी हे करणार* नाशिक विमानतळावर दुसरी धावपट्टी, टर्मिनल २, इमिग्रेशन चेक पोस्ट, आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करणे. नाशिक–त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडॉर मध्ये हवाई वाहतूक प्रस्तावित करणे, नाशिक शहरासह जिल्ह्यात मोबाईल टॉवर्स 5G करणे, एसटीच्या ५०० बसेस उपलब्ध करणे, डबल डेकर ५० ई-बस प्रस्तावित करून नाशिक कुंभमेळा २०२७ मध्ये सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहित करणे, त्र्यंबकेश्वरला डॉपलर वेदर रडार उभारणे, नाशिकरोड रेल्वे स्टेशनचा विकास, मनमाड-कसारा तिसरा व चौथा रेल्वे मार्ग, २०० खाटांचे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आदी कामे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केली जाणार असल्याचे वचननामा मध्ये नमूद करण्यात आले आहे. नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने वाढतो आहे. ओझऱ, दिंडोरी,त्र्यंबकेश्वर यासारखी शहरे आता नाशिकच्या विस्तारात येत आहेत. त्यामुळे पुढील २५ वर्षांचा विचार करूनच विकासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आम्ही वचननामा तयार केला आहे. तसेच, नाशिक हे हरितच रहावे यावर आमचा भर आहे. *नरहरी झिरवाळ,मंत्री,अन्न व औषध प्रशासन,महाराष्ट्र राज्य* ‘हरित नाशिक,सुंदर नाशिक’चा संकल्प आम्ही केला आहे. तपोवन ही नाशिकची खरी ओळख ती कायम ठेवली जाईल. झाडे न तोडता शहराचा परिपूर्ण विकास साधला जाईल. शाश्वत विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. बांबू लागवडी करून महापालिकेचे उत्पन्नही वाढविले जाईल. *-माजी खासदार समीर भुजबळ,स्टार प्रचारक,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी* नाशिकची खरी ओळख असलेल्या तपोवन परिसराचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकवून त्याचे संवर्धन करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसने प्राधान्य दिले आहे.निसर्ग आणि आधुनिक विकास यांचा समतोल साधणारा हा जाहीरनामा नाशिककरांच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. *-माजी खासदार हेमंत गोडसे,शिवसेना* *वचननामाची ठळक वैशिष्ट्ये* -शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता किकवी धरण -महापालिकेत पर्यटन विकास सेल सुरू करणार -द्वारका येथे ५०० बेडचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल साकारणार -महापालिका शाळेत ई लर्निंग आणि डिजीटल क्लासरूम -छत्रपती संभाजी स्टेडिअम येथे क्रीडा प्रशिक्षण केंद्र -शहराच्या एण्ट्री पॉईण्टवर कॉमन सर्व्हिस सेंटर -सीएनजी पेट्रोल पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स -इंडस्ट्रिअल एक्झिबिशन सेंटर -महिला बचत गटांसाठी विशेष मॉल -शहराच्या सर्व भागात प्रसाधनगृहे -पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवाच्या धर्तीवर नाशिक फेस्टिव्हल -सहाही विभागात भाजीपाला मॉल

More news from Maharashtra and nearby areas
  • अंदरसूलच्या एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन ​ प्रतिनिधी सचिन वखारे येवला येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे (एम.एस.जी.एस.) इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शितल तुषार भागवत उपस्थित होत्या. ​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक अमोल आहेर यांनी प्रास्ताविक केले. ​याप्रसंगी स्कूलच्या वतीने डॉ. शितल भागवत, संतोष घोडेराव, शब्बीर इनामदार, सागर पाठक, हितेश दाभाडे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सौम्या एंडाईत, देवांश देशमुख, प्राजक्ता सोमासे यांनी भाषणे केली, तर खदीजा खान, वैष्णवी पाराटे, स्तुती पांडे, जानवी देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी कविता सादर केल्या. ​प्रमुख पाहुण्या डॉ. शितल भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मुलींनी राजमाता जिजाऊंसारखे निडर व स्वावलंबी बनावे आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आणावा." अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. ​या कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक आकाश सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, डॉ. सुवर्णा कडलक यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.
    1
    अंदरसूलच्या एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
​ प्रतिनिधी सचिन वखारे येवला 
येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे (एम.एस.जी.एस.) इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शितल तुषार भागवत उपस्थित होत्या.
​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक अमोल आहेर यांनी प्रास्ताविक केले.
​याप्रसंगी स्कूलच्या वतीने डॉ. शितल भागवत, संतोष घोडेराव, शब्बीर इनामदार, सागर पाठक, हितेश दाभाडे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सौम्या एंडाईत, देवांश देशमुख, प्राजक्ता सोमासे यांनी भाषणे केली, तर खदीजा खान, वैष्णवी पाराटे, स्तुती पांडे, जानवी देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी कविता सादर केल्या.
