Shuru
Apke Nagar Ki App…
सिल्लोड तालुका भ्रष्ट लाचखोरी अधिकाऱ्यांमुळे बनला वाळू हब ... जिल्हाधिकांऱ्यानी जनतेच्या प्रश्नांची घेतली दखल....
Swal Jansamannyaca ...
सिल्लोड तालुका भ्रष्ट लाचखोरी अधिकाऱ्यांमुळे बनला वाळू हब ... जिल्हाधिकांऱ्यानी जनतेच्या प्रश्नांची घेतली दखल....
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Swal Jansamannyaca ...1
- सिल्लोड भवन येथील गट क्रमांक 98 मध्ये विद्युत तार घसरण झाल्याने मकाच्या गजाला आग लागून 100 क्विंटल मक्का जळाली यामध्ये शेतकरी गणेश कळम यांचे मोठे नुकसान झाले आहे सदरील शेतकऱ्याला शासनाच्या वतीने लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे1
- सिल्लोड तालुक्यातील भवन येथे शुक्रवारी (दि. १७) सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास भीषण आग लागून शेतकरी गणेश तेजराव कळम यांचे मोठे नुकसान झाले. भवन शिवारातील गट क्रमांक ९८ मध्ये दोन एकरातील मका काढणीसाठी पंधरा दिवसांपूर्वी सोंगून गंजी करून ठेवण्यात आला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत सुमारे १०० क्विंटल मका जळून खाक झाला. प्राथमिक माहितीनुसार, महावितरणच्या विद्युत तारेत झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ठिणगी पडून मक्याच्या गंजीने पेट घेतला. उन्हाचे वाढते तापमान आणि कोरडे वातावरण यामुळे आगीने क्षणार्धात भीषण रूप धारण केले. आग विझवण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न केले; मात्र ती एवढ्या वेगाने पसरली की नियंत्रण मिळवणे कठीण झाले. या दुर्घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कष्टाने उभा केलेला पीक हाताशी आले असतानाच जळून गेल्याने शेतकरी कळम हवालदिल झाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. ........................1
- Post by Shaha News Marathi1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- अजितदादांच्या विमानाचा अपघात; घटनास्थळी रोहित पवार, राजेंद्र पवार दाखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच रोहित पवार आणि राजेंद्र पवार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. बचाव पथक आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी कार्यरत असून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली आहे का याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून लवकरच सविस्तर माहिती दिली जाणार आहे.1
- दिनांक १७/०४/२०२५ रोजी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२. जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी आरोपी कं. ०१. शंकर दगडुबा पतंगे, वय २६ वर्ष; आरोपी कं. ०२. पांडुरंग नरहरी रोकडे, वय ३६ वर्षे, आरोपी कं.०३. पवन नरहरी रोकडे, वय-२६ वर्ष आणि आरोपी कं. ०४. नरहरी बापुराव रोकडे, वय ६० वर्ष सर्व रा. अंबा ता. परतुर, जि. जालना यांनी मयत नामे कृष्णा गुणाजी थोंगडे याचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वी. अन्वये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, मयत कृष्णा गुणाजी भोंगडे हा दिनांक ०८/०८/२०२३ रोजी रात्री त्याचे मेडीकलचे दुकान बंद करून त्याच्या घरी जात असतांना वरील आरोपींनी शेतीच्या तसेच पाण्याच्या पाईप लाईनच्या वादाच्या कारणावरून कट रचुन संगमताने फावडयाच्या दांड्याने, कोयत्याने व काठीने जबर मारहाण करून निर्वृणपणे खुन केला. फिर्यादी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन परतुर येथे गुन्हा कं. ३३१/२०२३ कलम ३०७, ३२६, ३४ भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल होवुन त्यांनतर जखमी कृष्णा च्या मृत्यू नंतर सदर प्रकरणात कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भा.द.वि. प्रमाणे कलम वाढ झाली. त्यांनतर संपुर्ण तपास झाल्यानंतर सदर गुन्हयात तपासीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर यांच्याकडून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मयताची आई (फिर्यादी) व पत्नी, वैदयकिय अधिकारी, पंच तसेच इतर महत्वाचे साक्षीदार व तपासणीक अधिकारी श्री. एम. टी. सुरवसे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारपक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश-०२, जालना मा. श्रीमती. एन. एस. शेख मॅडम यांनी सर्व आरोपींना मयत कृष्णा गुणाजी धोंगडे यांचा निर्वृणपणे खून केल्या प्रकरणी कलम ३०२, १२० वी सह कलम ३४ भादवी मध्ये जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास १ वर्षे कारावासबी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण बोराडे यांनी काम पाहिले. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. सौ. जयश्री नारायण योराडे यांनी काम पाहिले व सदर प्रकरणामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री. आयुष नोपाणी साहेव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग परतुर श्री.. आर. टी. रेंगे साहेब व सध्याचे पोलीस निरीक्षक श्री. भागवत सुदाम साहेय व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.1
- सोयगाव तालुक्यातील वरठाण येथे 14 एप्रिल निमित्त लावलेल्यांची अज्ञात माती फिरवणे पाडल्याची घटना घडली होती या प्रकरणी सोयगाव पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद करण्यात आली होती सदरील घटना प्रकरणी उप पोलीस निरीक्षक गजानन आरेकर यांनी माध्यमांना माहिती दिली की लवकरात लवकर आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती यावेळेस त्यांनी माध्यमांना दिली1