तणावमुक्त मनाने अपघात टाळा!- पिंपरी-चिंचवडच्या 'आय.डी.टी.आर.' संस्थेत सनातन संस्थेचे ८० चालकांना मार्गदर्शन विक्रम शिंदे / पिंपरी-चिंचवड दि.9 येथील प्रसिद्ध 'इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च' (IDTR) संस्थेत सनातन संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना 'तणावमुक्त मनस्थितीचे महत्त्व आणि उपाय' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. वाहन चालवणे ही केवळ शारीरिक कृती नसून, मानसिक एकाग्रतेची प्रक्रिया आहे. रुग्णवाहिका किंवा अवजड वाहने चालवताना शांत मन अपघात रोखण्यासाठी आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्राचार्य सौ. हेमलता खेडकर यांनी या प्रसंगी उपस्थित ८० प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यात रुग्णवाहिका चालक, अवजड वाहन चालक आणि कॅब चालक महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. मनावरील ताणामागे शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही कारणे असतात, असे स्पष्ट करत सौ. खेडकर यांनी यावर मात करण्यासाठी प्रभावी त्रिसूत्री मांडली. यामध्ये नामजप हा ध्यानधारणेचा सोपा प्रकार असून तो चित्त स्थिर करतो; प्राणायाम श्वसनाद्वारे मेंदूला प्राणवायू पुरवून मन शांत ठेवतो, तर स्वयंसूचनांमुळे चुकीच्या प्रतिक्रिया रोखल्या जाऊन व्यक्तिमत्त्व विकास होतो. या त्रिसूत्रीच्या नियमित वापरामुळे मन चिंताविरहित आणि प्रसन्न राहण्यास मदत होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते. या अंतर्गत येथील पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध 'इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च' (IDTR) संस्थेत सनातन संस्थेच्या वतीने 'तणावमुक्त मनस्थितीचे महत्त्व आणि उपाय' या विषयावर मार्गदर्शना उपक्रम राबवण्यात आला. या मार्गदर्शनादरम्यान प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन करताना प्राचार्य सौ.हेमलता खेडकर यांनी प्रायोगिक उदाहरणे दिली. कोल्हापूरचे प्रशिक्षणार्थी श्री. दत्तात्रय सुतार यांनी प्रशिक्षकाच्या दडपणाखाली हँड ब्रेक काढण्यास विसरण्यासारख्या होणाऱ्या चुका मांडल्या, त्यावर स्वयंसूचनेद्वारे आत्मविश्वास कसा वाढवायचा याचे मार्गदर्शन करण्यात आले. तर, डॉ. सिमरन केसवानी यांनी कामाच्या व्यापात थोडा वेळ डोळे मिटून मानसिक विश्रांती घेण्याच्या प्रयोगाचा सकारात्मक अनुभव कथन केला. इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चचे संचालक श्री. संजय ससाणे आणि प्रशिक्षक श्री. दिनेश मंडोरे यांच्या सहकार्यामुळे संपन्न झालेल्या या उपक्रमात, नियमित प्रशिक्षणासोबतच मानसिक ताण निर्मूलनाचा विषय शिकायला मिळाल्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त केले.