​प्रमुख पाहुण्या डॉ. शितल भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मुलींनी राजमाता जिजाऊंसारखे निडर व स्वावलंबी बनावे आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आणावा." अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
​या कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक आकाश सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, डॉ. सुवर्णा कडलक यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik, Maharashtra•
    17 hrs ago
  • बेलापूर बु गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा
    8
    बेलापूर बु  गावातील मेन टाकी फिल्टर प्लांट पिण्या साठी पुरवठा होत असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट ची झालेली दुरावास्ता पम्प हाऊस मध्ये पडल्या आहेत बियर च्या बाटल्या तुरटीवर गुटखा खाऊन थुंकलेले आणि पाण्यात शेवळ आणि झाडांचा पाला पाचोळा पडलेला कित्याक दिवसाची तुराती ची काळजी घेताना ग्रामपंचायत प्रशासन व प्यानल बोर्ड उघड्या वायर आणि त्याच्या जवळ पडलेले भंगार आणि त्यात ठेवलेल्या TCL च्या गोण्या ग्रामसेवक म्हणतात हे काम टेक्निकलं माणसाचे माझे नाही. असे हुशार आणि होतकरू ग्रामसेवक लाभले आहेत ग्रामपंचायत बेलापूर ला 
आणि पहा हा बेलापूर ऐनतपूर खटकळी गावठाण,रामगड, खटोड कॉलनी, कोल्हार रोड, पाहुणे नगर, तुकाराम नगर, सातभाई वस्ती, चांद नगर, शेलार वाडा, व संपूर्ण गावात ह्या स्वरूपाचा पाणी पुरवठा करत आहे ग्रामपंचायत बेलापूर बु आणि लिकेजवर भरमसाठ खरच करून लिकेज कुठले काढले हे कळण्यास तयार नाही एका महिन्यात JCB चे बिल होते 38 हजार एवढे चालले कुठे किती लिकेज संपूर्ण गाव उकरून परत बुजवत आहेत का काय हा सवाल ग्रामपंचायत सदस्य रमेश अमोलिक यांचा
    user_Ramesh amolik
    Ramesh amolik
    श्रीरामपूर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by M Veer
    1
    Post by M Veer
    user_M Veer
    M Veer
    Nurse Kalyan, Thane•
    17 hrs ago
  • Your friend Chandrakant Sangale is inviting you to become smart. Also, many around you, are using the Useme App. Download the app to get 1000 useme coins. Step:1 To download this app use my link that is provided below. Step:2 Register yourself using your mobile number. Step:3 Complete your KYC to successfully register. For more information, download the Useme app through this link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.useme.wallet&referrer=UM379751
    1
    Your friend Chandrakant Sangale is inviting you to become smart. Also, many around you, are using the Useme App.
Download the app to get 1000 useme coins.
Step:1 To download this app use my link that is provided below.
Step:2 Register yourself using your mobile number.
Step:3 Complete your KYC to successfully register.
For more information, download the Useme app through this link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.useme.wallet&referrer=UM379751
    user_CK Sangale
    CK Sangale
    Apprenticeship Centre राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by महाराष्ट्र सरकार
    1
    Post by महाराष्ट्र सरकार
    user_महाराष्ट्र सरकार
    महाराष्ट्र सरकार
    वसई, पालघर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • किसान की आवाज हू मे!
    1
    किसान की आवाज हू मे!
    user_Singya maharya gavit
    Singya maharya gavit
    Farmer नवापूर, नंदुरबार, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • महाराष्ट्र के सातारा में भारतीय सेना के जवान प्रमोद जाधव को जब अंतिम विदाई दी गई, तो पूरा गांव शोक में डूब गया। हादसे में शहीद हुए जवान की पत्नी को अस्पताल से स्ट्रेचर पर उनके अंतिम दर्शन के लिए लाया गया, जबकि उनकी महज आठ घंटे पहले जन्मी नवजात बेटी को गोद में लेकर अंतिम विदाई दिलाई गई। सेना की सलामी, बिलखते परिजन और तिरंगे में लिपटा शहीद- इस हृदयविदारक दृश्य ने न सिर्फ गांव बल्कि पूरे शहर को भावुक कर दिया। #viral #viralreels #military #maharashtra
    1
    महाराष्ट्र के सातारा में भारतीय सेना के जवान प्रमोद जाधव को जब अंतिम विदाई दी गई, तो पूरा गांव शोक में डूब गया। हादसे में शहीद हुए जवान की पत्नी को अस्पताल से स्ट्रेचर पर उनके अंतिम दर्शन के लिए लाया गया, जबकि उनकी महज आठ घंटे पहले जन्मी नवजात बेटी को गोद में लेकर अंतिम विदाई दिलाई गई। सेना की सलामी, बिलखते परिजन और तिरंगे में लिपटा शहीद- इस हृदयविदारक दृश्य ने न सिर्फ गांव बल्कि पूरे शहर को भावुक कर दिया।
#viral #viralreels #military #maharashtra
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    7 hrs ago
  • Post by M Veer
    1
    Post by M Veer
    user_M Veer
    M Veer
    Nurse Kalyan, Thane•
    17 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.