रिसोड येथे ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी भव्य मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांचा सहभाग; पारंपरिक वेशभूषेत युवक, ज्येष्ठ नागरिक व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग रिसोड येथे ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी भव्य मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांचा सहभाग; पारंपरिक वेशभूषेत युवक, ज्येष्ठ नागरिक व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग रिसोड , पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजरी होणारी ईद-ए-मिलादुन्नबी रिसोड शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.सकाळी दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. युवक, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांनी हातात झेंडे घेत मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभाग नोंदविला. अनेकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. डीजेच्या तालावर मौलवींकडून नात-ए-शरीफचे पठण करण्यात येत असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मोहल्ल्यांमध्ये 6 दिवसांपूर्वीपासूनच तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी आकर्षक रोषणाई, पताका आणि सजावटी करण्यात आल्याने शहरातील विविध भाग उजळून निघाले होते.मिरवणुकीचे दुपारी तीन वाजता पठाणपुरा मशिदीसमोरील मैदानात समापन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान लहान मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले. मिरवणूक संपल्यानंतर मुस्लिम बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने विविध सामाजिक, राजकीय तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक शांततेत पार पडली.
रिसोड येथे ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी भव्य मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांचा सहभाग; पारंपरिक वेशभूषेत युवक, ज्येष्ठ नागरिक व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग रिसोड येथे ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी भव्य मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांचा सहभाग; पारंपरिक वेशभूषेत युवक, ज्येष्ठ नागरिक व बालकांचा उत्स्फूर्त सहभाग रिसोड , पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजरी होणारी ईद-ए-मिलादुन्नबी रिसोड शहरात मोठ्या उत्साहात
व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.सकाळी दहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. युवक, तरुण, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालकांनी हातात झेंडे घेत मोठ्या उत्साहाने मिरवणुकीत सहभाग नोंदविला. अनेकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. डीजेच्या तालावर मौलवींकडून
नात-ए-शरीफचे पठण करण्यात येत असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मोहल्ल्यांमध्ये 6 दिवसांपूर्वीपासूनच तयारी करण्यात आली होती. ठिकठिकाणी आकर्षक रोषणाई, पताका आणि सजावटी करण्यात आल्याने शहरातील विविध भाग उजळून निघाले होते.मिरवणुकीचे दुपारी तीन वाजता पठाणपुरा मशिदीसमोरील मैदानात समापन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान लहान मुलांना मिठाईचे
वाटप करण्यात आले. मिरवणूक संपल्यानंतर मुस्लिम बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने विविध सामाजिक, राजकीय तसेच प्रतिष्ठित नागरिकांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक शांततेत पार पडली.
- जय मल्हार बोलो अमरावती चलो मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे सर्वांना विनंती1
- सेंदुरसना येथे श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा संपन्न अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आज श्री निळकंठेश्वर महाराज यांच्या पालखी मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे गावात भक्ती मत वातावरण निर्माण झाले होते1
- साखरेच्या दरवाढीवर सरकारचा मोठा निर्णय! १० लाख टन साखर आयात; साठेबाजीवर कडक निर्बंध, ४ हजार क्विंटलची मर्यादा1
- नेपाळमध्ये अडकलेल्या हिंगोली जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होत नाही,त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. यासाठी 9405408939 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधता येईल. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा, असेही आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे .1
- माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार माजी प्रथम महापौर प्रताप देशमुख हाती घेणार धनुष्यबाण ; राष्ट्रवादीचा मोठा गट शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार1
- 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” शेतकरी स्टाईलने हिसका दाखवू, 📍 वसमत, जि. हिंगोली शक्तिपीठ महामार्गाच्या आक्षेप अर्जावरील सुनावणीत वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठाम भूमिका मांडली— 🔥 “आमच्या जमिनी आम्ही देणारच नाही!” असा स्पष्ट इशारा! ✊ जमीन आमची — निर्णय आमचा! 🔥 एकच जिद्द — शक्तिपीठ महामार्ग रद्द! #शक्तिपीठमहामार्ग #वसमत #हिंगोली #शेतकरी_एकजूट1
- ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा शहरात रूट मार्च खामगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात मुख्य मार्गांवरून भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काढण्यात आला. शिवाजी नगर पोलीस स्टेशन येथे या रूट मार्चचा समारोप झाला. शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मजबूत राहावी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी,यासाठी या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर, शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंदार पुरी यांसह दंगा नियंत्रण पथक,राज्य राखीव पोलीस बलाचे जवान तसेच खामगाव शहर व शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार , होमगार्ड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी सण-उत्सव सर्वांनी शांततेत आणि उत्साहात साजरे करावेत,असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.4
- मेंढपाळा च्या मुलांचा अतिशय सुंदर हिडीवो अर्जुन वगरे , धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी मेंढपाळांच्या मुलाच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे त्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवून मुलांना प्रशिक्षण दिल्या जात आहे1