तणावमुक्त मनाने अपघात टाळा!- पिंपरी-चिंचवडच्या 'आय.डी.टी.आर.' संस्थेत सनातन संस्थेचे ८० चालकांना मार्गदर्शन विक्रम शिंदे / पिंपरी-चिंचवड दि.9 येथील प्रसिद्ध 'इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च' (IDTR) संस्थेत सनातन संस्थेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना 'तणावमुक्त मनस्थितीचे महत्त्व आणि उपाय' या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. वाहन चालवणे ही केवळ शारीरिक कृती नसून, मानसिक एकाग्रतेची प्रक्रिया आहे. रुग्णवाहिका किंवा अवजड वाहने चालवताना शांत मन अपघात रोखण्यासाठी आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्राचार्य सौ. हेमलता खेडकर यांनी या प्रसंगी उपस्थित ८० प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. यात रुग्णवाहिका चालक, अवजड वाहन चालक आणि कॅब चालक महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. मनावरील ताणामागे शारीरिक आणि मानसिक अशी दोन्ही कारणे असतात, असे स्पष्ट करत सौ. खेडकर यांनी यावर मात करण्यासाठी प्रभावी त्रिसूत्री मांडली. यामध्ये नामजप हा ध्यानधारणेचा सोपा प्रकार असून तो चित्त स्थिर करतो; प्राणायाम श्वसनाद्वारे मेंदूला प्राणवायू पुरवून मन शांत ठेवतो, तर स्वयंसूचनांमुळे चुकीच्या प्रतिक्रिया रोखल्या जाऊन व्यक्तिमत्त्व विकास होतो. या त्रिसूत्रीच्या नियमित वापरामुळे मन चिंताविरहित आणि प्रसन्न राहण्यास मदत होते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'सनातन संस्थे’चा
दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते. या अंतर्गत येथील पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध 'इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च' (IDTR) संस्थेत सनातन संस्थेच्या वतीने 'तणावमुक्त मनस्थितीचे महत्त्व आणि उपाय' या विषयावर मार्गदर्शना उपक्रम राबवण्यात आला. या मार्गदर्शनादरम्यान प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन करताना प्राचार्य सौ.हेमलता खेडकर यांनी प्रायोगिक उदाहरणे दिली. कोल्हापूरचे प्रशिक्षणार्थी श्री. दत्तात्रय सुतार यांनी प्रशिक्षकाच्या दडपणाखाली हँड ब्रेक काढण्यास विसरण्यासारख्या होणाऱ्या चुका मांडल्या, त्यावर स्वयंसूचनेद्वारे आत्मविश्वास कसा वाढवायचा याचे मार्गदर्शन करण्यात आले. तर, डॉ. सिमरन केसवानी यांनी कामाच्या व्यापात थोडा वेळ डोळे मिटून मानसिक विश्रांती घेण्याच्या प्रयोगाचा सकारात्मक अनुभव कथन केला. इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चचे संचालक श्री. संजय ससाणे आणि प्रशिक्षक श्री. दिनेश मंडोरे यांच्या सहकार्यामुळे संपन्न झालेल्या या उपक्रमात, नियमित प्रशिक्षणासोबतच मानसिक ताण निर्मूलनाचा विषय शिकायला मिळाल्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त केले.
- भोरला ट्रॅफिक जाम ; रविवार सुट्टी आणि मांढरदेवी यात्रेमूळे वाहनांच्या लांबच लांब रांगा विक्रम शिंदे /भोर दि.11 भोर - कापूरव्होळ मार्गावर बुववासाहेबवाडी ते भोर आणि पुढे रामबाग ते चौपाटी दरम्यान सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने भोरमार्गे वाई तालुक्यातील मांढरदेवीला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याने ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे.पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांचे मार्गदर्शना खाली ट्रॅफिक पोलीस सुनील चव्हाण कर्तव्यावर असून वाहतूक नियमन करण्याचे काम बिनचूक करत आहेत.1
- सांगलीत सराईत गुन्हेगाराचा पाठलाग करून भोसकून निर्घृण खून;1
- Post by Vls Patil1
- काठापुर खुर्द ता. शिरूर येथे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट जेरबंद https://dailynewspost24.com/?p=54154
- हेडलाइन: वार्ड क्रमांक 95 से शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को मिला ज़बरदस्त जनसमर्थन विस्तृत समाचार: मुंबई के वार्ड क्रमांक 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को जनता का भारी समर्थन मिलता नज़र आ रहा है। चुनावी जनसंपर्क अभियान के दौरान एडवोकेट हरी शास्त्री ने वार्ड के विभिन्न इलाकों का दौरा कर स्थानीय नागरिकों से सीधा संवाद किया और उनकी समस्याओं को गंभीरता से सुना। इस दौरान स्थानीय नागरिकों ने सड़क, पानी, साफ़-सफाई, स्वास्थ्य सेवाएं और युवाओं के रोजगार जैसे मुद्दों को प्रमुखता से सामने रखा। एडवोकेट हरी शास्त्री ने सभी समस्याओं के समाधान का भरोसा दिलाते हुए कहा कि जनता की आवाज़ को मनपा और सदन तक मजबूती से पहुंचाना ही उनकी पहली प्राथमिकता होगी। जनता ने उनके सरल स्वभाव, साफ़ छवि और सामाजिक कार्यों के अनुभव की सराहना करते हुए खुलकर समर्थन जताया। कई नागरिकों ने कहा कि एडवोकेट हरी शास्त्री ही ऐसे उम्मीदवार हैं जो वार्ड के विकास को नई दिशा दे सकते हैं। पूरे वार्ड में चुनाव को लेकर उत्साह का माहौल है और जिस तरह से लोगों का समर्थन मिल रहा है, उससे यह साफ़ दिखाई दे रहा है कि वार्ड 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट की स्थिति मज़बूत होती जा रही है। जनसमर्थन के इस बढ़ते कारवां से चुनावी मुकाबला और भी दिलचस्प बन गया है।1
- SpiceJet Faces Serious Allegations as Passenger Files ₹1 Crore Defamation Complaint in Varanasi #SpiceJet #SpiceJetNews #FlightDiversion #AviationNews #PassengerRights #AirlineNegligence #MentalHarassment #DefamationCase #VaranasiNews #LucknowAirport #BreakingNews #IndianAviation #स्पाइसजेट #यात्रीअधिकार #एयरलाइनलापरवाही #वाराणसीखबर #लखनऊ #ब्रेकिंगन्यूज़ #यात्रीपरेशान #हककीआवाज़ #SpiceJetFlight #SG329 #VaranasiBreaking1
- “प्रभाग २८ चा विकास, विश्वास आणि हक्क – मशाल चिन्हासोबत Please Subscribe My Channel Mi Marathi India1
- भोरला कुमार साहित्य संमेलन संपन्न ;पाठ्यपुस्तकातील लेकांनी साधला विद्यार्थांशी संवाद विक्रम शिंदे /भोर दि.11 येथील राजा रघूनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे शनिवार (दि.१०)शालेय विद्यार्थांसाठी एकदिवसीय साहित्य कार्यशाळा (संमेलन) पार पडले .इ.९ वी आणि इ.१० वी बालभारती( मराठी) पाठ्यपुस्तकांसाठी लेखन करणारे मंगला गोडबोले ,क्षितिज देसाई ,निलिमा गुंडी ,फारूक काझी ,मृणाल कानिटकर ,एकनाथ आव्हाड ,संगीता बर्वे ,अक्षया वाटवे ,आश्लेषा महाजन ,मकरंद जोशी ,डॉ.चित्रलेखा पुरंदरे ,संगीता पुराणिक यांनी उपस्थित राहत साहित्यिक कुमार विद्यार्थांना मार्गदर्शन केले.जेष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांचे संमेलनाचे उद्घाटन केले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या वाचाल तर वाचाल नाही तर वाचवाल .आपली भाषा वाचवायची असेल तर वाचल पाहीजे .या दरम्यान कथा लेखन ,नाट्य लेखन ,गद्य - पद्य अभिवाचन ,नाट्य छटा ,प्रवास वर्णन ,ललित लेखन ,संवाद लेखन ,लेखक गप्पा इ विविध सत्र पार पडली . यावेळी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ.सुरेश गोरेगावकर ,अध्यक्ष प्रमोद गुजर ,डॉ.प्रदीप पाटील ,प्राचार्य लक्ष्मण भांगे ,समन्वयक स्वाती दुधगावकर ,प्रा.विक्रम शिंदे ,संतोष दळवी ,सोमनाथ कुंभार आदी उपस्थित होते.ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.पुणे येथील छात्र प्रबोधन ,पुणे नगर वाचन मंदिर आणि भोर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक भेट आणि विद्यार्थी संवाद भेटीचे आयोजन करण्यात आले .1